शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

रोपवेसाठी करावी लागतेय आठ तासांची प्रतीक्षा

By admin | Updated: November 16, 2015 02:18 IST

दिवाळीच्या सुट्टीनिमित्त रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड, हरिहरेश्वर, दिवेआगर या ठिकाणी पर्यटकांची तोबा गर्दी उसळत असतानाच श्री छत्रपती शिवरायांची राजधानी असलेल्या रायगड

महाड : दिवाळीच्या सुट्टीनिमित्त रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड, हरिहरेश्वर, दिवेआगर या ठिकाणी पर्यटकांची तोबा गर्दी उसळत असतानाच श्री छत्रपती शिवरायांची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याच्या दर्शनासाठी देखील पर्यटकांची पसंती असल्याचे गेल्या चार पाच दिवसांपासून गडावर होणाऱ्या गर्दीवरून दिसून येत आहे. रायगडातील समुद्र किनारे अक्षरश: हाऊसफुल्ल असून जिल्ह्यात हॉटेल आणि लॉजिंगचा व्यवसाय चांगलाच तेजीत आहेत.महाराष्ट्रासह गुजरात राज्यातील पर्यटकांनी मोठ्या प्रमाणावर रायगडच्या दर्शनासाठी येत असून गडावर जाण्या-येण्यासाठी रोप वेला सात ते आठ तासांची प्रतीक्षा पर्यटकांना करावी लागत आहे. आबालवृद्धांच्या सोईसाठी गडावर जाण्यायेण्यासाठी रोप वेची सुविधा असली तरी दररोज शेकडो पर्यटक हे चित्रदरवाजामार्गे पायऱ्यांनी पायी गडावर जात आहेत. गडावर पर्यटकांना राहण्याची गैरसोय होत असल्याने या पर्यटकांना महाड शहराच्या ठिकाणी रहावे लागत आहे. पायऱ्यांचा पथमार्ग अनेक ठिकाणी कोसळलेल्या अवस्थेत असल्याने गड चढताना अनेक पर्यटकांचे पाय घसरून जखमी होण्याच्या घटना घडत आहेत. तर कोसळलेल्या कठड्यांमुळे पर्यटकांना धोका निर्माण होत आहे. गडाची दुरवस्था तसेच गड परिसरात सुविधांचा अभाव यामुळे राज्यभरातून येणाऱ्या पर्यटकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.गडावर जाण्यासाठी सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री ११ वा. वाजेपर्यंत रोप वे सुरू ठेवण्यात येतो. सध्या दररोज सहा ते सात हजार पर्यटक रायगड किल्ल्याला भेट देत असून पार्र्किं गची व्यवस्था नसल्याने वाहतुकीचा खोळंबा होत आहे. महामार्गापासून महाड ते रायगड किल्ल्यापर्यंतच्या २७ किमी रस्त्यांची अक्षरश: चाळण झाल्याने प्रवास करताना प्रवासी हैराण होत आहेत.(वार्ताहर)