शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल-जेएनपीटीदरम्यान जलवाहिनीला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 23:12 IST

पनवेल ते जेएनपीटीकडे जाणारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची (एमजेपी) जलवाहिनी अनेक ठिकाणी फुटली आहे.

- वैभव गायकरपनवेल : पनवेल ते जेएनपीटीकडे जाणारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची (एमजेपी) जलवाहिनी अनेक ठिकाणी फुटली आहे. त्यामुळे दररोज लाखो लीटर पाण्याची नासाडी होत आहे. अनेक वेळा दुरुस्ती करून देखील जलवाहिनी वारंवार फुटत असल्याने ती फोडली जात असल्याचा संशय व्यक्त होत आहे. शहरातील अनेक भागांत एकीकडे भीषण पाणीटंचाई असताना, लाखो लीटर पाणी वाया जात असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.पनवेल शहरातून जेएनपीटीकडे एमजेपीची जलवाहिनी गेली आहे. पनवेल शहर कोळीवाडा परिसरातून करंजाडे, पारगाव, दापोली, विठ्ठलवाडी, चिंचपाडा तलाव या सुमारे ६ ते ७ किमीच्या अंतरावर अनेक ठिकाणी जलवाहिनी फुटल्याने अक्षरश: पाण्याचे कारंजे उडत आहेत. ही जलवाहिनी जुनी झाली असून जीर्ण झाली आहे. तिला काही ठिकाणी गळती लागली आहे तर काही ठिकाणी ती जाणूनबुजून फोडण्यात येत असल्याचा संशय व्यक्त होत आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू आहे. तसेच झोपडपट्टीवासीय, टँकरमाफियांकडून याठिकाणी सर्रास पाणीचोरी केली जाते.दिवसाढवळ्या पाणीचोरी करण्यात येत असली तरी याला आळा घालण्यात प्रशासनाला अद्याप यश आलेले नाही.विशेष म्हणजे, ही जलवाहिनी पनवेल शहरातून आली असून शहरातील अनेक भागांत दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. हे पाणीही अल्पदाबाने अपुऱ्या प्रमाणात असते. त्यामुळे अनेक सोसायट्यांना टँकरच्या पाण्यावर आपली तहान भागवावी लागत आहे. असे असताना जलवाहिनीतून दररोज लाखो लीटर पाणी वाया जात असूनही योग्य उपाययोजना होत नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.पनवेल- जेएनपीटी परिसरातील सुमारे सहा किलोमीटरच्या अंतरावर २० पेक्षा जास्त ठिकाणी ही जलवाहिनी फुटली आहे. संबंधित जलवाहिनी अमृतयोजनेंतर्गत नव्याने बांधली जाणार आहे. त्या योजनेला मंजुरीही मिळाली आहे. मात्र हे काम पूर्ण होण्यासाठी दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. तोपर्यंत अशाच प्रकारे पाण्याची नासाडी होणार आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.>शटडाउन घेऊन गळती दुरुस्ती करणारपनवेल ते जेएनपीटी दरम्यान ६ किमीच्या जलवाहिनीपैकी ९० टक्के जलवाहिनी जीर्ण झाली आहे. त्यामुळे तिला वारंवार गळती लागते. सोमवारी शटडाऊन घेऊन गळती दुरुस्त करण्यात येणार आहे. अनेकदा जाणूनबुजूनही जलवाहिनी फोडण्यात येत असल्याने त्यावरही उपाययोजना करण्यात येतील. याशिवाय टँकरमाफियांवरही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्टÑ जीवन प्राधीकरणाचे मुख्य मुख्य कार्यकारी अभियंता सुरेंद्र दशोरे यांनी दिली.