शहरं
Join us  
Trending Stories
1
गंभीर दुखापतीनंतर श्रेयस अय्यरने पहिल्यांदाच केली सोशल मीडिया पोस्ट, दिली महत्त्वाची माहिती
2
ट्रम्प यांना मोठा झटका; त्यांच्याच पक्षाचे चार सिनेटर फिरले, कॅनडावरील अतिरिक्त १०% शुल्क लावण्याचा अधिकार काढून घेतला
3
बिहारमध्ये मोठा राडा! प्रचाराला आलेल्या तेजप्रताप यादवांवर दगडफेक; तेजस्वींच्या समर्थकांनी हुसकावून लावले
4
'जिनपिंग यांची ही गोष्ट चांगली नाही', ट्रम्प यांची थेट प्रतिक्रिया, जिनपिंग यांनी लगेच हिशेब चुकता केला
5
मोंथाने समुद्राच्या तळातून ब्रिटीशकालीन जहाज बाहेर आणले; शेवटचे दहा वर्षांपूर्वी दिसलेले...
6
"टॅरिफनं महागाई वाढवली," पॉवेल यांचा पुन्हा ट्रम्प यांच्यावर निशाणा; फेड रिझर्व्हनं केली व्याजदरात कपात
7
मोठी दुर्घटना! गेरुआ नदीत गावकऱ्यांना घेऊन जाणारी बोट उलटली; १३ जणांना वाचवलं, ८ बेपत्ता
8
Post Office ची जबरदस्त स्कीम; केवळ व्याजातूनच महिन्याला होईल ₹२०,५००ची कमाई, कर सवलतीचाही फायदा
9
'ती' रात्र, रूम नंबर ११४ अन् १७ तासांचे रहस्य! महिला डॉक्टर आत्महत्या, हॉटेल रूममधील वस्तुस्थिती
10
'तो' किंचाळला, रक्ताच्या थारोळ्यात.... १ कोटीची लॉटरी लागलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू
11
Cyclone Montha : मोंथाचा विध्वंस! २.१४ लाख एकर पिकं उद्ध्वस्त, १८ लाख लोकांना फटका, रेल्वे स्टेशन पाण्याखाली
12
भयंकर! हिट अँड रननंतर कारने बाईकस्वाराला १.५ किमी फरफटतं नेलं; धडकी भरवणारा Video
13
आजचे राशीभविष्य, ३० ऑक्टोबर २०२५: सरकारी मदत, आर्थिक लाभ; जुने मित्र भेटतील, आनंदी दिवस
14
'साईबाबा' फेम अभिनेते सुधीर दळवींना मदत केल्याने रणबीर कपूरची बहीण झाली ट्रोल, नेमकं काय घडलं?
15
"खरं सांगायचं तर..."; फिल्मफेअर पुरस्कार विकत घेतल्याच्या आरोपांवर अभिषेक बच्चन स्पष्टच म्हणाला
16
पती झाला हैवान! लेकासमोरच पत्नीची निर्घृण हत्या, डोळ्यांना, चेहऱ्याला...; अपघाताचा रचला बनाव
17
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
18
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
19
वेतन वाढेल, जबाबदारी? आठव्या वेतन आयोगाने सरकारवरील बोजा २० ते २५ हजार कोटींनी वाढणार
20
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध

पाऊस न झाल्यास जिल्ह्यावर पाण्याचे संकट

By admin | Updated: July 8, 2015 22:25 IST

४जूनमध्ये दमदार बरसलेल्या वरुणराजाने १० ते १५ दिवसांपासून दडी मारली आहे. त्यामुळे ठाणे जिल्हा पाणीबाणीच्या उंबरठ्यावर आहे. जिल्ह्यातील एमआयडीसीसह ठाणे,

जूनमध्ये दमदार बरसलेल्या वरुणराजाने १० ते १५ दिवसांपासून दडी मारली आहे. त्यामुळे ठाणे जिल्हा पाणीबाणीच्या उंबरठ्यावर आहे. जिल्ह्यातील एमआयडीसीसह ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणात २० ते २५ दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक आहे. पावसाअभावी बळीराजादेखील चिंतातुर असून लवकर पाऊस न झाल्यास संकट ओढावणार आहे.जूनमध्ये जिल्ह्यात सरासरी ४५५ मिलिमीटर पावसाची नोंद होती. यंदा जून महिन्यात अपुरा पाऊस होईल, हा अंदाज साफ फोल ठरवून काहीशा उशिरा आगमन झालेल्या पावसाने प्रत्यक्षात जोर धरला आणि महिन्याची सरासरी सहज ओलांडली. सर्वाधिक ७८८ मिमी (सरासरीच्या १४५ टक्के) पाऊस ठाण्यात, तर सर्वात कमी ३५६ मिमी (९४ टक्के) मुरबाड तालुक्यात झाला. पाऊस न झाल्याने पाण्याचे संकट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.बारवी धरणात सध्या २३.८० दशलक्ष घनमीटर साठा शिल्लक असून तो २० ते २५ दिवस पुरेल, असा लघुपाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांचा दावा आहे. गेल्या वर्षीच्या नियोजनानुसार जुलैच्या मध्यापर्यंत पाणी पुरविण्यात या विभागाला यश आले. परंतु, आता पाऊस न झाल्यास परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते.