शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

शांततेसाठी ग्रामस्थांचा पुढाकार, रबाळे पोलिसांनी केले मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 03:08 IST

मराठा मोर्चा आंदोलनानंतर निर्माण झालेल्या संघर्षमय परिस्थितीवर मात करण्यासाठी ग्रामस्थ संघटना एकवटल्या आहेत. स्वातंत्र्य सैनिकांचे गाव म्हणून ओळख असलेल्या घणसोली गावात शनिवारी सकाळी एक बैठक बोलाविण्यात आली होती.

नवी मुंबई : मराठा मोर्चा आंदोलनानंतर निर्माण झालेल्या संघर्षमय परिस्थितीवर मात करण्यासाठी ग्रामस्थ संघटना एकवटल्या आहेत. स्वातंत्र्य सैनिकांचे गाव म्हणून ओळख असलेल्या घणसोली गावात शनिवारी सकाळी एक बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीत रबाळे पोलिसांनी उपस्थित राहून ग्रामस्थांना मार्गदर्शन केले, तसेच सामाजिक शांततेत बाधा निर्माण करणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन रबाळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय गोडसे यांनी केले.कोपरखैरणेतील घटनेनंतर ग्रामस्थांत कमालीचा असंतोष पसरला आहे, त्याचे पडसाद शहरातील इतर गावांतही उमटण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर रबाळे पोलिसांनी ग्रामस्थांशी समन्वय साधण्याच्या दृष्टीने शनिवारी घणसोलीतील हनुमान मंदिराच्या प्रांगणात एका बैठकीचे आयोजन केले होते. आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाजाने शांततेच्या मार्गाने राज्यभरात ५७मोर्चे काढले; परंतु बंद आंदोलनादरम्यान, काही समाजकंटकांच्या कृतीमुळे वातावरणात तणाव निर्माण झाला. सामाजिक सलोखा बिघडविणाºया प्रवृत्तींची गय केली जाणार नाही. हिंसक आंदोलनाला कारणीभूत असलेल्यांवर कारवाई करण्यास पोलीस प्रशासन कटिबद्ध आहे, त्यामुळे ग्रामस्थांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता पोलिसांशी समन्वय साधावा, असे आवाहन गोडसे यांनी केले. याप्रसंगी परिवहन समितीचे माजी सभापती सुरेश म्हात्रे यांच्यासह माजी नगरसेवक दीपक पाटील यांचीही भाषणे झाली.या बैठकीला देवस्थान संस्थेचे अध्यक्ष चेतन पाटील, नगरसेवक लक्ष्मीकांत पाटील, एमआयडीसी प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष मनोहर पाटील, आगरी कोळी युथ फाउंडेशनचे अध्यक्ष नीलेश पाटील, नगरसेवक घनश्याम मढवी, उत्तम म्हात्रे, गावकीचे सरचिटणीस मिलिंद पाटील, उपाध्यक्ष शेखर मढवी, गौरव म्हात्रे आदी उपस्थित होते.घटनेची नि:पक्षपातीपणे चौकशी करान्याय्य हक्कासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, परंतु या आंदोलनात सर्वसामान्य भरडले जातात. त्यांच्या मालमत्तेचे नुकसान केले जाते. या कृत्याचे कोणीच समर्थन करणार नाही, त्यामुळे कोपरखैरणेतील घटनेची नि:पक्षपातीपणे चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी गावकीचे माजी अध्यक्ष द्वारकानाथ भोईर यांनी या बैठकीत केली.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई