शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

खड्ड्याने घेतला प्रवाशाचा बळी; सायन-पनवेल महामार्गावरील उरण फाट्याजवळ अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 03:18 IST

सायन-पनवेल महामार्गाचे काम निकृष्ट झाले असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. पावसामुळे रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. उरण-फाटा येथे खड्ड्यामुळे अपघात होऊन दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याने, नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.

नवी मुंबई, पनवेल : सायन-पनवेल महामार्गाचे काम निकृष्ट झाले असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. पावसामुळे रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. उरण-फाटा येथे खड्ड्यामुळे अपघात होऊन दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याने, नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.कोकण, गोवा, पश्चिम महाराष्ट्रासह दक्षिणेकडील राज्यातून मुंबईमध्ये येण्यासाठी सायन-पनवेल महामार्ग हाच महत्त्वाचा रोड आहे. या रोडवरून रोज जवळपास तीन लाख वाहनांची ये-जा सुरू असते. महामार्गावरील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी राज्य शासनाने महामार्गाचे रुंदीकरण केले; परंतु त्यामुळे प्रश्न सुटण्याऐवजी वाढले आहेत. गतवर्षी उरण फाटा येथे अपघातांची मालिका सुरू झाली होती. सीबीडीमधील एका प्रवाशाचा मृत्यूही झाला होता. यावर्षी पुन्हा उरण फाटा परिसरामध्ये खड्ड्यांमुळे अपघात होऊ लागले आहेत. तळोजा येथे राहणारे इब्राहिम मोहम्मद खुर्शीद (५८) यांच्या दुचाकीला अपघात झाला. अचानक समोर आलेल्या खड्ड्यामध्ये चाक गेल्याने त्यांचा तोल जाऊन ते रस्त्यावर कोसळले. मागून आलेली वाहने त्यांच्या शरीरावरून गेल्यामुळे गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.खड्ड्यांमुळे खुर्शीद यांचे निधन झाले असून, या प्रकरणी ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. उरण फाटा येथे खड्ड्यांमुळे गुरुवारी प्रचंड वाहतूककोंडी निर्माण झाली होती. दिवसभर चक्काजामची स्थिती निर्माण झाली होती. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत होती. तुर्भे उड्डाणपुलावरही चक्काजामची स्थिती निर्माण झाली होती.खारघर ते कळंबोली दरम्यानही अवस्था बिकट आहे. कळंबोली पुरुषार्थ पेट्रोलपंपाजवळ उड्डाणपुलाखाली महामार्गाची चाळण झाली आहे.खड्ड्यांविषयी मंत्र्यांनाही पत्रमहामार्गावरील खड्ड्यांमुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. रोज वाहतूककोंडी होऊ लागली आहे. तुर्भे उड्डाणपूल, नेरुळ, उरणफाटा, कळंबोली परिसरामध्ये वारंवार चक्काजाम होत आहे, यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र असंतोष निर्माण होऊ लागला आहे. या विषयी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे व खासदार राजन विचारे यांच्याकडेही नागरिकांनी पाठपुरावा करण्यास सुरुवात केली आहे.दुरवस्थेचे विधानसभेत पडसादसायन-पनवेल महामार्गाच्या दुरवस्थेचे गुरुवारी विधानसभेत पडसाद उमटले. बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी हा प्रश्न उपस्थित करून महामार्गाच्या निकृष्ट कामाला जबाबदार असलेल्या कंत्राटदारांवर गुन्हे दाखल कारावेत. तसेच या महामार्गाचे नव्याने काँक्रीटीकरण करावे, अशी मागणी त्यांनी केली. त्यावर संबंधित कंत्राटदारांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येईल, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी दिली. तसेच महामार्गाची तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले आहेत.येशी ते खुर्शीद अपघाताची मालिकासायन-पनवेल महामार्गावर गतवर्षी पावसाळ्यामध्ये उरण फाटा येथे अपघात होऊन नेरुळ येथील चंद्रकांत येशी यांचा मृत्यू झाला होता. सीबीडीमध्ये राहणारे येशी कामानिमित्त नेरुळमध्ये जात असताना हा अपघात झाला. याच ठिकाणी यावर्षी खड्ड्यांमुळे अपघात होऊन इब्राहिम मोहम्मद खुर्शीद यांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताला पूर्णपणे सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार जबाबदार असून, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.महामार्गावर ज्या-ज्या ठिकाणी खड्डे पडले आहेत, ते बुजविण्याचे काम हाती घेतले आहे. मात्र, काही दिवस पाऊस पडत असल्याने अडचणी येत आहेत. पाऊस उघडल्यानंतर सर्व कामे पूर्ण करण्यात येतील.- एस. व्ही. अलगुर,उपअभियंता,सार्वजनिक बांधकाम विभाग

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई