शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

खालापूरसाठी ‘जलयुक्त’ वरदान

By admin | Updated: September 17, 2016 02:18 IST

महाराष्ट्राच्या विकासासाठी शासनाने जलयुक्त शिवार अभियान ही महत्त्वाकांक्षी योजना आखली आणि तिचा शुभारंभ रायगड जिल्ह्यातून झाला.

जयंत धुळप,  अलिबागमहाराष्ट्राच्या विकासासाठी शासनाने जलयुक्त शिवार अभियान ही महत्त्वाकांक्षी योजना आखली आणि तिचा शुभारंभ रायगड जिल्ह्यातून झाला. जिल्ह्यात या योजनेचे अत्यंत सकारात्मक असे परिणाम साध्य होताना दिसून येत आहेत. २०१९ पर्यंत महाराष्ट्र जलसमृध्द करण्याची ही महत्त्वाकांक्षी योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आली. जलयुक्त शिवार अभियान संपूर्ण खालापूर तालुक्यास आता वरदान ठरले आहे. संपूर्ण कोकणात पावसाचे प्रमाण भरपूर असते. रायगड जिल्ह्यात साधारण५० हजार मि.मी. इतका पाऊस वर्षाला पडतो. पावसाळ््यात खळखळ वाहणाऱ्या नद्या आणि ओढे नजरेला सुखद वाटतात. मात्र हे वाहून जाणारे पाणी कोकणातील जमिनीतच मुरले तर जमिनीतील पाण्याची पातळी वाढू शकते म्हणूनच जलयुक्त शिवार अंतर्गत गेल्या दोन वर्षात रायगड जिल्ह्यामध्ये ९४५ कामे पूर्ण करण्यात आली.खालापूर तालुक्यात चावणी व नडोदा या ठिकाणी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कामे करण्यात आली. तर उंबरे, खानव, बोरगाव या गावातही योजनेंतर्गत कामे करण्यात येत आहेत. २०१५ च्या आराखड्यानुसार ५४ कामे प्रस्तावित होती. ही कामे ८१.४० हेक्टर क्षेत्रामध्ये राबविण्यात आली. सलग समतर चर, मातीचे बांध, सिमेंट नाले, शेततळे, जुन्या भातशेतीची दुरु स्ती, गाळ काढणे आदि कामांचा समावेश करु न योजनेला मूर्त स्वरु प देण्याचा प्रयत्न या भागात यशस्वी झाला. नडोदे परिसरात ६८.४८ हेक्टरमध्येही मातीचे बांध १२, सिमेंट नाला १, शेततळे ३, जुन्या भातशेतीची दुरु स्ती करण्यात आली असून सिमेंटचे बांध ३ ठिकाणी बंधारे तयार केले आहेत तर ६ बंधाऱ्यांतील गाळ काढण्यात आला आहे.खानव, उंबरे, बोरगाव खुर्द सोंडेवाडी या ३ गावांचा समावेश प्रस्तावित कामांमध्ये असून त्याचा आराखडा तयार झाला आहे. हा भाग काहीसा डोंगराळ असल्याने पाणीटंचाईवर मात करण्यासाठी याचा विचार करण्यात आला आहे. खानाव हे जवळपास १८०० लोकवस्ती असलेले गाव. तर बोरगाव खुर्द सोंडेवाडीची लोकसंख्या जवळपास १२०० आणि उंबरेची लोकसंख्या जवळपास १७०० आहे. त्यामुळे या भागात पाणीटंचाईला पर्याय म्हणून जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत या योजना राबविल्या जात आहेत. या ठिकाणी देखील सलग समतर चर, मातीचे बांध, सिमेंट नाले, शेततळे, जुन्या भातशेतीची दुरु स्ती, गाळ काढणे अशी कामे हाती घेतली जाणार आहेत. खानाव परिसरात एकूण ८१.५० हेक्टर, बोरगाव परिसरात ११५ हेक्टर भागात ही कामे केली जाणार आहेत.एकूणच या जलशिवार योजनेमुळे या भागात झालेल्या कामांमुळे पाणीसाठा साचून तो जमिनीत मुरविण्यामध्ये बरेचसे यश मिळाले आहे. येत्या काही वर्षात या अभियानांतर्गत कामे पूर्ण झाल्यावर भूगर्भात पाणी जिरवून व जमिनीची धूप थांबविण्यात आणखीन मोठे यश मिळवून येथील पाणीटंचाई कायमची दूर होऊन २०१९ पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र पाणीटंचाईमुक्त करण्याच्या मोहिमेची सफलता होईल, असा विश्वास जिल्हा प्रशासनाच्या सूत्रांनी व्यक्त केला आहे.