शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

खालापूरसाठी ‘जलयुक्त’ वरदान

By admin | Updated: September 17, 2016 02:18 IST

महाराष्ट्राच्या विकासासाठी शासनाने जलयुक्त शिवार अभियान ही महत्त्वाकांक्षी योजना आखली आणि तिचा शुभारंभ रायगड जिल्ह्यातून झाला.

जयंत धुळप,  अलिबागमहाराष्ट्राच्या विकासासाठी शासनाने जलयुक्त शिवार अभियान ही महत्त्वाकांक्षी योजना आखली आणि तिचा शुभारंभ रायगड जिल्ह्यातून झाला. जिल्ह्यात या योजनेचे अत्यंत सकारात्मक असे परिणाम साध्य होताना दिसून येत आहेत. २०१९ पर्यंत महाराष्ट्र जलसमृध्द करण्याची ही महत्त्वाकांक्षी योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आली. जलयुक्त शिवार अभियान संपूर्ण खालापूर तालुक्यास आता वरदान ठरले आहे. संपूर्ण कोकणात पावसाचे प्रमाण भरपूर असते. रायगड जिल्ह्यात साधारण५० हजार मि.मी. इतका पाऊस वर्षाला पडतो. पावसाळ््यात खळखळ वाहणाऱ्या नद्या आणि ओढे नजरेला सुखद वाटतात. मात्र हे वाहून जाणारे पाणी कोकणातील जमिनीतच मुरले तर जमिनीतील पाण्याची पातळी वाढू शकते म्हणूनच जलयुक्त शिवार अंतर्गत गेल्या दोन वर्षात रायगड जिल्ह्यामध्ये ९४५ कामे पूर्ण करण्यात आली.खालापूर तालुक्यात चावणी व नडोदा या ठिकाणी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कामे करण्यात आली. तर उंबरे, खानव, बोरगाव या गावातही योजनेंतर्गत कामे करण्यात येत आहेत. २०१५ च्या आराखड्यानुसार ५४ कामे प्रस्तावित होती. ही कामे ८१.४० हेक्टर क्षेत्रामध्ये राबविण्यात आली. सलग समतर चर, मातीचे बांध, सिमेंट नाले, शेततळे, जुन्या भातशेतीची दुरु स्ती, गाळ काढणे आदि कामांचा समावेश करु न योजनेला मूर्त स्वरु प देण्याचा प्रयत्न या भागात यशस्वी झाला. नडोदे परिसरात ६८.४८ हेक्टरमध्येही मातीचे बांध १२, सिमेंट नाला १, शेततळे ३, जुन्या भातशेतीची दुरु स्ती करण्यात आली असून सिमेंटचे बांध ३ ठिकाणी बंधारे तयार केले आहेत तर ६ बंधाऱ्यांतील गाळ काढण्यात आला आहे.खानव, उंबरे, बोरगाव खुर्द सोंडेवाडी या ३ गावांचा समावेश प्रस्तावित कामांमध्ये असून त्याचा आराखडा तयार झाला आहे. हा भाग काहीसा डोंगराळ असल्याने पाणीटंचाईवर मात करण्यासाठी याचा विचार करण्यात आला आहे. खानाव हे जवळपास १८०० लोकवस्ती असलेले गाव. तर बोरगाव खुर्द सोंडेवाडीची लोकसंख्या जवळपास १२०० आणि उंबरेची लोकसंख्या जवळपास १७०० आहे. त्यामुळे या भागात पाणीटंचाईला पर्याय म्हणून जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत या योजना राबविल्या जात आहेत. या ठिकाणी देखील सलग समतर चर, मातीचे बांध, सिमेंट नाले, शेततळे, जुन्या भातशेतीची दुरु स्ती, गाळ काढणे अशी कामे हाती घेतली जाणार आहेत. खानाव परिसरात एकूण ८१.५० हेक्टर, बोरगाव परिसरात ११५ हेक्टर भागात ही कामे केली जाणार आहेत.एकूणच या जलशिवार योजनेमुळे या भागात झालेल्या कामांमुळे पाणीसाठा साचून तो जमिनीत मुरविण्यामध्ये बरेचसे यश मिळाले आहे. येत्या काही वर्षात या अभियानांतर्गत कामे पूर्ण झाल्यावर भूगर्भात पाणी जिरवून व जमिनीची धूप थांबविण्यात आणखीन मोठे यश मिळवून येथील पाणीटंचाई कायमची दूर होऊन २०१९ पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र पाणीटंचाईमुक्त करण्याच्या मोहिमेची सफलता होईल, असा विश्वास जिल्हा प्रशासनाच्या सूत्रांनी व्यक्त केला आहे.