शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

रोपवेसाठी करावी लागतेय आठ तासांची प्रतीक्षा

By admin | Updated: November 16, 2015 02:18 IST

दिवाळीच्या सुट्टीनिमित्त रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड, हरिहरेश्वर, दिवेआगर या ठिकाणी पर्यटकांची तोबा गर्दी उसळत असतानाच श्री छत्रपती शिवरायांची राजधानी असलेल्या रायगड

महाड : दिवाळीच्या सुट्टीनिमित्त रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड, हरिहरेश्वर, दिवेआगर या ठिकाणी पर्यटकांची तोबा गर्दी उसळत असतानाच श्री छत्रपती शिवरायांची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याच्या दर्शनासाठी देखील पर्यटकांची पसंती असल्याचे गेल्या चार पाच दिवसांपासून गडावर होणाऱ्या गर्दीवरून दिसून येत आहे. रायगडातील समुद्र किनारे अक्षरश: हाऊसफुल्ल असून जिल्ह्यात हॉटेल आणि लॉजिंगचा व्यवसाय चांगलाच तेजीत आहेत.महाराष्ट्रासह गुजरात राज्यातील पर्यटकांनी मोठ्या प्रमाणावर रायगडच्या दर्शनासाठी येत असून गडावर जाण्या-येण्यासाठी रोप वेला सात ते आठ तासांची प्रतीक्षा पर्यटकांना करावी लागत आहे. आबालवृद्धांच्या सोईसाठी गडावर जाण्यायेण्यासाठी रोप वेची सुविधा असली तरी दररोज शेकडो पर्यटक हे चित्रदरवाजामार्गे पायऱ्यांनी पायी गडावर जात आहेत. गडावर पर्यटकांना राहण्याची गैरसोय होत असल्याने या पर्यटकांना महाड शहराच्या ठिकाणी रहावे लागत आहे. पायऱ्यांचा पथमार्ग अनेक ठिकाणी कोसळलेल्या अवस्थेत असल्याने गड चढताना अनेक पर्यटकांचे पाय घसरून जखमी होण्याच्या घटना घडत आहेत. तर कोसळलेल्या कठड्यांमुळे पर्यटकांना धोका निर्माण होत आहे. गडाची दुरवस्था तसेच गड परिसरात सुविधांचा अभाव यामुळे राज्यभरातून येणाऱ्या पर्यटकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.गडावर जाण्यासाठी सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री ११ वा. वाजेपर्यंत रोप वे सुरू ठेवण्यात येतो. सध्या दररोज सहा ते सात हजार पर्यटक रायगड किल्ल्याला भेट देत असून पार्र्किं गची व्यवस्था नसल्याने वाहतुकीचा खोळंबा होत आहे. महामार्गापासून महाड ते रायगड किल्ल्यापर्यंतच्या २७ किमी रस्त्यांची अक्षरश: चाळण झाल्याने प्रवास करताना प्रवासी हैराण होत आहेत.(वार्ताहर)