शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

नियोजनाअभावी कोट्यवधी वाया,जलवाहिनीसाठी काँक्रिटच्या रस्त्याचे पुन्हा खोदकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 02:49 IST

पनवेल शहरात एमएमआरडीएच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये खर्चून रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे.

पनवेल : पनवेल शहरात एमएमआरडीएच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये खर्चून रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. मात्र शहरात अमृत योजनेअंतर्गत सुरू असलेल्या जलवाहिनीच्या कामासाठी रस्त्यांचे खोदकाम केले जात आहे. त्यामुळे काँक्रिटीकरणासाठी खर्च करण्यात आलेले कोट्यवधी रुपये पाण्यात गेल्याने स्थानिक नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.पनवेल शहरात उरण नाका रोडवर शनिवारी खोदकाम करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून खड्डेमय असलेल्या या रस्त्याचे अवघ्या काही महिन्यांपूर्वी काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे स्थानिकांनी समाधान व्यक्त केले होते. मात्र अमृत योजनेअंतर्गत जलवाहिनी टाकण्यासाठी रस्त्यावर शनिवारपासून खोदकामास सुरुवात करण्यातआली.पनवेल महपालिकेकडून स्वच्छ, सुंदर शहरासाठी अनेक उपक्रम राबविले जात आहेत. त्यात स्वच्छ शहराबरोबरच सुशोभीकरणावरही भर दिला जात आहे. शहरातील भिंती रंगविण्यात आल्या आहेत. मात्र स्मार्ट सिटी म्हणून शहराचा विकास करताना नियोजनातील त्रुटीमुळे कधी केबल टाकण्यासाठी तर कधी जलवाहिनी, भूमिगत वीजवाहिन्यांसाठी नव्याने बांधण्यात आलेल्या रस्त्यांवर खोदकाम केले जात आहे.>रस्ते बांधण्यापूर्वीपरिसरातील जलवाहिनी, वीजवाहिन्यांबाबत योग्य नियोजन होणे आवश्यक आहे. मात्र नियोजनात त्रुटी राहिल्याने कोट्यवधी खर्चून बांधलेल्या रस्त्यांवर खोदकाम होताना दिसत आहे. यासंदर्भात पनवेल महालिकेचे शहर अभियंता संजय कटेकर यांच्याकडे विचारणा केली असता, सध्या परिसरातील खोदकाम थांबविल्याचे त्यांनी सांगितले.>खारघर-तळोजा रस्त्याची दुरवस्थाखारघर शहरातून तळोजा गावात जाणाºया रस्त्याची सध्या दुरवस्था झाली आहे. या ठिकाणी पाइपलाइन टाकण्याच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक सेलचे फारूक पटेल यांनी सिडकोचे खारघर विभागाचे प्रशासक सीताराम रोकडे यांना निवेदन देऊन लवकरात लवकर रस्त्याची डागडुजी करण्याची विनंती केली आहे.खारघर शहर स्मार्ट सिटी करण्याचा सिडकोचा मानस आहे. मात्र शहरालगत असलेली गावे, वाड्या अद्याप मूलभूत सोयी-सुविधांपासून वंचित आहेत. तळोजा गावाकडे जाणाºया रस्त्याची दुरवस्था झाल्याने ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. तसेच अंदाज न आल्याने वाहनांच्या अपघाताचाही धोका वाढल्याचे चालकांचे म्हणणे आहे. या रस्त्याची लवकरात लवकर डागडुजी न केल्यास आंदोलनाचा मार्ग अवलंबवावा लागेल, असा इशारा या वेळी पटेल यांनी दिला आहे.