शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

एपीएमसी फळ मार्केटसमोर कचऱ्याचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 02:31 IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ मार्केटसमोर अनधिकृत फेरीवाल्यांमुळे कच-याचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ मार्केटसमोर अनधिकृत फेरीवाल्यांमुळे कच-याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. एपीएमसी परिसरामध्ये रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वारंवार पत्रव्यवहार करूनही महापालिका प्रशासन ठोस कारवाई करत नसल्याने व्यापाºयांसह कामगारांनी नाराजी व्यक्त केली आहे.महापालिका आयुक्तपदावरून तुकाराम मुंढे यांची बदली झाल्यापासून अनधिकृत फेरीवाल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. एपीएमसी वाहतूक पोलीस चौकीपासून माथाडीभवनकडे जाणाºया रोडवरही फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. फळ मार्केटच्या समोरच मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात आहे. कचºयामुळे प्रचंड दुर्गंधी पसरू लागली आहे.द फ्रूट अँड मर्चंट असोसिएशनने याविषयी तुर्भे विभाग कार्यालयाकडे २० पेक्षा जास्त वेळा पत्रव्यवहार केला आहे. येथील फेरीवाले हटविण्यात यावेत. सर्व्हिस रोड अतिक्रमणमुक्त केला जावा अशी मागणी केली आहे. परंतु तुर्भे विभाग कार्यालयाला हा परिसर फेरीवालामुक्त करण्यात यश आलेले नाही. विभाग कार्यालयातील कर्मचाºयांच्या निष्काळजीपणामुळेच या परिसरातील अतिक्रमण वाढत असल्याचा आरोप होवू लागला आहे.कचºयामुळे बाजार समिती परिसरात साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रोगराई पसरल्यानंतर महापालिका कारवाई करणार का असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. महापालिका आयुक्त रामास्वामी एन. यांनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणीही केली जात आहे.>फळ मार्केटच्या समोर अनधिकृत फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. मोठ्याप्रमाणात कचरा याठिकाणी टाकला जात आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी आम्ही महापालिकेकडे वारंवार पत्रव्यवहार केला आहे.- संजय पानसरे, व्यापारी प्रतिनिधी>मुुंढे बरे होतेमहापालिका आयुक्तपदावर तुकाराम मुुंढे असताना फळ मार्केटसमोरील अनधिकृत फेरीवाल्यांवर ठोस कारवाई केली होती. ते नवी मुंबईमध्ये असेपर्यंत पोलीस चौकी ते माथाडीभवन परिसर अतिक्रमणमुक्त झाला होता. त्यांच्या बदलीनंतर फेरीवाल्यांवर वचक राहिला नसून मुंढे बरे होते, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.