शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

शांततेसाठी ग्रामस्थांचा पुढाकार, रबाळे पोलिसांनी केले मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 03:08 IST

मराठा मोर्चा आंदोलनानंतर निर्माण झालेल्या संघर्षमय परिस्थितीवर मात करण्यासाठी ग्रामस्थ संघटना एकवटल्या आहेत. स्वातंत्र्य सैनिकांचे गाव म्हणून ओळख असलेल्या घणसोली गावात शनिवारी सकाळी एक बैठक बोलाविण्यात आली होती.

नवी मुंबई : मराठा मोर्चा आंदोलनानंतर निर्माण झालेल्या संघर्षमय परिस्थितीवर मात करण्यासाठी ग्रामस्थ संघटना एकवटल्या आहेत. स्वातंत्र्य सैनिकांचे गाव म्हणून ओळख असलेल्या घणसोली गावात शनिवारी सकाळी एक बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीत रबाळे पोलिसांनी उपस्थित राहून ग्रामस्थांना मार्गदर्शन केले, तसेच सामाजिक शांततेत बाधा निर्माण करणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन रबाळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय गोडसे यांनी केले.कोपरखैरणेतील घटनेनंतर ग्रामस्थांत कमालीचा असंतोष पसरला आहे, त्याचे पडसाद शहरातील इतर गावांतही उमटण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर रबाळे पोलिसांनी ग्रामस्थांशी समन्वय साधण्याच्या दृष्टीने शनिवारी घणसोलीतील हनुमान मंदिराच्या प्रांगणात एका बैठकीचे आयोजन केले होते. आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाजाने शांततेच्या मार्गाने राज्यभरात ५७मोर्चे काढले; परंतु बंद आंदोलनादरम्यान, काही समाजकंटकांच्या कृतीमुळे वातावरणात तणाव निर्माण झाला. सामाजिक सलोखा बिघडविणाºया प्रवृत्तींची गय केली जाणार नाही. हिंसक आंदोलनाला कारणीभूत असलेल्यांवर कारवाई करण्यास पोलीस प्रशासन कटिबद्ध आहे, त्यामुळे ग्रामस्थांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता पोलिसांशी समन्वय साधावा, असे आवाहन गोडसे यांनी केले. याप्रसंगी परिवहन समितीचे माजी सभापती सुरेश म्हात्रे यांच्यासह माजी नगरसेवक दीपक पाटील यांचीही भाषणे झाली.या बैठकीला देवस्थान संस्थेचे अध्यक्ष चेतन पाटील, नगरसेवक लक्ष्मीकांत पाटील, एमआयडीसी प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष मनोहर पाटील, आगरी कोळी युथ फाउंडेशनचे अध्यक्ष नीलेश पाटील, नगरसेवक घनश्याम मढवी, उत्तम म्हात्रे, गावकीचे सरचिटणीस मिलिंद पाटील, उपाध्यक्ष शेखर मढवी, गौरव म्हात्रे आदी उपस्थित होते.घटनेची नि:पक्षपातीपणे चौकशी करान्याय्य हक्कासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, परंतु या आंदोलनात सर्वसामान्य भरडले जातात. त्यांच्या मालमत्तेचे नुकसान केले जाते. या कृत्याचे कोणीच समर्थन करणार नाही, त्यामुळे कोपरखैरणेतील घटनेची नि:पक्षपातीपणे चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी गावकीचे माजी अध्यक्ष द्वारकानाथ भोईर यांनी या बैठकीत केली.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई