शहरं
Join us  
Trending Stories
1
मेक्सिकोमध्ये GenZचे जोरदार आंदोलन, तरूण रस्त्यावर का उतरले? इतका तीव्र संताप कशासाठी?
2
Shubman Gill Hospitalised : शुभमन गिलला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ; BCCI नं दिली मोठी अपडेट
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील.
4
पाकिस्तानची सौदी अरेबियानंतर आता आणखी एका मुस्लिम देशाशी हातमिळवणी? नवा 'प्लॅन' काय?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना घवघवीत यश, मनसोक्त जगण्याचा काळ; नोकरीत प्रगती, इच्छापूर्ती!
6
'प्रेम? ही तर ओव्हररेटेड भावना', धनुषच्या उत्तराने सर्वच चकित; क्रिती म्हणाली, 'मला नाही वाटत...'
7
'वाराणसी' एस एस राजामौलींच्या सिनेमाचं टायटल घोषित, महेश बाबूचा व्हिडीओ टीझर आऊट
8
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
9
Kalyan: रेल्वेतून पडून जखमी; डॉक्टरांनी घरी पाठवले, काही तासांत मृत्यू!
10
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
11
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
12
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
13
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
14
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
15
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
16
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
17
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
18
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
19
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
20
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
Daily Top 2Weekly Top 5

एपीएमसी फळ मार्केटसमोर कचऱ्याचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 02:31 IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ मार्केटसमोर अनधिकृत फेरीवाल्यांमुळे कच-याचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ मार्केटसमोर अनधिकृत फेरीवाल्यांमुळे कच-याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. एपीएमसी परिसरामध्ये रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वारंवार पत्रव्यवहार करूनही महापालिका प्रशासन ठोस कारवाई करत नसल्याने व्यापाºयांसह कामगारांनी नाराजी व्यक्त केली आहे.महापालिका आयुक्तपदावरून तुकाराम मुंढे यांची बदली झाल्यापासून अनधिकृत फेरीवाल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. एपीएमसी वाहतूक पोलीस चौकीपासून माथाडीभवनकडे जाणाºया रोडवरही फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. फळ मार्केटच्या समोरच मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात आहे. कचºयामुळे प्रचंड दुर्गंधी पसरू लागली आहे.द फ्रूट अँड मर्चंट असोसिएशनने याविषयी तुर्भे विभाग कार्यालयाकडे २० पेक्षा जास्त वेळा पत्रव्यवहार केला आहे. येथील फेरीवाले हटविण्यात यावेत. सर्व्हिस रोड अतिक्रमणमुक्त केला जावा अशी मागणी केली आहे. परंतु तुर्भे विभाग कार्यालयाला हा परिसर फेरीवालामुक्त करण्यात यश आलेले नाही. विभाग कार्यालयातील कर्मचाºयांच्या निष्काळजीपणामुळेच या परिसरातील अतिक्रमण वाढत असल्याचा आरोप होवू लागला आहे.कचºयामुळे बाजार समिती परिसरात साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रोगराई पसरल्यानंतर महापालिका कारवाई करणार का असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. महापालिका आयुक्त रामास्वामी एन. यांनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणीही केली जात आहे.>फळ मार्केटच्या समोर अनधिकृत फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. मोठ्याप्रमाणात कचरा याठिकाणी टाकला जात आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी आम्ही महापालिकेकडे वारंवार पत्रव्यवहार केला आहे.- संजय पानसरे, व्यापारी प्रतिनिधी>मुुंढे बरे होतेमहापालिका आयुक्तपदावर तुकाराम मुुंढे असताना फळ मार्केटसमोरील अनधिकृत फेरीवाल्यांवर ठोस कारवाई केली होती. ते नवी मुंबईमध्ये असेपर्यंत पोलीस चौकी ते माथाडीभवन परिसर अतिक्रमणमुक्त झाला होता. त्यांच्या बदलीनंतर फेरीवाल्यांवर वचक राहिला नसून मुंढे बरे होते, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.