शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

घणसोली येथे विद्युत ट्रान्सफॉर्मर जळाल्यामुळे पाणीपुरवठा झाला खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 00:46 IST

३० हजार नागरिकांची वणवण; १३ तासांनंतर पाणीपुरवठा सुरळीत

नवी मुंबई : पाणीपुरवठा करणाऱ्या उच्चस्तरीय आणि भूस्तरीय जलकुंभाचा विद्युत जनित्र मध्यरात्री जळाल्याने घणसोली परिसराला महापालिकेकडून होणारा पाणीपुरवठा खंडित झाल्याने गावात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली. सोमवारी दुपारी नवीन जनित्र बसविल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला.

घणसोली परिसराला महापालिकेच्या गावातील जिजामाता नगरातील उच्च आणि भूस्तरीय जलकुंभातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, रविवारी २२ नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास मोटार पंपासाठी वीजपुरवठा करणारा १६० केव्ही क्षमतेचा जनित्र (ट्रान्सफॉर्मर) अचानक जळून गेला. त्यामुळे घणसोली परिसरातील ३० हजारांहून अधिक लोकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागले. सलग १३ तास पाणीपुरवठा खंडित झाल्यामुळे महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी हंडे, कळशा आणि बादल्या घेऊन वणवण करावी लागली.घणसोली परिसरातील जिजामाता नगर, गावदेवी वाडी, समर्थ नगर, कोंबडी चाळ, आदिशक्ती नगर, चिंचआळी, ताराई नगर, रानकर आळी, कौल आळी तसेच पाटील आळी आदी परिसरांतील लोकांना पिण्याच्या पाण्याच्या टंचाईमुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. अखेर सोमवार, २३ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास महापालिकेच्या विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून नवीन जनित्र बसविल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई