शहरं
Join us  
Trending Stories
1
'जात नाही, तर आर्थिक निकषांवर आधारित आरक्षण हवे', सुप्रिया सुळेंचे मोठे विधान
2
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
3
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
4
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
5
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
6
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
7
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
8
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
9
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
10
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
11
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
12
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
13
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
14
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
15
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
16
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
18
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
19
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
20
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान

पनवेलमधील गावांचे रूपांतर वेल प्लॅन सिटीत

By admin | Updated: May 4, 2016 00:10 IST

शहरातील सिडको वसाहतींचा मोठ्या प्रमाणात विकास झाला असला तरी आजूबाजूला असलेली गावे मात्र चाळीस वर्षांनंतरही पायाभूत सुविधांपासून वंचित आहेत. रस्ते, गटारांबाबत

- प्रशांत शेडगे, पनवेल

शहरातील सिडको वसाहतींचा मोठ्या प्रमाणात विकास झाला असला तरी आजूबाजूला असलेली गावे मात्र चाळीस वर्षांनंतरही पायाभूत सुविधांपासून वंचित आहेत. रस्ते, गटारांबाबत समस्या ग्रामस्थांना सतावत आहेत. सिडकोने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता आजतागायत झाली नाही. पनवेल महानगरपालिका झाल्यानंतर मात्र गावांची वणवण संपेल, असा विश्वास ग्रामस्थांना वाटत आहे. सिडकोने १९७0 साली पनवेल परिसरातील जमिनी प्रकल्पग्रस्तांकडून कवडीमोल भावाने संपादित केल्या. यावेळी सिडकोकडून रस्ते, पाणी, मैदाने, व्यायामशाळा, उद्याने, शौचालये, अंतर्गत पथदिवे, गटारे अशा पायाभूत सुविधा देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप त्यांनी पूर्तता झालेली नाही. गावांचा नियोजित विकास होणार!प्रस्तावित महानगरपालिकेत एकूण ७0 गावांचा समावेश करण्याचा प्रस्ताव आहे. या गावांमध्ये नागरीकरण पोहचले आहे. इमारती उभारण्यात आलेल्या आहेत. मात्र योग्य नियोजनाअभावी ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अंतर्गत रस्ते, सांडपाणी व्यवस्था व घनकचरा व्यवस्थापनाच्या नियोजनाअभावी गावाला भकासपणा आला आहे. महानगरपालिका झाल्यानंतर या गावांचा विकास होण्यास नक्कीच मदत होईल, असे मत जाणकार व्यक्ती मांडत आहेत.सिडकोने विविध प्रकल्पांकरिता बैठका घेतल्या तेव्हा प्रलंबित प्रश्न उपस्थित केले. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप रोडपाली ग्रामस्थ आत्माराम पाटील यांनी केला आहे.कामोठेतील सांडपाण्याची समस्या गंभीर आहे. महानगरपालिका झाली तर कामोठे, नौपाडा, जुई या गावांचा विकास होईल, असा विश्वास राकेश गोवारी यांनी व्यक्त केला.खारघरचा सायबर सिटी म्हणून विकास केला तरी आजूबाजूच्या गावांची काय परिस्थिती आहे याबाबत ऊहापोह झाला नसल्याची खंत शिरीष घरत यांनी व्यक्त केली. आदईतील तलावाचे सुशोभीकरण, ड्रेनेज जोडणी आणि रस्त्याकरिता ग्रामपंचायतीने आर्थिक सहाय्याची मागणी केली होती. मात्र सिडकोने एक दमडीही दिली नसल्याचे सरपंच रूपाली शेळके यांनी सांगितले. कळंबोलीत ग्रामपंचायतीला कचरा महामार्गालगत टाकावा लागतोय. महापालिका झाली तर गावठाणाचा प्रश्न निकाली निघेल, असा विश्वास अरविंद कडव यांनी व्यक्त केला. कळंबोलीतील मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष करण्यात आले. ही चक्क फसवणूक असल्याची संतप्त प्रतिक्रिया कळंबोलीचे माजी सरपंच विजय खानावकर यांनी दिली. वळवली- टेंभोडेत सेझ उभारण्याचा घाट घातला होता. महानगरपालिका झाली तर गावांचा विकास होईल, अशी प्रतिक्रि या माजी सरपंच मंजुळा नाथा म्हसकर यांनी दिली.पनवेल महानगरपालिका झाली तर किमान आजूबाजूच्या गावांमध्ये शहरीकरण होईल, असा विश्वास भरत पाटील यांनी व्यक्त केला आहे. तर तळोजा पाचनंदमध्येही अनेक पायाभूत सुविधांची वानवा आहे.