शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

खाडीतील पाणी निकषाहून अधिक प्रदूषित

By admin | Updated: August 30, 2016 03:22 IST

मुंबई, ठाणे व नवी मुंबईतील केमिकल कंपन्यांमधील रसायनमिश्रित पाणी प्रक्रिया न करता खाडीत सोडले जात आहे.

नामदेव मोरे,  नवी मुंबईमुंबई, ठाणे व नवी मुंबईतील केमिकल कंपन्यांमधील रसायनमिश्रित पाणी प्रक्रिया न करता खाडीत सोडले जात आहे. वर्षानुवर्षे प्रदूषण पसरविणाऱ्यांवर प्रशासनाकडून काहीही कारवाई होत नाही. यामुळे खाडीतील पाणी निकषापेक्षा तब्बल १५ पट जास्त दूषित झाले आहे. आॅक्सिजनचे प्रमाणही घटले असून पाण्यातील जीवसृष्टीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. नवी मुंबईला निसर्गाचे वरदान लाभले आहे. परंतु विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा ऱ्हास सुरू झाला आहे. हवा व ध्वनी प्रदूषणाबरोबर पाणी प्रदूषणाची स्थितीही गंभीर झाली आहे. शहरात पिण्याचे पाणी शुद्ध असले तरी नाले, तलाव व खाडीतील पाणी प्रमाणापेक्षाही जास्त दूषित झाले असल्याचे महापालिकेच्या पर्यावरणविषयक अहवालावरून समोर आले आहे. ऐरोलीच्या दिवा ते बेलापूरच्या दिवाळेपर्यंत २२ किलोमीटरचा खाडी किनारा लाभला आहे. दिवाळे, वाशी, सारसोळे, करावे व इतर अनेक गावांमधील प्रकल्पग्रस्त नागरिकांचा उदरनिर्वाह मासेमारीवर अवलंबून आहे. वाशीतील गुणाबाई सुतार या महिला विदेशात खेकडे निर्यात करण्यासाठी प्रसिद्ध आहे. परंतु मागील काही वर्षांमध्ये प्रदूषणामुळे खाडीतील जीवसृष्टीच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. एमआयडीसीतील केमिकल कंपनीमधील पाणी प्रक्रिया करून खाडीत सोडणे आवश्यक आहे. परंतु अनेक कंपन्या रसायनमिश्रित पाणी खाडीत सोडत आहेत. याशिवाय मुंबई व ठाणेमधील मलनि:सारणसह सर्व दूषित पाणी खाडीत सोडले जात आहे. खाडीमधील पाण्यात क्लोराईडची मात्रा ६०० एमजीएल एवढी असणे आवश्यक आहे. परंतु शहरात ऐरोलीमध्ये सर्वात कमी ६०६० व वाशीमध्ये सर्वात जास्त १५१८८ एमजीएल एवढे आहे. क्लोराईडचे प्रमाण सरासरी १५ टक्के एवढे जास्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. खाडीच्या पाण्यामधील आॅक्सिजनचे प्रमाण कमी झाले आहे. पाण्यातील डीओ चे प्रमाण ४ ते ७ एवढे आवश्यक आहे. परंतु ऐरोलीमध्ये ते १.७ व सानपाडाजवळ ३.५ एवढी कमी आढळले आहे. वाशीमध्ये पाण्यातील बीओडीचे प्रमाण निकषांपेक्षा दुप्पट असल्याचे समोर आले आहे. महापालिका क्षेत्रामध्ये १० मुख्य नाले व इतर २० छोटे नाले आहेत. एकूण ७४,२८२ मीटर लांबीचे असून ते डोंगरावरील पावसाचे पाणी खाडीपर्यंत वाहून नेतात. परंतु याच पाण्यातून उद्योजक रसायनमिश्रित पाणी खाडीमध्ये सोडून देत आहेत. तुर्भेमधील नाल्यात सस्पेंडेड सॉलिड्सचे प्रमाण दुप्पट आहे. तुर्भे वाशी सेक्टर १८ व नेरूळ पामबीच रोडजवळील नाल्यात क्लोराईडचे प्रमाण जास्त आढळले आहे. या सर्वांचा परिणाम खाडीतील जीवसृष्टीवर होत आहे. खाडीत मासे सापडत नसल्याने कोळी बांधवांना समुद्रात दूरवर जावे लागत असून अशीच स्थिती राहिली तर मासेमारीचा व्यवसाय बंद करावा लागेल, अशी भीती वाटू लागली आहे.