शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

नावेच गायब झाल्याने ठाण्यातील मतदार वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 01:27 IST

मतदार यादीत घोळ : कुटुंबियांची नावे वेगवेगळ्या मतदान केंद्रात

ठाणे : ठाणे शहरातील चरईतील मतदानकेंद्रांमध्ये मतदारांची नावेच मतदारयादीतून गायब झाल्यामुळे अनेकांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही. तर, पत्ता बदलल्याचे पत्र देऊनही एकाच घरातील पतीचे नाव नाही, तर पत्नी आणि मुलांची नावे आल्यानेही अशोक जैन (४८) या चरईतील मतदाराला मतदानापासून मुकावे लागल्यामुळे त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

चरईतील शांती पॅलेस येथे राहणाऱ्या अमृतबेन छाडवा (५८) आणि नानजी छाडवा (६३) या दाम्पत्याला मात्र मतदारयादीत नावच नसल्यामुळे मतदानाचा हक्क बजावता आला नाही. चरईतील दगडी शाळेत ते मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सोमवारी सकाळी ९ वाजता गेले होते. त्यांच्याकडे आधारकार्ड आणि इतर कागदपत्रेही होती. गेल्या ३० वर्षांपासून छाडवा कुटुंब चरईत वास्तव्याला आहे. गेल्या २०१४ च्या निवडणुकीत त्यांनी मतदान केलेले असतानाही यावेळी मात्र मतदारयादीतील नावच गायब झाल्यामुळे ते प्रचंड नाराज झाले होते. मतदारचिठ्ठी घेऊनही त्यांच्याकडे निवडणूक कार्यालयातील कोणी मतदान प्रतिनिधी (बीएलओ) फिरकले नसल्याचेही त्यांनी सांगितले. तर, अशोक जैन (४८) हे चरईतील ‘कृष्णा हेरिटेज’ या इमारतीमध्ये वास्तव्याला आहेत. त्यांनी पत्नी संतोषीदेवी (४६) तसेच चिराग (२६) आणि सुमित (२४) या दोन मुलांचाही पत्ता बदलल्याचे पत्र मे २०१८ मध्येच जिल्हा निवडणूक कार्यालयाकडे दिले होते. त्यानंतर, ‘आठ-ए’च्या फॉर्मची प्रक्रि या बाकी असल्याचे त्यांना एप्रिल २०१९ मध्ये सांगण्यात आले. विशेष म्हणजे त्यांच्या पत्नी आणि मुलांची नावे मतदारयादीत आली. पण, अशोक यांचे स्वत:चे नाव मात्र यादीत आलेच नाही. त्यामुळे त्यांनीही निवडणूक आयोगाच्या या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली.

चरईत राहणाºया राजेश पासूभाई लालका (५३) यांनाही असाच अनुभव आला. ते चरईतल्या दगडी शाळेत मतदानासाठी गेले. परंतु, त्यांचे राजेश पासूभाई शहा या नावाने यादीत नाव आले. लालका हे आधी मुलुंडमध्ये वास्तव्याला होते. त्यांनी ठाण्यात आल्यानंतर शहाऐवजी लालका असे नाव बदलले. या बदललेल्या नावाची त्यांनी जिल्हा निवडणूक कार्यालयाकडे नोंदही केली. लालका या नावानेच त्यांनी यापूर्वी मतदानही केले. पण, यावेळी त्यांना मतदारचिठ्ठी लालकाऐवजी शहा नावाने आली. अर्थात, शहा या नावाचे त्यांचे कोणतेच ओळखपत्र नाही. शिवाय, त्यांची पत्नी रीता राजेश लालका यांचेही पॅनकार्ड, आधारकार्ड आणि निवडणूक आयोगाचे ओळखपत्र हे लालका या आडनावानेच आहे. पण, केवळ आधी त्यांनी बदललेल्या शहा या नावाने मतदारचिठ्ठीत नाव आल्यामुळे त्यांना मतदानाचा हक्का बजावताच आला नाही.

राजेश लालका यांचा मोठा मुलगा हिमांशू (२४) याचे मात्र लालका नावाने यादीत नाव आले. त्यामुळे त्याला मतदानाचा हक्का बजावता आला. पण, त्यांचा धाकटा मुलगा प्रेमांशू (२३) याचेही यादीत नाव नसल्यामुळे त्यालाही मतदानाचा हक्क बजावता आला नाही.‘‘गेल्या वेळी लोकसभा निवडणुकीला मी मतदान केले. पण, यावेळी मतदारयादीत नाव नसल्यामुळे मला आणि पत्नी अमृतबेन हिला मतदान करता आले नाही. कोणताही दोष नसताना मतदानास अपात्र ठरवले जात असेल, तर यात कुठेतरी सुसूत्रता येणे अपेक्षित आहे.’’- नानजी छाडवा, चरई, ठाणे

श्रीरंग विद्यालयाच्या मतदानकेंद्रामध्ये तासभर उभे राहूनही प्रत्यक्ष मतदानासाठी क्रमांक येत नसल्यामुळे अनेक मतदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तर, व्हीव्हीपॅटद्वारे येणारी मतदानाची स्लिप पाहण्यातही सात सेकंदापेक्षा जास्त वेळ काही मतदार घेऊन रेंगाळत असल्यामुळेही हा वेळ लागत असल्याचा दावा मतदान अधिकाऱ्यांनी केला.

टॅग्स :thane-pcठाणेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक