शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

नियोजनाअभावी कोट्यवधी वाया,जलवाहिनीसाठी काँक्रिटच्या रस्त्याचे पुन्हा खोदकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 02:49 IST

पनवेल शहरात एमएमआरडीएच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये खर्चून रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे.

पनवेल : पनवेल शहरात एमएमआरडीएच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये खर्चून रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. मात्र शहरात अमृत योजनेअंतर्गत सुरू असलेल्या जलवाहिनीच्या कामासाठी रस्त्यांचे खोदकाम केले जात आहे. त्यामुळे काँक्रिटीकरणासाठी खर्च करण्यात आलेले कोट्यवधी रुपये पाण्यात गेल्याने स्थानिक नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.पनवेल शहरात उरण नाका रोडवर शनिवारी खोदकाम करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून खड्डेमय असलेल्या या रस्त्याचे अवघ्या काही महिन्यांपूर्वी काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे स्थानिकांनी समाधान व्यक्त केले होते. मात्र अमृत योजनेअंतर्गत जलवाहिनी टाकण्यासाठी रस्त्यावर शनिवारपासून खोदकामास सुरुवात करण्यातआली.पनवेल महपालिकेकडून स्वच्छ, सुंदर शहरासाठी अनेक उपक्रम राबविले जात आहेत. त्यात स्वच्छ शहराबरोबरच सुशोभीकरणावरही भर दिला जात आहे. शहरातील भिंती रंगविण्यात आल्या आहेत. मात्र स्मार्ट सिटी म्हणून शहराचा विकास करताना नियोजनातील त्रुटीमुळे कधी केबल टाकण्यासाठी तर कधी जलवाहिनी, भूमिगत वीजवाहिन्यांसाठी नव्याने बांधण्यात आलेल्या रस्त्यांवर खोदकाम केले जात आहे.>रस्ते बांधण्यापूर्वीपरिसरातील जलवाहिनी, वीजवाहिन्यांबाबत योग्य नियोजन होणे आवश्यक आहे. मात्र नियोजनात त्रुटी राहिल्याने कोट्यवधी खर्चून बांधलेल्या रस्त्यांवर खोदकाम होताना दिसत आहे. यासंदर्भात पनवेल महालिकेचे शहर अभियंता संजय कटेकर यांच्याकडे विचारणा केली असता, सध्या परिसरातील खोदकाम थांबविल्याचे त्यांनी सांगितले.>खारघर-तळोजा रस्त्याची दुरवस्थाखारघर शहरातून तळोजा गावात जाणाºया रस्त्याची सध्या दुरवस्था झाली आहे. या ठिकाणी पाइपलाइन टाकण्याच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक सेलचे फारूक पटेल यांनी सिडकोचे खारघर विभागाचे प्रशासक सीताराम रोकडे यांना निवेदन देऊन लवकरात लवकर रस्त्याची डागडुजी करण्याची विनंती केली आहे.खारघर शहर स्मार्ट सिटी करण्याचा सिडकोचा मानस आहे. मात्र शहरालगत असलेली गावे, वाड्या अद्याप मूलभूत सोयी-सुविधांपासून वंचित आहेत. तळोजा गावाकडे जाणाºया रस्त्याची दुरवस्था झाल्याने ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. तसेच अंदाज न आल्याने वाहनांच्या अपघाताचाही धोका वाढल्याचे चालकांचे म्हणणे आहे. या रस्त्याची लवकरात लवकर डागडुजी न केल्यास आंदोलनाचा मार्ग अवलंबवावा लागेल, असा इशारा या वेळी पटेल यांनी दिला आहे.