शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमधील गावांचे रूपांतर वेल प्लॅन सिटीत

By admin | Updated: May 4, 2016 00:10 IST

शहरातील सिडको वसाहतींचा मोठ्या प्रमाणात विकास झाला असला तरी आजूबाजूला असलेली गावे मात्र चाळीस वर्षांनंतरही पायाभूत सुविधांपासून वंचित आहेत. रस्ते, गटारांबाबत

- प्रशांत शेडगे, पनवेल

शहरातील सिडको वसाहतींचा मोठ्या प्रमाणात विकास झाला असला तरी आजूबाजूला असलेली गावे मात्र चाळीस वर्षांनंतरही पायाभूत सुविधांपासून वंचित आहेत. रस्ते, गटारांबाबत समस्या ग्रामस्थांना सतावत आहेत. सिडकोने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता आजतागायत झाली नाही. पनवेल महानगरपालिका झाल्यानंतर मात्र गावांची वणवण संपेल, असा विश्वास ग्रामस्थांना वाटत आहे. सिडकोने १९७0 साली पनवेल परिसरातील जमिनी प्रकल्पग्रस्तांकडून कवडीमोल भावाने संपादित केल्या. यावेळी सिडकोकडून रस्ते, पाणी, मैदाने, व्यायामशाळा, उद्याने, शौचालये, अंतर्गत पथदिवे, गटारे अशा पायाभूत सुविधा देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप त्यांनी पूर्तता झालेली नाही. गावांचा नियोजित विकास होणार!प्रस्तावित महानगरपालिकेत एकूण ७0 गावांचा समावेश करण्याचा प्रस्ताव आहे. या गावांमध्ये नागरीकरण पोहचले आहे. इमारती उभारण्यात आलेल्या आहेत. मात्र योग्य नियोजनाअभावी ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अंतर्गत रस्ते, सांडपाणी व्यवस्था व घनकचरा व्यवस्थापनाच्या नियोजनाअभावी गावाला भकासपणा आला आहे. महानगरपालिका झाल्यानंतर या गावांचा विकास होण्यास नक्कीच मदत होईल, असे मत जाणकार व्यक्ती मांडत आहेत.सिडकोने विविध प्रकल्पांकरिता बैठका घेतल्या तेव्हा प्रलंबित प्रश्न उपस्थित केले. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप रोडपाली ग्रामस्थ आत्माराम पाटील यांनी केला आहे.कामोठेतील सांडपाण्याची समस्या गंभीर आहे. महानगरपालिका झाली तर कामोठे, नौपाडा, जुई या गावांचा विकास होईल, असा विश्वास राकेश गोवारी यांनी व्यक्त केला.खारघरचा सायबर सिटी म्हणून विकास केला तरी आजूबाजूच्या गावांची काय परिस्थिती आहे याबाबत ऊहापोह झाला नसल्याची खंत शिरीष घरत यांनी व्यक्त केली. आदईतील तलावाचे सुशोभीकरण, ड्रेनेज जोडणी आणि रस्त्याकरिता ग्रामपंचायतीने आर्थिक सहाय्याची मागणी केली होती. मात्र सिडकोने एक दमडीही दिली नसल्याचे सरपंच रूपाली शेळके यांनी सांगितले. कळंबोलीत ग्रामपंचायतीला कचरा महामार्गालगत टाकावा लागतोय. महापालिका झाली तर गावठाणाचा प्रश्न निकाली निघेल, असा विश्वास अरविंद कडव यांनी व्यक्त केला. कळंबोलीतील मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष करण्यात आले. ही चक्क फसवणूक असल्याची संतप्त प्रतिक्रिया कळंबोलीचे माजी सरपंच विजय खानावकर यांनी दिली. वळवली- टेंभोडेत सेझ उभारण्याचा घाट घातला होता. महानगरपालिका झाली तर गावांचा विकास होईल, अशी प्रतिक्रि या माजी सरपंच मंजुळा नाथा म्हसकर यांनी दिली.पनवेल महानगरपालिका झाली तर किमान आजूबाजूच्या गावांमध्ये शहरीकरण होईल, असा विश्वास भरत पाटील यांनी व्यक्त केला आहे. तर तळोजा पाचनंदमध्येही अनेक पायाभूत सुविधांची वानवा आहे.