शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

घणसोली येथे विद्युत ट्रान्सफॉर्मर जळाल्यामुळे पाणीपुरवठा झाला खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 00:46 IST

३० हजार नागरिकांची वणवण; १३ तासांनंतर पाणीपुरवठा सुरळीत

नवी मुंबई : पाणीपुरवठा करणाऱ्या उच्चस्तरीय आणि भूस्तरीय जलकुंभाचा विद्युत जनित्र मध्यरात्री जळाल्याने घणसोली परिसराला महापालिकेकडून होणारा पाणीपुरवठा खंडित झाल्याने गावात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली. सोमवारी दुपारी नवीन जनित्र बसविल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला.

घणसोली परिसराला महापालिकेच्या गावातील जिजामाता नगरातील उच्च आणि भूस्तरीय जलकुंभातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, रविवारी २२ नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास मोटार पंपासाठी वीजपुरवठा करणारा १६० केव्ही क्षमतेचा जनित्र (ट्रान्सफॉर्मर) अचानक जळून गेला. त्यामुळे घणसोली परिसरातील ३० हजारांहून अधिक लोकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागले. सलग १३ तास पाणीपुरवठा खंडित झाल्यामुळे महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी हंडे, कळशा आणि बादल्या घेऊन वणवण करावी लागली.घणसोली परिसरातील जिजामाता नगर, गावदेवी वाडी, समर्थ नगर, कोंबडी चाळ, आदिशक्ती नगर, चिंचआळी, ताराई नगर, रानकर आळी, कौल आळी तसेच पाटील आळी आदी परिसरांतील लोकांना पिण्याच्या पाण्याच्या टंचाईमुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. अखेर सोमवार, २३ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास महापालिकेच्या विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून नवीन जनित्र बसविल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई