शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

जलसंवर्धनामुळे पूरनियंत्रण शक्य

By admin | Updated: June 25, 2017 04:12 IST

महाडमधील सावित्री नदीच्या पूरनियंत्रणासाठी कायमस्वरूपी उपाययोजना शक्य आहे. तसेच उन्हाळ््यातही पाणीटंचाईवर मात करून बारमाही कृषी

जयंत धुळप । लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : महाडमधील सावित्री नदीच्या पूरनियंत्रणासाठी कायमस्वरूपी उपाययोजना शक्य आहे. तसेच उन्हाळ््यातही पाणीटंचाईवर मात करून बारमाही कृषी उत्पादनासाठी मोठे जलसंवर्धन येथे शक्य असल्याचा निष्कर्ष प्राचार्य डॉ. समीर बुटाला यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला आहे.दरवर्षी पावसाळा जवळ आला की, महाडमधील २५ हजारपेक्षा अधिक नागरिकांच्या मनात सावित्रीच्या पुराची भीती निर्माण होते. पूरसमस्यांबाबत गेल्या दहा वर्षांच्या नोंदींचे संकलन करून बुटाला यांनी वरील महत्त्वपूर्ण निष्कर्ष समोर ठेवले आहेत. महाड शहराला सावित्री, गांधारी व काळ अशा तीन नद्यांनी वेढलेले आहे. सावित्री नदी महाबळेश्वर येथे उगम पावते. तर काळ आणि गांधारी या दोन्ही नद्या रायगड जिल्ह्यात उगम पावतात. काळ नदी बिरवाडी येथे सावित्री नदीला येऊन मिळते आणि त्या ठिकाणाहून सावित्रीचे पात्र मोठे होऊ लागते. तर महाड शहराची हद्द संपल्यानंतर गांधारी नदी सावित्री नदीस येऊन मिळते. महाडची नोंद इ.स.पूर्व २२५मध्ये कोकण किनाऱ्यावरील महत्त्वाचे बंदर व व्यापारी केंद्र म्हणून नोंद आहे. सावित्री, गांधारी, काळ या तीन नद्या महाड परिसरात असून, बाणकोट ही जवळची खाडी आहे. याच खाडीतून बोटीद्वारे व्यापारी वाहतूक सतत चालत असे. इ.स.१६५६मध्ये शिवाजी महाराजांनी रायगड किल्ला ताब्यात घेतला आणि राजधानीचे बंदर म्हणून महाड महत्त्व प्राप्त झाले. गेल्या ४० ते ५० वर्षांत सावित्री नदीपात्र गाळाने पूर्णपणे भरून गेले आणि त्यामुळे महाडमधील पूरसमस्येची निर्मिती झाल्याचे बुटाला यांनी सांगितले.महाडमधील पूरसमस्येला आळा घालण्याकरिता सावित्री नदीतील गाळ काढणे, नदीला स्वरक्षण भिंत बांधणे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे गांधारी व काळ या दोन्ही नद्यांना मिळणाऱ्या प्रवाहात बंधारे घालून पाणी अडवून साठवणे हे अत्यावश्यक आहे. दरवर्षी सर्वसाधारणपणे महाड शहरात २ ते ५ फुटांपर्यंत पाण्याची पातळी महाड शहराच्या रस्त्यांवर पावसाळ््यात पाहावयास मिळते. याच अतिरिक्त पाण्याचे नियोजन करणे शक्य आहे. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील भाटघर हे धरण महाड शहरापासून अवकाशीय अंतराने ३३ कि.मी. आहे. तर मुळशी धरणाचे अवकाशीय अंतर २३ कि.मी. आहे. जलसंधारणाच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानानुसार हे अतिरिक्त पाणी या दोन्ही धरणांत सोडणे अशक्य नाही. दुसरा पर्याय म्हणजे सावित्री नदीत टप्प्याटप्प्यांनी बंधारे बांधून पाणी अडवून ते धरणात सोडणे शक्य आहे.