शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

विचुंबे पूल वाहतुकीसाठी धोकादायक, दोन्ही बाजूचा रस्ता खचला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2019 03:29 IST

दोन्ही बाजूने रस्ता खचल्यामुळे नवीन पनवेल-विचुंबे जोडपूल धोकादायक झाला आहे. यामुळे या पुलावरून ये-जा करणाऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.

- अरुणकुमार मेहत्रेकळंबोली : दोन्ही बाजूने रस्ता खचल्यामुळे नवीन पनवेल-विचुंबे जोडपूल धोकादायक झाला आहे. यामुळे या पुलावरून ये-जा करणाऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. या पार्श्वभूमीवर कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून विचुंबे ग्रामपंचायतीकडून खचलेला भाग वारंवार बुजवण्यात येत आहे. संबंधित यंत्रणेकडून या संदर्भात दुर्लक्ष होत आसल्याने ही परिस्थिती ओढावल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांकडून केला जात आहे. दरम्यान, संभाव्य अपघात टाळण्यासाठी या पुलाबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी विचुंबे येथील रहिवाशांनी केली आहे.नवीन पनवेलच्या बाजूला असलेल्या विचुंबे, उसर्ली, देवत, शिवकर, मोह या गावांमध्ये मोठमोठ्या इमारती बांधण्यात आल्या आहेत. या परिसरात एक ते दीड लाख लोकवस्ती झालेली आहे. या ठिकाणी राहणारे चाकरमानी, व्यावसायिक लोकल पकडण्यासाठी पनवेल रेल्वे स्थानकावर येतात. त्यामुळे नवीन पनवेल-विचुंबे या जोडपुलावरील रहदारी आणखी वाढलेली आहे. तसेच गाव आणि परिसरात नवीन इमारतींची मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. त्यामुळे दिवसभर अवजड वाहनांची ये-जा सुरू असते. या सर्वांचा भार या पुलावर पडताना दिसत आहे. हा पूल २००२ मध्ये बांधण्यात आला आहे. त्यामुळे तो आकाराने छोटा व अरुंद आहे. त्यावरून वाहनांची रहदारी वाढल्याने वाहतूककोंडीची समस्या निर्माण झाली आहे. क्षमतेपेक्षा अधिक वजनाची वाहने ये-जा करीत असल्याने नवीन पनवेल आणि विचुंबेला जोडणाºया या पुलावर अतिरिक्त ताण पडत आहे. त्यामुळे पुलाच्या पिलरला तडे गेले आहेत. काही ठिकाणी सळई उघड्या पडलेल्या आहेत, तसेच दोन्ही बाजूचे रस्ते काही ठिकाणी खचल्याचे दिसून येते.विचुंबे ग्रामपंचायतीच्या वतीने या पुलाची नियमित डागडुजी केली जाते. मात्र, त्यानंतरही हा रस्ता खचत असल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, रस्ता खचल्याने विचुंबे ग्रामपंचायतीने येथील अवजड वाहतूक बंद केली आहे, तसेच काही सूचनाफलक लावण्यात आले आहेत. याशिवाय तात्पुरते हाइट गेज लावण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हा पूल सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आलेला आहे.नवीन पनवेल-विचुंबे पुलाकरिता विचुंबे ग्रामपंचायतीकडून गेली तीन वर्षे पाठपुरावा सुरू आहे. या पुलाच्या दोन्ही बाजूला असलेला रस्ता खचला आहे. तो आम्ही वारंवार दुरु स्त केला आहे. लवकरच या पुलाची पुनर्बांधणी करावी यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा सुरू आहे.- विनायक भोईर,सहायक माहिती अधिकारी, ग्रामपंचायत, विचुंबेनवीन पुलाला मंजुरीविचुंबे एमएमआरडीएच्या अखत्यारित येत आहे. नवीन पनवेल-विचुंबे जोडपुलाची दुरवस्था झाल्याने याबाबत शिक्षक आमदार बाळाराम पाटील यांनी विधान परिषदेत आवाज उठवला होता. तसेच स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर यांनीसुद्धा याविषयी पाठपुरावा केला होता. काही महिन्यांपूर्वी रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी पाहणी करून याबाबत संबंधित यंत्रणांना सूचना केल्या होत्या. त्यानुसार एमएमआरडीएकडून तीन कोटी रु पये खर्चाच्या नवीन पुलाला मंजुरी देण्यात आली आहे. लवकरच निविदा प्रसिद्ध होऊन कामाला सुरु वात होणे अपेक्षित आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई