शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

संविधान हातात घेऊन झोपडपट्टीवासीयांसाठी लढा देणार, विजय चौगुले यांचा निर्धार 

By नामदेव मोरे | Updated: July 3, 2024 17:13 IST

महायुती सरकारने दोन वर्षात केलेल्या कामांची माहिती सांगण्यासाठी सानपाडा येथील वडार भवनमध्ये पत्रकार परिषद आयाेजीत केली होती.

नवी मुंबई : एसआरए ला काही व्यक्तींनी विरोध केल्यामुळे झोपडपट्टीचे सर्वेक्षण थांबले आहे. पण आम्ही मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करून सर्वेक्षण व एसआरए चा प्रश्न मार्गी लावणार. वेळ पडलीच तर झोपडपट्टीवासीयांसाठी संविधान हातात घेऊन लढा देणार असून आगामी निवडणुकीमध्ये नवी मुंबईमधील दोन्ही विधानसभेची मागणी आमचा प्रश्न करेल असा निर्धार शिंदे सेनेचे जिल्हा अध्यक्ष विजय चौगुले यांनी व्यक्त केला आहे.

महायुती सरकारने दोन वर्षात केलेल्या कामांची माहिती सांगण्यासाठी सानपाडा येथील वडार भवनमध्ये पत्रकार परिषद आयाेजीत केली होती. यावेळी उपनेते विजय नाहटा यांनी शासनाच्या माध्यमातून राज्यभर राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली. राज्यातील सर्व घटकांना न्याय देण्याचे काम शासनाने केले आहे. नवी मुंबईमध्ये ज्वेलरी पार्क व इतर प्रकल्प येत असल्याचेही त्यांनी सांगितले. शिंदे सेनेचे जिल्हा अध्यक्ष विजय चौगुले यांनीही नवी मुंबईमध्ये पक्षाची ताकद वाढत आहे. येणाऱ्या विधान सभेसाठी आम्ही नवी मुंबईमधील दोन्ही मतदार संघाची मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसाठी सर्वेक्षण सुरू केले होते. परंतु काही व्यक्तींनी विरोध केल्यामुळे सर्वेक्षण थांबले आहे. आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावणार आहोत. ज्यांच्या जमीनीवर झोपड्या उभारण्यात आल्या आहेत. त्याच प्राधिकरणाच्या माध्यमातून एसआरए योजना राबविण्याचेही प्रस्तावीत आहे. याविषयीचे योग्य ते निर्देश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत. जर कोणी एसआरए ला विरोध करून सामान्य नागरिकांच्या हिताच्या आड येणार असेल तर आम्ही संविधान हातात घेवून झोपडपट्टीवासीयांसाठी लढा देणार आहोत. लाव रे तो व्हिडीओची वेळ आमच्यावर कोणी येवून देवू नये असा इशाराही त्यांनी राजकीय विरोधकांना दिला. यावेळी दिलीप घोडेकर, विजय माने, विलास भोईर, रामअशीष यादव, दमयंती आचरे, सरोज पाटील, शीतल कचरे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई