शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

एपीएमसी फळ मार्केटसमोर कचऱ्याचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 02:31 IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ मार्केटसमोर अनधिकृत फेरीवाल्यांमुळे कच-याचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ मार्केटसमोर अनधिकृत फेरीवाल्यांमुळे कच-याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. एपीएमसी परिसरामध्ये रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वारंवार पत्रव्यवहार करूनही महापालिका प्रशासन ठोस कारवाई करत नसल्याने व्यापाºयांसह कामगारांनी नाराजी व्यक्त केली आहे.महापालिका आयुक्तपदावरून तुकाराम मुंढे यांची बदली झाल्यापासून अनधिकृत फेरीवाल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. एपीएमसी वाहतूक पोलीस चौकीपासून माथाडीभवनकडे जाणाºया रोडवरही फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. फळ मार्केटच्या समोरच मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात आहे. कचºयामुळे प्रचंड दुर्गंधी पसरू लागली आहे.द फ्रूट अँड मर्चंट असोसिएशनने याविषयी तुर्भे विभाग कार्यालयाकडे २० पेक्षा जास्त वेळा पत्रव्यवहार केला आहे. येथील फेरीवाले हटविण्यात यावेत. सर्व्हिस रोड अतिक्रमणमुक्त केला जावा अशी मागणी केली आहे. परंतु तुर्भे विभाग कार्यालयाला हा परिसर फेरीवालामुक्त करण्यात यश आलेले नाही. विभाग कार्यालयातील कर्मचाºयांच्या निष्काळजीपणामुळेच या परिसरातील अतिक्रमण वाढत असल्याचा आरोप होवू लागला आहे.कचºयामुळे बाजार समिती परिसरात साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रोगराई पसरल्यानंतर महापालिका कारवाई करणार का असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. महापालिका आयुक्त रामास्वामी एन. यांनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणीही केली जात आहे.>फळ मार्केटच्या समोर अनधिकृत फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. मोठ्याप्रमाणात कचरा याठिकाणी टाकला जात आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी आम्ही महापालिकेकडे वारंवार पत्रव्यवहार केला आहे.- संजय पानसरे, व्यापारी प्रतिनिधी>मुुंढे बरे होतेमहापालिका आयुक्तपदावर तुकाराम मुुंढे असताना फळ मार्केटसमोरील अनधिकृत फेरीवाल्यांवर ठोस कारवाई केली होती. ते नवी मुंबईमध्ये असेपर्यंत पोलीस चौकी ते माथाडीभवन परिसर अतिक्रमणमुक्त झाला होता. त्यांच्या बदलीनंतर फेरीवाल्यांवर वचक राहिला नसून मुंढे बरे होते, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.