शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

खारजमीन संशोधन केंद्रात सांडपाणी, पनवेल महापालिकेचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 02:40 IST

पनवेल शहराचे वैभव असलेल्या खारजमीन संशोधन केंद्रामध्ये एक महिन्यापासून महापालिकेच्या मलनि:सारण वाहिनीमधील पाणी शिरू लागले आहे

नामदेव मोरेनवी मुंबई : पनवेल शहराचे वैभव असलेल्या खारजमीन संशोधन केंद्रामध्ये एक महिन्यापासून महापालिकेच्या मलनि:सारण वाहिनीमधील पाणी शिरू लागले आहे. यामुळे भात संशोधनाच्या कामामध्ये अडथळे निर्माण होत आहेत. पिकामध्ये दूषित पाणी जावून भात शेतीचे प्रचंड नुकसान होवू लागले असून त्याचा परिणाम बियाणांच्या निर्मितीवर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.महापालिकेची निर्मिती होवून एक वर्ष झाले असले तरी प्रत्यक्षात पनवेल शहराला शेकडो वर्षांचा इतिहास आहे. पनवेल शहराचे वैभव वाढविणा-या प्रकल्पांमध्ये खार संशोधन केंद्राचा समावेश आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ दापोलीच्या अंतर्गत असलेले हे केंद्र १९४३ मध्ये सुरू झाले आहे. तब्बल ७४ वर्षांची पार्श्वभूमी असलेल्या या केंद्राने भात संशोधनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. खारजमिनीमध्ये कोणत्या प्रकारचे भात पीक घेतले जाईल याविषयी अभ्यास केला जात आहे. केंद्राने पनवेल १, २ व ३ या नावाने भाताचे प्रकार विकसित केले आहेत. १२ हेक्टर जमिनीवर संशोधन व बियाणांची निर्मिती केली जात आहे. या बियाणांना शेतकºयांकडून प्रचंड मागणी आहे. पनवेल महापालिकेने त्यांची मलनि:सारण वाहिनी संशोधन केंद्र परिसरातून नेली आहे. आॅक्टोबरमध्ये अनेक ठिकाणी मलनि:सारण वाहिन्यांचे चेंबर फुटले आहेत. चेंबरमधील पाणी शेतामध्ये साचू लागले आहे. यामुळे जवळपास एक महिन्यापासून शेतामध्ये काम करणे अशक्य होवू लागले आहे. याठिकाणी बियाणांची निर्मिती केली जाते. बियाणे दर्जेदार असावे यासाठी भाताची लागवड करण्यापासून ते पिकाची कापणी करण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट वेळेत व व्यवस्थित होणे आवश्यक असते. परंतु मलनि:सारण वाहिनी फुटल्यामुळे संशोधन केंद्रातील वेळापत्रक कोलमडले आहे.साईनगर परिसरामध्ये असलेल्या केंद्राच्या पुढील बाजूला महापालिकेचे मलनि:सारण केंद्र आहे. मलनि:सारण वाहिनीमधील पाण्याचा योग्य प्रकारे निचरा होत नाही. यामुळे अनेक ठिकाणी चेंबर फुटू लागले आहेत. पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हे प्रकार घडत आहेत. भात संशोधन केंद्राच्या जमिनीच्या उंचवट्याकडील भागातून मलनि:सारण वाहिनी गेली आहे. यामुळे फुटलेल्या चेंबरमधील पाणी पूर्ण शेतामध्ये घुसले आहे. संशोधन केंद्रातील कृषीशास्त्रज्ञांनी व कर्मचाºयांनी प्रचंड परिश्रम करून विकसित केलेले भाताच्या बियाणांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पालिका प्रशासनाने विलंब न करता दुरूस्तीचे काम सुरू करावे व पुन्हा अशाप्रकारे मलनि:सारण वाहिनी फुटणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी मागणी केली जात आहे.या प्रकाराकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे येथील कृषी शास्त्रज्ञांनी मनपा आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांची भेट घेतली असून योग्य दखल घ्यावी व बियाणे निर्मितीच्या प्रक्रियेमधील अडथळा दूर करावा, अशी मागणी केली आहे.