शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

खाडीतील पाणी निकषाहून अधिक प्रदूषित

By admin | Updated: August 30, 2016 03:22 IST

मुंबई, ठाणे व नवी मुंबईतील केमिकल कंपन्यांमधील रसायनमिश्रित पाणी प्रक्रिया न करता खाडीत सोडले जात आहे.

नामदेव मोरे,  नवी मुंबईमुंबई, ठाणे व नवी मुंबईतील केमिकल कंपन्यांमधील रसायनमिश्रित पाणी प्रक्रिया न करता खाडीत सोडले जात आहे. वर्षानुवर्षे प्रदूषण पसरविणाऱ्यांवर प्रशासनाकडून काहीही कारवाई होत नाही. यामुळे खाडीतील पाणी निकषापेक्षा तब्बल १५ पट जास्त दूषित झाले आहे. आॅक्सिजनचे प्रमाणही घटले असून पाण्यातील जीवसृष्टीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. नवी मुंबईला निसर्गाचे वरदान लाभले आहे. परंतु विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा ऱ्हास सुरू झाला आहे. हवा व ध्वनी प्रदूषणाबरोबर पाणी प्रदूषणाची स्थितीही गंभीर झाली आहे. शहरात पिण्याचे पाणी शुद्ध असले तरी नाले, तलाव व खाडीतील पाणी प्रमाणापेक्षाही जास्त दूषित झाले असल्याचे महापालिकेच्या पर्यावरणविषयक अहवालावरून समोर आले आहे. ऐरोलीच्या दिवा ते बेलापूरच्या दिवाळेपर्यंत २२ किलोमीटरचा खाडी किनारा लाभला आहे. दिवाळे, वाशी, सारसोळे, करावे व इतर अनेक गावांमधील प्रकल्पग्रस्त नागरिकांचा उदरनिर्वाह मासेमारीवर अवलंबून आहे. वाशीतील गुणाबाई सुतार या महिला विदेशात खेकडे निर्यात करण्यासाठी प्रसिद्ध आहे. परंतु मागील काही वर्षांमध्ये प्रदूषणामुळे खाडीतील जीवसृष्टीच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. एमआयडीसीतील केमिकल कंपनीमधील पाणी प्रक्रिया करून खाडीत सोडणे आवश्यक आहे. परंतु अनेक कंपन्या रसायनमिश्रित पाणी खाडीत सोडत आहेत. याशिवाय मुंबई व ठाणेमधील मलनि:सारणसह सर्व दूषित पाणी खाडीत सोडले जात आहे. खाडीमधील पाण्यात क्लोराईडची मात्रा ६०० एमजीएल एवढी असणे आवश्यक आहे. परंतु शहरात ऐरोलीमध्ये सर्वात कमी ६०६० व वाशीमध्ये सर्वात जास्त १५१८८ एमजीएल एवढे आहे. क्लोराईडचे प्रमाण सरासरी १५ टक्के एवढे जास्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. खाडीच्या पाण्यामधील आॅक्सिजनचे प्रमाण कमी झाले आहे. पाण्यातील डीओ चे प्रमाण ४ ते ७ एवढे आवश्यक आहे. परंतु ऐरोलीमध्ये ते १.७ व सानपाडाजवळ ३.५ एवढी कमी आढळले आहे. वाशीमध्ये पाण्यातील बीओडीचे प्रमाण निकषांपेक्षा दुप्पट असल्याचे समोर आले आहे. महापालिका क्षेत्रामध्ये १० मुख्य नाले व इतर २० छोटे नाले आहेत. एकूण ७४,२८२ मीटर लांबीचे असून ते डोंगरावरील पावसाचे पाणी खाडीपर्यंत वाहून नेतात. परंतु याच पाण्यातून उद्योजक रसायनमिश्रित पाणी खाडीमध्ये सोडून देत आहेत. तुर्भेमधील नाल्यात सस्पेंडेड सॉलिड्सचे प्रमाण दुप्पट आहे. तुर्भे वाशी सेक्टर १८ व नेरूळ पामबीच रोडजवळील नाल्यात क्लोराईडचे प्रमाण जास्त आढळले आहे. या सर्वांचा परिणाम खाडीतील जीवसृष्टीवर होत आहे. खाडीत मासे सापडत नसल्याने कोळी बांधवांना समुद्रात दूरवर जावे लागत असून अशीच स्थिती राहिली तर मासेमारीचा व्यवसाय बंद करावा लागेल, अशी भीती वाटू लागली आहे.