शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

पनवेलमधील गावांचे रूपांतर वेल प्लॅन सिटीत

By admin | Updated: May 4, 2016 00:10 IST

शहरातील सिडको वसाहतींचा मोठ्या प्रमाणात विकास झाला असला तरी आजूबाजूला असलेली गावे मात्र चाळीस वर्षांनंतरही पायाभूत सुविधांपासून वंचित आहेत. रस्ते, गटारांबाबत

- प्रशांत शेडगे, पनवेल

शहरातील सिडको वसाहतींचा मोठ्या प्रमाणात विकास झाला असला तरी आजूबाजूला असलेली गावे मात्र चाळीस वर्षांनंतरही पायाभूत सुविधांपासून वंचित आहेत. रस्ते, गटारांबाबत समस्या ग्रामस्थांना सतावत आहेत. सिडकोने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता आजतागायत झाली नाही. पनवेल महानगरपालिका झाल्यानंतर मात्र गावांची वणवण संपेल, असा विश्वास ग्रामस्थांना वाटत आहे. सिडकोने १९७0 साली पनवेल परिसरातील जमिनी प्रकल्पग्रस्तांकडून कवडीमोल भावाने संपादित केल्या. यावेळी सिडकोकडून रस्ते, पाणी, मैदाने, व्यायामशाळा, उद्याने, शौचालये, अंतर्गत पथदिवे, गटारे अशा पायाभूत सुविधा देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप त्यांनी पूर्तता झालेली नाही. गावांचा नियोजित विकास होणार!प्रस्तावित महानगरपालिकेत एकूण ७0 गावांचा समावेश करण्याचा प्रस्ताव आहे. या गावांमध्ये नागरीकरण पोहचले आहे. इमारती उभारण्यात आलेल्या आहेत. मात्र योग्य नियोजनाअभावी ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अंतर्गत रस्ते, सांडपाणी व्यवस्था व घनकचरा व्यवस्थापनाच्या नियोजनाअभावी गावाला भकासपणा आला आहे. महानगरपालिका झाल्यानंतर या गावांचा विकास होण्यास नक्कीच मदत होईल, असे मत जाणकार व्यक्ती मांडत आहेत.सिडकोने विविध प्रकल्पांकरिता बैठका घेतल्या तेव्हा प्रलंबित प्रश्न उपस्थित केले. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप रोडपाली ग्रामस्थ आत्माराम पाटील यांनी केला आहे.कामोठेतील सांडपाण्याची समस्या गंभीर आहे. महानगरपालिका झाली तर कामोठे, नौपाडा, जुई या गावांचा विकास होईल, असा विश्वास राकेश गोवारी यांनी व्यक्त केला.खारघरचा सायबर सिटी म्हणून विकास केला तरी आजूबाजूच्या गावांची काय परिस्थिती आहे याबाबत ऊहापोह झाला नसल्याची खंत शिरीष घरत यांनी व्यक्त केली. आदईतील तलावाचे सुशोभीकरण, ड्रेनेज जोडणी आणि रस्त्याकरिता ग्रामपंचायतीने आर्थिक सहाय्याची मागणी केली होती. मात्र सिडकोने एक दमडीही दिली नसल्याचे सरपंच रूपाली शेळके यांनी सांगितले. कळंबोलीत ग्रामपंचायतीला कचरा महामार्गालगत टाकावा लागतोय. महापालिका झाली तर गावठाणाचा प्रश्न निकाली निघेल, असा विश्वास अरविंद कडव यांनी व्यक्त केला. कळंबोलीतील मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष करण्यात आले. ही चक्क फसवणूक असल्याची संतप्त प्रतिक्रिया कळंबोलीचे माजी सरपंच विजय खानावकर यांनी दिली. वळवली- टेंभोडेत सेझ उभारण्याचा घाट घातला होता. महानगरपालिका झाली तर गावांचा विकास होईल, अशी प्रतिक्रि या माजी सरपंच मंजुळा नाथा म्हसकर यांनी दिली.पनवेल महानगरपालिका झाली तर किमान आजूबाजूच्या गावांमध्ये शहरीकरण होईल, असा विश्वास भरत पाटील यांनी व्यक्त केला आहे. तर तळोजा पाचनंदमध्येही अनेक पायाभूत सुविधांची वानवा आहे.