शहरं
Join us  
Trending Stories
1
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
2
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
3
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
4
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
5
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
6
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
7
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
8
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
9
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
10
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
11
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
12
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
13
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
14
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
15
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
16
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
17
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
18
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
19
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
20
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!

शेतकऱ्यांना प्रतीक्षा भरपाईची, शासनाकडून निधी येण्यास विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 01:13 IST

कर्जतमधील ८८३२ शेतकरी : शासनाकडून निधी येण्यास विलंब होत असल्याने नाराजी

कांता हाबळे

नेरळ : शासनाने २७ नोव्हेंबर २०१९ रोजी अवकाळी पावसाळ्यामुळे भातपिकाच्या नुकसानीबद्दल मदतीचा पहिला टप्पा म्हणून १६१२ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदत जमा केली होती. मात्र त्यानंतर शेतीचे पंचनामे झालेल्या ८४३२ शेतकºयांना अद्याप शासनाची मदत मिळालेली नाही. २७ नोव्हेंबर रोजी राज्यात सरकार स्थापन नव्हते आणि त्या वेळी शेतकºयांना मदत झाली, पण सरकार स्थापन झाल्यानंतर मात्र शेतकरी नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत आहेत.

कर्जत तालुक्यातील २९४२ हेक्टर जमिनीवरील भातशेतीचे नुकसान झाले आहे. त्यात तालुक्यातील १०,०४६ शेतकºयांच्या शेतातील भाताचे, नागली, वरी या पिकाचे नुकसान झाले होते. कर्जत तालुक्यातील सप्टेंबर आणि आॅक्टोबर महिन्यात झालेल्या भातशेतीचे नुकसान सरत्या पावसाने केले. त्या नुकसानीबद्दल शासनाने हेक्टरी ८००० ची मदत जाहीर केली होती. त्यावेळी पंचनाम्यानुसार कर्जत तालुक्यात १०,०४६ शेतकºयांचे नुकसान झाल्याची नोंद आहे. नुकसानग्रस्त शेतकºयांना महसूल विभागाकडून पहिल्या टप्प्यात २७ नोव्हेंबर २०१९ रोजी मदत देण्यात आली होती. त्यावेळी १,६१२ शेतकºयांना त्यांच्या शेतीच्या नुकसानीची मदत त्यांच्या बँक खात्यावर जमा केली गेली होती. त्यावेळी शासनाकडून ५८,१०, ३१३ एवढी रक्कम बँक खात्यात जमा केली होती. आता उर्वरित नुकसानग्रस्त शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. कर्जत तालुक्यातील मदत पोहचली नसलेल्या उर्वरित ८४३२ नुकसानग्रस्त शेतकºयांना मदतीसाठी आवश्यक असलेली २ कोटी रकमेची मागणी कर्जत तहसील कार्यालयाने रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.शेतकºयांना शासनाने हेक्टरी ८००० रुपयांचे अनुदान मदतीनिधी देण्याचे निश्चित केले आहे. ज्यावेळी शासनाने नुकसान भरपाईची मदत जाहीर केली, त्यावेळी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होती आणि राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी ती मदत जाहीर केली होती. पण ती मदत अपुरी असल्याची भावना शेतकºयांनी व्यक्त केली होती. परंतु नवीन सरकार सत्तेवर आल्यावर त्यात वाढ होईल, अशी शेतकºयांना अपेक्षा होती. पण कर्जत तालुक्यातील ८० टक्के शेतकरी यांना हेक्टरी ८००० प्रमाणे जाहीर झालेली भरपाई मदत अद्याप पोहोचली नाही.बळीराजा संकटातच्२७ नोव्हेंबरनंतर उर्वरित शेतकºयांच्या बँक खात्यात लगेच नुकसानभरपाईची मदत दिली जाईल, असे कर्जत तहसील कार्यालयाकडून जाहीर करण्यात आले होते. मात्र २५ दिवसांचा कालावधी लोटला तरी शासनाची मदत काही नुकसानग्रस्त शेतकºयांच्या बँक खात्यात जमा झाली नाही. यामुळे बळीराजा संकटात आला आहे.पंचनामे झालेल्या सर्व शेतकºयांच्या आधार कार्ड, बँक डिटेल्स आणि सातबारा उतारा यांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवली आहे. आमच्या कार्यालयाकडून मदतीबद्दल कोणतीही कसर शिल्लक नाही. मात्र मदत प्राप्त झाल्यानंतर काही तासांत ती मदत शेतकºयांच्या बँक खात्यात जमा होऊ शकते असे नियोजन केले आहे.- विक्रम देशमुख, तहसीलदार, कर्जत 

टॅग्स :RaigadरायगडNavi Mumbaiनवी मुंबईFarmerशेतकरी