शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
2
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच घेतली
3
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
4
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
5
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
6
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
7
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
8
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
9
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
10
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
11
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
12
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
13
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
14
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
15
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
16
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
17
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
18
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
19
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)

शेतकऱ्यांना प्रतीक्षा भरपाईची, शासनाकडून निधी येण्यास विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 01:13 IST

कर्जतमधील ८८३२ शेतकरी : शासनाकडून निधी येण्यास विलंब होत असल्याने नाराजी

कांता हाबळे

नेरळ : शासनाने २७ नोव्हेंबर २०१९ रोजी अवकाळी पावसाळ्यामुळे भातपिकाच्या नुकसानीबद्दल मदतीचा पहिला टप्पा म्हणून १६१२ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदत जमा केली होती. मात्र त्यानंतर शेतीचे पंचनामे झालेल्या ८४३२ शेतकºयांना अद्याप शासनाची मदत मिळालेली नाही. २७ नोव्हेंबर रोजी राज्यात सरकार स्थापन नव्हते आणि त्या वेळी शेतकºयांना मदत झाली, पण सरकार स्थापन झाल्यानंतर मात्र शेतकरी नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत आहेत.

कर्जत तालुक्यातील २९४२ हेक्टर जमिनीवरील भातशेतीचे नुकसान झाले आहे. त्यात तालुक्यातील १०,०४६ शेतकºयांच्या शेतातील भाताचे, नागली, वरी या पिकाचे नुकसान झाले होते. कर्जत तालुक्यातील सप्टेंबर आणि आॅक्टोबर महिन्यात झालेल्या भातशेतीचे नुकसान सरत्या पावसाने केले. त्या नुकसानीबद्दल शासनाने हेक्टरी ८००० ची मदत जाहीर केली होती. त्यावेळी पंचनाम्यानुसार कर्जत तालुक्यात १०,०४६ शेतकºयांचे नुकसान झाल्याची नोंद आहे. नुकसानग्रस्त शेतकºयांना महसूल विभागाकडून पहिल्या टप्प्यात २७ नोव्हेंबर २०१९ रोजी मदत देण्यात आली होती. त्यावेळी १,६१२ शेतकºयांना त्यांच्या शेतीच्या नुकसानीची मदत त्यांच्या बँक खात्यावर जमा केली गेली होती. त्यावेळी शासनाकडून ५८,१०, ३१३ एवढी रक्कम बँक खात्यात जमा केली होती. आता उर्वरित नुकसानग्रस्त शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. कर्जत तालुक्यातील मदत पोहचली नसलेल्या उर्वरित ८४३२ नुकसानग्रस्त शेतकºयांना मदतीसाठी आवश्यक असलेली २ कोटी रकमेची मागणी कर्जत तहसील कार्यालयाने रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.शेतकºयांना शासनाने हेक्टरी ८००० रुपयांचे अनुदान मदतीनिधी देण्याचे निश्चित केले आहे. ज्यावेळी शासनाने नुकसान भरपाईची मदत जाहीर केली, त्यावेळी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होती आणि राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी ती मदत जाहीर केली होती. पण ती मदत अपुरी असल्याची भावना शेतकºयांनी व्यक्त केली होती. परंतु नवीन सरकार सत्तेवर आल्यावर त्यात वाढ होईल, अशी शेतकºयांना अपेक्षा होती. पण कर्जत तालुक्यातील ८० टक्के शेतकरी यांना हेक्टरी ८००० प्रमाणे जाहीर झालेली भरपाई मदत अद्याप पोहोचली नाही.बळीराजा संकटातच्२७ नोव्हेंबरनंतर उर्वरित शेतकºयांच्या बँक खात्यात लगेच नुकसानभरपाईची मदत दिली जाईल, असे कर्जत तहसील कार्यालयाकडून जाहीर करण्यात आले होते. मात्र २५ दिवसांचा कालावधी लोटला तरी शासनाची मदत काही नुकसानग्रस्त शेतकºयांच्या बँक खात्यात जमा झाली नाही. यामुळे बळीराजा संकटात आला आहे.पंचनामे झालेल्या सर्व शेतकºयांच्या आधार कार्ड, बँक डिटेल्स आणि सातबारा उतारा यांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवली आहे. आमच्या कार्यालयाकडून मदतीबद्दल कोणतीही कसर शिल्लक नाही. मात्र मदत प्राप्त झाल्यानंतर काही तासांत ती मदत शेतकºयांच्या बँक खात्यात जमा होऊ शकते असे नियोजन केले आहे.- विक्रम देशमुख, तहसीलदार, कर्जत 

टॅग्स :RaigadरायगडNavi Mumbaiनवी मुंबईFarmerशेतकरी