शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

‘वॉक वुईथ कमिशनर’चा करिष्मा ओसरला

By admin | Updated: January 31, 2017 03:48 IST

पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या ‘वॉक वुईथ कमिशनर’ उपक्रमाचा करिष्मा ओसरला आहे. नेरूळमध्ये झालेल्या उपक्रमामध्ये फक्त २२ जणांनी तक्रारी सादर केल्या

- नामदेव मोरे,  नवी मुंबई पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या ‘वॉक वुईथ कमिशनर’ उपक्रमाचा करिष्मा ओसरला आहे. नेरूळमध्ये झालेल्या उपक्रमामध्ये फक्त २२ जणांनी तक्रारी सादर केल्या आहेत. नागरिकांपेक्षा पालिकेचे अधिकारी, कर्मचारी व सुरक्षा रक्षकांची संख्याच जास्त असल्याचे निदर्शनास आले. पण प्रशासनाने मात्र नागरिकांचा उत्साही प्रतिसाद मिळाल्याचे सांगत अपयशावर पडदा टाकण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. सोलापूरमध्ये जिल्हाधिकारी म्हणून धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या तुकाराम मुंढे यांची नवी मुंबई महापालिका आयुक्तपदी निवड झाल्यानंतर त्यांच्या कार्यशैलीविषयी प्रचंड उत्सुकता होती. नागरिकांशी संवाद साधण्यासाठी २९ मे रोजी सीबीडीमध्ये वॉक वुईथ कमिशनर उपक्रम सुरू केला. त्यास नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. सुरवातीला काही महिने या उपक्रमाचे स्वागत झाले. नागरिक गटारावरील उघड्या झाकणांपासून ते अतिक्रमणापर्यंत अनेक प्रश्न घेवून या उपक्रमास सकाळी हजर होवू लागले होते. सकाळी साडेसहा वाजता शहरातील एका उद्यानामध्ये आयुक्त नागरिकांना भेटतात. प्रथम नागरिकांसोबत पूर्ण उद्यानामध्ये एक फेरी मारली जाते. नंतर तयार केलेल्या व्यासपीठावर उभे राहून आयुक्त नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेत. अतिक्रमण व इतर काही तक्रारी असल्यास तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात यायचे. एखादी तक्रारी योग्य नसेल तर संबंधितांना धोरवर धरले जात असे. सुरवातीला आयुक्तांच्या स्पष्टवक्तेपणाचे सर्वांनाच कौतुक होते. पण नंतर वॉक वुईथ कमिशनरमध्ये संवाद थांबला व आयुक्तांच्या आदेशालाच महत्त्व प्राप्त झाल्याने नागरिकांचा उत्साह सुद्धा मावळला. तक्रारींचे प्रमाण कमी झाले. केलेल्या तक्रारींवर योग्य कार्यवाही होईना झाली. यामुळे या उपक्रमाला गांभीर्यच उरले नाही. आयुक्त येतच आहेत तर काही तक्रारी देवून टाकू या अशी औपचारिकता शिल्लक राहिली. नेरूळ सेक्टर १९ मधील वॉक वुईथ कमिशनर उपक्रमामध्ये फक्त २२ नागरिकांनी त्यांचे अर्ज सादर केले आहेत. वास्तविक चौथा शनिवार असल्याने महापालिकेला सुटी असते. सुटीवर पाणी सोडून शहर अभियंता ते विभाग अधिकारी, सफाई कामगार ते सुरक्षा रक्षकांपर्यंत पालिकेचे कर्मचारी सकाळी साडेसहा वाजता हजर राहिले होते. पोलिसांचा बंदोबस्त कमी झाल्याने यावेळी बोर्डाच्या सुरक्षा रक्षकांना तैनात केले होते. पालिकेच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांएवढे तक्रारदार नसल्याने आयुक्तांचा करिष्मा ओसरल्याची चर्चा आहे. या उपक्रमात नागरिकांचे मत ऐकण्याऐवजी आयुक्तांचीच भाषणबाजी ऐकावी लागत असल्याने नागरिक उपक्रमाकडे फिरकत नसल्याचे निदर्शनास आले आहे. पारदर्शकता नाही ‘वॉक वुईथ कमिशनर’ उपक्रम पूर्णपणे अपयशी ठरला आहे. या उपक्रमासाठी पालिकेचे अधिकारी, कर्मचाऱ्यांना वेठीस धरले जात आहे. सुटीच्या दिवशीही सकाळी साडेसहा वाजता बोलावले जात आहे. २९ मेपासून आलेले अर्ज व केलेली कार्यवाही याविषयी सर्व तपशील नागरिकांना पाहण्यासाठी खुला केला तर हा उपक्रम यशस्वी झाला की अपयशी ते स्पष्ट होईल असे मत व्यक्त केले जात आहे. सगळी यंत्रणा वेठीस धरण्यापेक्षा नियमितपणे नागरिकांच्या तक्रारींचे निवारण होईल अशी कायमस्वरूपी यंत्रणा तयार करण्याची मागणीही होवू लागली आहे.