शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
3
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
4
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
5
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
6
"आमदार माजलेत असं बाहेर म्हटलं जातंय, राजकारणाच्या पलीकडे जाणार की नाही?"; CM फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं
7
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
8
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
9
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
10
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
11
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी
12
Sara Ali Khan : फॅट टू फिट! ९६ किलो वजनाच्या साराने कसं कमी केलं तब्बल ४५ किलो वजन? 'हे' आहे टॉप सीक्रेट
13
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
14
Lunchbox Recipe: झटपट तयार होणारी 'पडवळ करी' एकदा ट्राय करा, दोन घास जास्तच जातील!
15
पाकव्याप्त काश्मीरमध्ये दिसला मसूद अजहर; आता बिलावल भुट्टो आपला शब्द खरा करणार का?
16
विदेशी सट्टेबाजांचा वायदे बाजारावर डाव, छोट्या गुंतवणूकदारांनो सजगतेनं करा बचाव!
17
विधिमंडळ परिसरात धक्काबुक्की प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिला, दोषींवर होणार अशी कारवाई 
18
सोन्याची झळाळी कमी होणार, चांदीची चमक मात्र वाढणार; १३ टक्क्यांच्या तेजीचा अंदाज, किती जाऊ शकतो भाव?
19
शाहरुख खानच्या मेकअप रुमबाहेर काढला फोटो, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केला आनंद
20
"मोदींच्या नेतृत्वाखाली २०२९ निवडणूक लढवावी लागणे ही भाजपची मजबुरी"; भाजप खासदाराचे विधान

आदिवासींना ‘दिवाळी’ भेट

By admin | Updated: October 27, 2015 00:38 IST

गडचिरोलीमधील आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचविण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी मदतीचा हात दिला आहे. नवरात्रीमध्ये बंदोबस्ताचा प्रचंड ताण असतानाही शहरवासीयांना मदतीचे आवहान केले

नामदेव मोरे, नवी मुंबईगडचिरोलीमधील आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचविण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी मदतीचा हात दिला आहे. नवरात्रीमध्ये बंदोबस्ताचा प्रचंड ताण असतानाही शहरवासीयांना मदतीचे आवहान केले. या आवाहनाला प्रतिसाद देऊन पनवेल, नवी मुंबईमधील हजारो नागरिकांनी जुनी, नवी कपडे, भांडी व इतर साहित्य जमा केले आहे. तब्बल दोन ट्रक साहित्य आतापर्यंत जमा केले आहे. हे सर्व साहित्य लवकरच आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचविले जाणार आहे. नवी मुंबई पोलिसांनी मागील काही महिन्यांपासून गुन्हे प्रकटीकरणापासून नागरिकांशी संवाद वाढविण्यापर्यंत अनेक उपाययोजना केल्या आहेत. गणपती व नवरात्र उत्सव शांततेमध्ये पार पाडला. बंदोबस्त सुरू असतानाच पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ दोनचे उपायुक्त विश्वास पांढरे व परिमंडळ एकचे उपायुक्त शहाजी उमाप यांनी आदिवासींना मदत करण्याचे आवाहन नागरिकांना केले. शहरामधील नागरिकांना सर्व भौतिक सुविधा सहज मिळत आहेत. परंतु येथून ७६४ किलोमीटर दूर असणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील पाच लाखांपेक्षा जास्त आदिवासी नागरिकांना प्राथमिक सुविधांसाठी झगडावे लागत आहे. अंगावर पुरेशी कपडे नाहीत. घरामध्ये आवश्यक भांडी व इतर साहित्य नाही. अत्यंत हालाकीचे जीवन विनातक्रार आदिवासी जगत आहेत. शहरामधील नागरिकांनी उत्सवांमधील व इतर वेळीही अनावश्यक खर्च कमी करून आपल्याकडील जुने, शक्य असेल तर नवीन कपडे, भांडी व इतर साहित्य पोलिसांकडे जमा करावे. हे साहित्य आदिवासींपर्यंत पोहोचविले जाईल. आपली छोटीशी मदत हजारो आदिवासींचे जीवनमान उंचावू शकेल, असे आवाहन केले होते. पोलिसांच्या आवाहनाला नवी मुंबई व पनवेलकरांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. शहरातील राजकीय पक्ष, गृहनिर्माण सोसायट्या, सामाजिक संस्था व इतर नागरिकांनी स्वेच्छेने घरोघरी जाऊन कपडे व भांडी गोळा केली. या मोहिमेला चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले. प्रत्येकाने स्वेच्छेने त्यामध्ये सहभाग घेण्यास सुरुवात केली. अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला. प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये कपडे व इतर साहित्याचे ढीग जमा होऊ लागले. अनेक पोलीस स्टेशनच्या प्रमुखांनी टेंपो भरून साहित्य पनवेलमधील परिमंडळ दोनच्या कार्यालयाकडे पाठविले. नवी मुंबईमधील एनआरआय कॉम्प्लेक्समधील रहिवाशांनीच एक टेंपो भरून साहित्य दिले. पोलिसांनी जुने कपडे देण्याचे आवाहन केले असले तरी प्रत्यक्षात मात्र नागरिकांनी नवीन कपडेही मोठ्या प्रमाणात दिले आहेत. विशेषत: व्यापाऱ्यांनी चांगल्या वस्तू व नवीन कपडे खरेदी करून आदिवासींसाठी दिले आहेत. जवळपास दोन ट्रक भरेल एवढे साहित्य संकलित झाले आहे. लवकरच हे साहित्य आदिवासींपर्यंत पोहोचविले जाणार आहे.