शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

पाऊस न झाल्यास जिल्ह्यावर पाण्याचे संकट

By admin | Updated: July 8, 2015 22:25 IST

४जूनमध्ये दमदार बरसलेल्या वरुणराजाने १० ते १५ दिवसांपासून दडी मारली आहे. त्यामुळे ठाणे जिल्हा पाणीबाणीच्या उंबरठ्यावर आहे. जिल्ह्यातील एमआयडीसीसह ठाणे,

जूनमध्ये दमदार बरसलेल्या वरुणराजाने १० ते १५ दिवसांपासून दडी मारली आहे. त्यामुळे ठाणे जिल्हा पाणीबाणीच्या उंबरठ्यावर आहे. जिल्ह्यातील एमआयडीसीसह ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणात २० ते २५ दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक आहे. पावसाअभावी बळीराजादेखील चिंतातुर असून लवकर पाऊस न झाल्यास संकट ओढावणार आहे.जूनमध्ये जिल्ह्यात सरासरी ४५५ मिलिमीटर पावसाची नोंद होती. यंदा जून महिन्यात अपुरा पाऊस होईल, हा अंदाज साफ फोल ठरवून काहीशा उशिरा आगमन झालेल्या पावसाने प्रत्यक्षात जोर धरला आणि महिन्याची सरासरी सहज ओलांडली. सर्वाधिक ७८८ मिमी (सरासरीच्या १४५ टक्के) पाऊस ठाण्यात, तर सर्वात कमी ३५६ मिमी (९४ टक्के) मुरबाड तालुक्यात झाला. पाऊस न झाल्याने पाण्याचे संकट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.बारवी धरणात सध्या २३.८० दशलक्ष घनमीटर साठा शिल्लक असून तो २० ते २५ दिवस पुरेल, असा लघुपाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांचा दावा आहे. गेल्या वर्षीच्या नियोजनानुसार जुलैच्या मध्यापर्यंत पाणी पुरविण्यात या विभागाला यश आले. परंतु, आता पाऊस न झाल्यास परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते.