शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: January 21, 2016 02:44 IST

तालुक्यात २४ जून २०१५ ला सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पाऊस झाला होता. यावेळी आसल ग्रामपंचायतीच्या हद्दीतील एका शेतकऱ्याच्या शेतात असलेल्या घराचे मोठ्या

कर्जत : तालुक्यात २४ जून २०१५ ला सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पाऊस झाला होता. यावेळी आसल ग्रामपंचायतीच्या हद्दीतील एका शेतकऱ्याच्या शेतात असलेल्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्या शेतकऱ्याला शासनाकडून कोणतीही मदत मिळाली नसून अनेक अडथळे शासकीय पातळीवर समोर केले जात आहेत. वडवली येथील मारु ती काशिनाथ तळपे या शेतकऱ्याने आता कोणाकडे हात पुढे करायचा असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तळपे वडवली येथील मारु ती तलपे यांचे शेतात बांधलेले घराचे सिमेंट पत्रे उडून गेले होते आणि भिंती कोसळल्या होत्या. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसात घराचे प्रचंड नुकसान झालेल्या जागेचा पंचनामा त्यावेळी माणगाव तलाठी सोंडकर यांनी केला होता. त्यावेळी शासकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासन नेरळ मंडल अधिकाऱ्यांनी दिले होते. परंतु सरकारी निर्णय क्र .सीएलएस /२४८३६१- क ६२० /म ३, ३१ जानेवारी १९८३ नुसार त्या दिवशीचे किमान पर्जन्य ६५ मिमी पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. मात्र २४ जूनला पर्जन्य नोंदणीनुसार पावसाची नोंद ६३ मिमी असल्याने त्यांचा अर्ज निकाली काढून नुकसान भरपाई देता येणार नाही असे पत्र दिले आहे. त्यामुळे तळपे यांना नुकसान भरपाईपासून वंचित राहावे लागणार आहे. जून २०१५ मध्ये कर्जत तालुक्यात वादळी वाऱ्यात अनेक घरांचे नुकसान झाले होते. त्यासर्वांचे प्रस्ताव फेटाळण्यात आले आहेत. जोरदार पावसात मोठ्या प्रमाणात घरांचे नुकसान झाले होते. त्या सर्वांना भरपाई मिळालेली नसल्याने ते नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. त्यातील वडवली येथील मारु ती तळपे यांचे घराचे नुकसान होऊन विटा, पत्रे, पाइप, तांदूळ, भांडी यांचे प्रचंड नुकसान झाले होते आणि त्यांचे कुटुंब रस्त्यावर आले होते. महसूल खात्याकडे देण्यात आलेल्या पंचनामा अहवालात सुमारे १ लाख ४ हजार २००रु पयांचे नुकसान झाल्याचा अहवाल कर्जत तहसील कार्यालयात पाठविण्यात आला होता. परंतु पावसाची नोंद कमी असल्याचे दाखवून त्यांचा अर्ज निकाली काढण्यात आला आहे. याबाबत मारु ती तळपे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्जाद्वारे घराचे प्रचंड नुकसान होऊन काहीच भरपाई मिळालेली नाही. तरी अर्जाचा विचार करून थोड्या प्रमाणात का होईना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)