शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

विचुंबे पूल वाहतुकीसाठी धोकादायक, दोन्ही बाजूचा रस्ता खचला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2019 03:29 IST

दोन्ही बाजूने रस्ता खचल्यामुळे नवीन पनवेल-विचुंबे जोडपूल धोकादायक झाला आहे. यामुळे या पुलावरून ये-जा करणाऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.

- अरुणकुमार मेहत्रेकळंबोली : दोन्ही बाजूने रस्ता खचल्यामुळे नवीन पनवेल-विचुंबे जोडपूल धोकादायक झाला आहे. यामुळे या पुलावरून ये-जा करणाऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. या पार्श्वभूमीवर कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून विचुंबे ग्रामपंचायतीकडून खचलेला भाग वारंवार बुजवण्यात येत आहे. संबंधित यंत्रणेकडून या संदर्भात दुर्लक्ष होत आसल्याने ही परिस्थिती ओढावल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांकडून केला जात आहे. दरम्यान, संभाव्य अपघात टाळण्यासाठी या पुलाबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी विचुंबे येथील रहिवाशांनी केली आहे.नवीन पनवेलच्या बाजूला असलेल्या विचुंबे, उसर्ली, देवत, शिवकर, मोह या गावांमध्ये मोठमोठ्या इमारती बांधण्यात आल्या आहेत. या परिसरात एक ते दीड लाख लोकवस्ती झालेली आहे. या ठिकाणी राहणारे चाकरमानी, व्यावसायिक लोकल पकडण्यासाठी पनवेल रेल्वे स्थानकावर येतात. त्यामुळे नवीन पनवेल-विचुंबे या जोडपुलावरील रहदारी आणखी वाढलेली आहे. तसेच गाव आणि परिसरात नवीन इमारतींची मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. त्यामुळे दिवसभर अवजड वाहनांची ये-जा सुरू असते. या सर्वांचा भार या पुलावर पडताना दिसत आहे. हा पूल २००२ मध्ये बांधण्यात आला आहे. त्यामुळे तो आकाराने छोटा व अरुंद आहे. त्यावरून वाहनांची रहदारी वाढल्याने वाहतूककोंडीची समस्या निर्माण झाली आहे. क्षमतेपेक्षा अधिक वजनाची वाहने ये-जा करीत असल्याने नवीन पनवेल आणि विचुंबेला जोडणाºया या पुलावर अतिरिक्त ताण पडत आहे. त्यामुळे पुलाच्या पिलरला तडे गेले आहेत. काही ठिकाणी सळई उघड्या पडलेल्या आहेत, तसेच दोन्ही बाजूचे रस्ते काही ठिकाणी खचल्याचे दिसून येते.विचुंबे ग्रामपंचायतीच्या वतीने या पुलाची नियमित डागडुजी केली जाते. मात्र, त्यानंतरही हा रस्ता खचत असल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, रस्ता खचल्याने विचुंबे ग्रामपंचायतीने येथील अवजड वाहतूक बंद केली आहे, तसेच काही सूचनाफलक लावण्यात आले आहेत. याशिवाय तात्पुरते हाइट गेज लावण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हा पूल सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आलेला आहे.नवीन पनवेल-विचुंबे पुलाकरिता विचुंबे ग्रामपंचायतीकडून गेली तीन वर्षे पाठपुरावा सुरू आहे. या पुलाच्या दोन्ही बाजूला असलेला रस्ता खचला आहे. तो आम्ही वारंवार दुरु स्त केला आहे. लवकरच या पुलाची पुनर्बांधणी करावी यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा सुरू आहे.- विनायक भोईर,सहायक माहिती अधिकारी, ग्रामपंचायत, विचुंबेनवीन पुलाला मंजुरीविचुंबे एमएमआरडीएच्या अखत्यारित येत आहे. नवीन पनवेल-विचुंबे जोडपुलाची दुरवस्था झाल्याने याबाबत शिक्षक आमदार बाळाराम पाटील यांनी विधान परिषदेत आवाज उठवला होता. तसेच स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर यांनीसुद्धा याविषयी पाठपुरावा केला होता. काही महिन्यांपूर्वी रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी पाहणी करून याबाबत संबंधित यंत्रणांना सूचना केल्या होत्या. त्यानुसार एमएमआरडीएकडून तीन कोटी रु पये खर्चाच्या नवीन पुलाला मंजुरी देण्यात आली आहे. लवकरच निविदा प्रसिद्ध होऊन कामाला सुरु वात होणे अपेक्षित आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई