शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
2
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
3
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
4
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
5
सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील कोण? कशामुळे हे घडलं?
6
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
7
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले
8
ऐकावं ते नवलच! नवरदेवाने हुंडा स्वीकारण्यास दिला नकार, सासऱ्याने मोडलं लग्न; नेमकं काय घडलं?
9
रिलेशनशिपची चर्चा, यशस्वीची ती कथित गर्लफ्रेंड कोण? नात्याबाबत केला मोठा गौप्यस्फोट
10
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
11
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
12
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
13
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
14
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
15
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
16
नवा ट्रेंड! मूल नको, पण कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, देशात का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
17
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
18
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
19
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
20
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार

भुमीपुत्रांच्या संस्कृतीचे शहरवासीयांना दर्शन

By admin | Updated: January 24, 2017 06:02 IST

मी नवी मुंबईकर प्रतिष्ठानच्या वतीने आयोजीत कोळी आगरी महोत्सवातून भुमीपुत्रांच्या कला व संस्कृतीचे दर्शन शहरवासीयांना

नवी मुंबई : मी नवी मुंबईकर प्रतिष्ठानच्या वतीने आयोजीत कोळी आगरी महोत्सवातून भुमीपुत्रांच्या कला व संस्कृतीचे दर्शन शहरवासीयांना घडविले. ऐरोलीमध्ये आयोजीत महोत्सवाला हजारो शहरवासीयांनी गर्दी केली होती. यावेळी विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मान्यवरांना पुरस्कार देवून गौरविण्यात आले. देशाच्या कानाकोपऱ्यातून विविध भाषा व संस्कृती असलेले नागरीक नवी मुंबईमध्ये वास्तव्यास आले आहेत. सर्वांनी आपली संस्कृती व कला जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. याच प्रमाणे या शहराचे खरे शिल्पकार येथील भुमीपुत्रांनीही कला व संस्कृतीचे प्राणपणाने जतन केले आहे. भुमीपुत्रांची कला, संस्कृती, खाद्यसंस्कृती याचे दर्शन घडविणारा उत्सव मी नवी मुंबईकर प्रतिष्ठानने ऐरोलीत आयोजीत केला होता. कोळी आगरी महोत्सवाला शहरवासीयांनी प्रचंड गर्दी केली होती. रविवारी एकाच दिवशी तब्बल २५ हजार पेक्षा जास्त शहरवासीयांनी उत्सवाला भेट दिली. रविवारी प्रसिद्ध गायक संतोष चौधरी उर्फ दादुस याने उपस्थितांना कोळी गीतांच्या तालावर ठेका धरण्यास भाग पाडले. त्यांनी व कलाकारांनी सादर केलेल्या गीतांना रसीकांनी भरभरून दाद दिली. यावेळी नवी मुंबईच्या जडणघडीमध्ये महत्वाची भुमिका बजावणाऱ्या मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला. प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रेवेंद्र पाटील यांनी उत्सवामागील भुमिका स्पष्ट केली. नवी मुंबईच्या विकासामध्ये वाटा उचलणाऱ्या नागरीकांचा गौरव करून त्यांच्या कार्याचा उचित सन्मान करावा व त्यांच्या कार्यापासून इतरांनाही प्रेरणा मिळेल व मिळावी म्हणून हा गौरव करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)