शहरं
Join us  
Trending Stories
1
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
2
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पिहिली प्रतिक्रिया 
3
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
4
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
5
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
6
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
7
U19 Asia Cup 2025 : कोण आहे Aaron George? पाक विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियासाठी ठरला ‘संकटमोचक’
8
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
9
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
10
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
11
Pune Crime: "अमोलला सोड, माहेरी जा; नाही गेली तर तुला..."; विवाहितेला पतीच्या गर्लफ्रेंडकडून धमकी, प्रकरण काय?
12
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
13
Nitin Nabin: चार वेळा आमदार, बिहारमध्ये मंत्री; भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नबीन कोण आहेत?
14
सिडनी येथे जगप्रसिद्ध बॉन्डी बीचवर अंदाधुंद गोळीबार; दोन हल्लेखोर ताब्यात, १० पर्यटकांचा जीव घेतला
15
लियोनेल मेस्सीला भेटून खूश झाली करीना कपूरची दोन्ही मुलंं, फुटबॉलपटूसोबत फोटो व्हायरल
16
IND vs SA T20I : टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हममधून जसप्रीत बुमराह OUT; कारण...
17
बंगालमध्ये बिहारपेक्षाही अधिक मतांना कात्री, आकडा ५८ लाखांवर; टॉप-5 मध्ये ममतांचाही मतदारसंघ! TMC चं टेन्शन वाढणार?
18
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
19
पीएम सूर्य घर : मोफत वीज योजनेसाठी कसा करायचा ऑनलाईन अर्ज? सोपी आहे पद्धत, एका क्लिकवर जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस
20
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना प्रतीक्षा भरपाईची, शासनाकडून निधी येण्यास विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 01:13 IST

कर्जतमधील ८८३२ शेतकरी : शासनाकडून निधी येण्यास विलंब होत असल्याने नाराजी

कांता हाबळे

नेरळ : शासनाने २७ नोव्हेंबर २०१९ रोजी अवकाळी पावसाळ्यामुळे भातपिकाच्या नुकसानीबद्दल मदतीचा पहिला टप्पा म्हणून १६१२ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदत जमा केली होती. मात्र त्यानंतर शेतीचे पंचनामे झालेल्या ८४३२ शेतकºयांना अद्याप शासनाची मदत मिळालेली नाही. २७ नोव्हेंबर रोजी राज्यात सरकार स्थापन नव्हते आणि त्या वेळी शेतकºयांना मदत झाली, पण सरकार स्थापन झाल्यानंतर मात्र शेतकरी नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत आहेत.

कर्जत तालुक्यातील २९४२ हेक्टर जमिनीवरील भातशेतीचे नुकसान झाले आहे. त्यात तालुक्यातील १०,०४६ शेतकºयांच्या शेतातील भाताचे, नागली, वरी या पिकाचे नुकसान झाले होते. कर्जत तालुक्यातील सप्टेंबर आणि आॅक्टोबर महिन्यात झालेल्या भातशेतीचे नुकसान सरत्या पावसाने केले. त्या नुकसानीबद्दल शासनाने हेक्टरी ८००० ची मदत जाहीर केली होती. त्यावेळी पंचनाम्यानुसार कर्जत तालुक्यात १०,०४६ शेतकºयांचे नुकसान झाल्याची नोंद आहे. नुकसानग्रस्त शेतकºयांना महसूल विभागाकडून पहिल्या टप्प्यात २७ नोव्हेंबर २०१९ रोजी मदत देण्यात आली होती. त्यावेळी १,६१२ शेतकºयांना त्यांच्या शेतीच्या नुकसानीची मदत त्यांच्या बँक खात्यावर जमा केली गेली होती. त्यावेळी शासनाकडून ५८,१०, ३१३ एवढी रक्कम बँक खात्यात जमा केली होती. आता उर्वरित नुकसानग्रस्त शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. कर्जत तालुक्यातील मदत पोहचली नसलेल्या उर्वरित ८४३२ नुकसानग्रस्त शेतकºयांना मदतीसाठी आवश्यक असलेली २ कोटी रकमेची मागणी कर्जत तहसील कार्यालयाने रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.शेतकºयांना शासनाने हेक्टरी ८००० रुपयांचे अनुदान मदतीनिधी देण्याचे निश्चित केले आहे. ज्यावेळी शासनाने नुकसान भरपाईची मदत जाहीर केली, त्यावेळी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होती आणि राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी ती मदत जाहीर केली होती. पण ती मदत अपुरी असल्याची भावना शेतकºयांनी व्यक्त केली होती. परंतु नवीन सरकार सत्तेवर आल्यावर त्यात वाढ होईल, अशी शेतकºयांना अपेक्षा होती. पण कर्जत तालुक्यातील ८० टक्के शेतकरी यांना हेक्टरी ८००० प्रमाणे जाहीर झालेली भरपाई मदत अद्याप पोहोचली नाही.बळीराजा संकटातच्२७ नोव्हेंबरनंतर उर्वरित शेतकºयांच्या बँक खात्यात लगेच नुकसानभरपाईची मदत दिली जाईल, असे कर्जत तहसील कार्यालयाकडून जाहीर करण्यात आले होते. मात्र २५ दिवसांचा कालावधी लोटला तरी शासनाची मदत काही नुकसानग्रस्त शेतकºयांच्या बँक खात्यात जमा झाली नाही. यामुळे बळीराजा संकटात आला आहे.पंचनामे झालेल्या सर्व शेतकºयांच्या आधार कार्ड, बँक डिटेल्स आणि सातबारा उतारा यांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवली आहे. आमच्या कार्यालयाकडून मदतीबद्दल कोणतीही कसर शिल्लक नाही. मात्र मदत प्राप्त झाल्यानंतर काही तासांत ती मदत शेतकºयांच्या बँक खात्यात जमा होऊ शकते असे नियोजन केले आहे.- विक्रम देशमुख, तहसीलदार, कर्जत 

टॅग्स :RaigadरायगडNavi Mumbaiनवी मुंबईFarmerशेतकरी