शहरं
Join us  
Trending Stories
1
"नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
2
"भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
3
“नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
4
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
5
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
6
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
7
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
8
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
9
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
10
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
11
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
12
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
13
IND vs WI, 1st Test Day 1 Stumps : KL राहुल लंगडताना दिसला; कुलदीप पॅड बांधून बॅटिंगसाठी नटला,पण...
14
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
15
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 
16
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”
17
"सर्व प्रॉपर्टी देऊन टाका…!" निर्दयी सुनेची वृद्ध सासूला अमानुष मारहाण, केस ओढत केली शिवीगाळ; VIDEO पाहून तुमचाही संताप उडेल
18
Chaitanyananda Saraswati : डर्टी गेम! चैतन्यनंद सरस्वतीच्या मठात सेक्स टॉय, अश्लील CD; दिल्ली ते दुबईपर्यंत नेटवर्क
19
Zubeen Garg : स्कूबा डायव्हिंगमुळे नाही तर.... कसा झाला सिंगर झुबीन गर्गचा मृत्यू? आता मोठा खुलासा
20
VIDEO: बापरे... अगदी सहज उंच बिल्डिंगवरून तरूणाने स्विमिंग पूलमध्ये मारली उडी अन् मग...

शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: January 21, 2016 02:44 IST

तालुक्यात २४ जून २०१५ ला सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पाऊस झाला होता. यावेळी आसल ग्रामपंचायतीच्या हद्दीतील एका शेतकऱ्याच्या शेतात असलेल्या घराचे मोठ्या

कर्जत : तालुक्यात २४ जून २०१५ ला सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पाऊस झाला होता. यावेळी आसल ग्रामपंचायतीच्या हद्दीतील एका शेतकऱ्याच्या शेतात असलेल्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्या शेतकऱ्याला शासनाकडून कोणतीही मदत मिळाली नसून अनेक अडथळे शासकीय पातळीवर समोर केले जात आहेत. वडवली येथील मारु ती काशिनाथ तळपे या शेतकऱ्याने आता कोणाकडे हात पुढे करायचा असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तळपे वडवली येथील मारु ती तलपे यांचे शेतात बांधलेले घराचे सिमेंट पत्रे उडून गेले होते आणि भिंती कोसळल्या होत्या. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसात घराचे प्रचंड नुकसान झालेल्या जागेचा पंचनामा त्यावेळी माणगाव तलाठी सोंडकर यांनी केला होता. त्यावेळी शासकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासन नेरळ मंडल अधिकाऱ्यांनी दिले होते. परंतु सरकारी निर्णय क्र .सीएलएस /२४८३६१- क ६२० /म ३, ३१ जानेवारी १९८३ नुसार त्या दिवशीचे किमान पर्जन्य ६५ मिमी पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. मात्र २४ जूनला पर्जन्य नोंदणीनुसार पावसाची नोंद ६३ मिमी असल्याने त्यांचा अर्ज निकाली काढून नुकसान भरपाई देता येणार नाही असे पत्र दिले आहे. त्यामुळे तळपे यांना नुकसान भरपाईपासून वंचित राहावे लागणार आहे. जून २०१५ मध्ये कर्जत तालुक्यात वादळी वाऱ्यात अनेक घरांचे नुकसान झाले होते. त्यासर्वांचे प्रस्ताव फेटाळण्यात आले आहेत. जोरदार पावसात मोठ्या प्रमाणात घरांचे नुकसान झाले होते. त्या सर्वांना भरपाई मिळालेली नसल्याने ते नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. त्यातील वडवली येथील मारु ती तळपे यांचे घराचे नुकसान होऊन विटा, पत्रे, पाइप, तांदूळ, भांडी यांचे प्रचंड नुकसान झाले होते आणि त्यांचे कुटुंब रस्त्यावर आले होते. महसूल खात्याकडे देण्यात आलेल्या पंचनामा अहवालात सुमारे १ लाख ४ हजार २००रु पयांचे नुकसान झाल्याचा अहवाल कर्जत तहसील कार्यालयात पाठविण्यात आला होता. परंतु पावसाची नोंद कमी असल्याचे दाखवून त्यांचा अर्ज निकाली काढण्यात आला आहे. याबाबत मारु ती तळपे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्जाद्वारे घराचे प्रचंड नुकसान होऊन काहीच भरपाई मिळालेली नाही. तरी अर्जाचा विचार करून थोड्या प्रमाणात का होईना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)