शहरं
Join us  
Trending Stories
1
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
4
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
6
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
7
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
8
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
9
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
10
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
11
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
12
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
13
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
14
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
15
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
16
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
17
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
18
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
19
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
20
Khushbu Saroj : अभिमानास्पद! मित्रांनी वडिलांची उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवतेय फुटबॉलचं मैदान

बेलापूर ते गेटवे ऑफ इंडिया वॉटर टॅक्सी अखेर सुरू

By कमलाकर कांबळे | Updated: February 7, 2023 16:41 IST

आता प्रतीक्षा नेरूळ-मुंबई जलवाहतुकीची

कमलाकर कांबळे /नवी मुंबई, लोकमत न्यूज नेटवर्क: मागील काही महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या बेलापूर ते गेटवे ऑफ इंडिया दरम्यान वॉटर टॅक्सीचा मंगळवारपासून प्रारंभ करण्यात आला. राज्याचे बंदरे आणि खनिजकर्म मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते या सेवेचे उद्घाटन झाले. त्यामुळे बेलापूर ते गेटवे ऑफ इंडिया दरम्यानचा प्रवास अवघ्या ५५ मिनिटांत पूर्ण करता येणार आहे. मात्र, सिडकोने १११ कोटी खर्चून नेरूळ येथे अत्याधुनिक जेट्टी बांधूनही येथून मुंबईसाठी जलवाहतूक सेवा कधी सुरू होणार, याची प्रतीक्षा नवी मुंबईकरांना अद्यापही लागून आहे.

सागरमाला योजनेअंतर्गत महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाच्या माध्यमातून गेल्या वर्षी बेलापूर ते भाऊचा धक्का या दरम्यान जलवाहतूक सेवा सुरू केली होती. मात्र प्रवासभाडे अधिक असल्याने प्रवाशांनी त्याकडे पाठ फिरविली होती. त्यामुळे ती बंद केली होती. आता पुन्हा तिचा प्रारंभ मंगळवारी भुसे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रेंसह बंदरे विकास विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित सैनी, नयनतारा कंपनीचे रोहित सिन्हा यांच्यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मुंबईच्या मंत्रालयासह फोर्ट भागात विविध कामांनिमित्त दररोज ये-जा करणारे नोकरदार आणि व्यावसायिकांसाठी ही सेवा उपयुक्त ठरणार असल्याचे भुसे यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. तिचे प्रवासभाडेही २५० ते ३५० रुपयांच्या दरम्यान आहे. गेटवे ऑफ इंडियाच्या जवळच रेडिओ क्लब जेट्टीवरून प्रवासी वाहतूक सुरू करण्यास केंद्र शासनाने मान्यता दिली आहे. त्यानुसार या जेट्टीवरून लवकरच विविध मार्गांवर जलवाहतूक सेवा सुुरू केली जाणार असल्याचे भुसे यांनी यावेळी स्पष्ट केले.

असे असेल वॉटर टॅक्सीचे वेळापत्रक

वॉटर टॅक्सीच्या दिवसांतून सध्या दोनच फेऱ्या होणार आहेत. शनिवार आणि रविवार वगळता दरदिवशी सकाळी ८.३० वाजता बेलापूर जेट्टीहून वॉटर टॅक्सी सुटेल. ती सकाळी ९.३० वाजता गेटवे ऑफ इंडियाला पोहचेल. गेटवे ऑफ इंडियाहून सायंकाळी ६.३० वाजता वॉटर टॅक्सी सुटेल. ती सायंकाळी ७.३० वाजता बेलापूर जेट्टीवर पोहोचेल. प्रवाशांचा प्रतिसाद पाहून फेऱ्या वाढविण्याची योजना असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

मंत्र्याच्या वेळेअभावी नेरूळ जेट्टी धूळ खात

बेलापूर जेट्टीवरून गेल्या वर्षी घाईघाईत जलवाहतूक सेवा सुरू करण्यात आली. मात्र प्रवाशांचा प्रतिसाद न मिळाल्याने काही महिन्यांतच ही सेवा बंद करण्यात आली. आता गेटवे ऑफ इंडियापर्यंत विस्तार करून ही सेवा नव्याने सुरू करण्यात आली आहे. असे असले तरी बेलापूर जेट्टीपासून अवघ्या काही अंतरावर सिडकोने १११ कोटी रुपये खर्च करून अत्यधुनिक जेट्टी बांधली आहे. परंतु उद्घाटनासाठी मंत्र्यांना वेळ मिळत नसल्याने मागील दोन वर्षांपासून ही जेट्टी धूळ खात पडून आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई