शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस न झाल्यास जिल्ह्यावर पाण्याचे संकट

By admin | Updated: July 8, 2015 22:25 IST

४जूनमध्ये दमदार बरसलेल्या वरुणराजाने १० ते १५ दिवसांपासून दडी मारली आहे. त्यामुळे ठाणे जिल्हा पाणीबाणीच्या उंबरठ्यावर आहे. जिल्ह्यातील एमआयडीसीसह ठाणे,

जूनमध्ये दमदार बरसलेल्या वरुणराजाने १० ते १५ दिवसांपासून दडी मारली आहे. त्यामुळे ठाणे जिल्हा पाणीबाणीच्या उंबरठ्यावर आहे. जिल्ह्यातील एमआयडीसीसह ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणात २० ते २५ दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक आहे. पावसाअभावी बळीराजादेखील चिंतातुर असून लवकर पाऊस न झाल्यास संकट ओढावणार आहे.जूनमध्ये जिल्ह्यात सरासरी ४५५ मिलिमीटर पावसाची नोंद होती. यंदा जून महिन्यात अपुरा पाऊस होईल, हा अंदाज साफ फोल ठरवून काहीशा उशिरा आगमन झालेल्या पावसाने प्रत्यक्षात जोर धरला आणि महिन्याची सरासरी सहज ओलांडली. सर्वाधिक ७८८ मिमी (सरासरीच्या १४५ टक्के) पाऊस ठाण्यात, तर सर्वात कमी ३५६ मिमी (९४ टक्के) मुरबाड तालुक्यात झाला. पाऊस न झाल्याने पाण्याचे संकट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.बारवी धरणात सध्या २३.८० दशलक्ष घनमीटर साठा शिल्लक असून तो २० ते २५ दिवस पुरेल, असा लघुपाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांचा दावा आहे. गेल्या वर्षीच्या नियोजनानुसार जुलैच्या मध्यापर्यंत पाणी पुरविण्यात या विभागाला यश आले. परंतु, आता पाऊस न झाल्यास परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते.