शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीच्या कामकाजासाठी वाहनांची शोधाशोध सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 02:11 IST

ठाणे, भिवंडी आणि कल्याण या तिन्ही लोकसभा मतदारसंघांत निवडणूक कार्यालये सुरू झाली आहेत

सुरेश लोखंडे ठाणे : जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीचे काम जोमात सुरू आहे. त्यासाठी विविध भरारी पथके तैनात आहेत. निवडणुकीच्या या कार्यालयीन कामकाजासाठी सुमारे २५० वाहनांची आवश्यकता आहे. मात्र, अद्यापपर्यंत केवळ १७१ वाहनांचा पुरवठा तिन्ही लोकसभा मतदारसंघांच्या कार्यालयीन कामकाजासाठी झाला आहे. उर्वरित वाहनांसाठी शोधाशोध सुरू आहे.

ठाणे, भिवंडी आणि कल्याण या तिन्ही लोकसभा मतदारसंघांत निवडणूक कार्यालये सुरू झाली आहेत. त्यासाठी जिल्हा पातळीवरील कार्यालयांचे अधिकारी, कर्मचारी आणि साहित्य वाहतूक आदींसाठी लागण्याऱ्या अत्यावश्यक वाहनांची जुळवाजुळव केली जात आहे. सद्य:स्थितीला विविध कामांसाठी आयएएस अधिकारीही जिल्ह्यात दाखल झाले आहेत. त्यांच्यासाठी या वाहनांची आवश्यकता आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील १८ विधानसभा कार्यक्षेत्रांतील कार्यालयांसाठी १७१ वाहनांचा पुरवठा जिल्हा वाहनव्यवस्था पथकाकडून झाला आहे. याशिवाय, आणखी १५० वाहनांची आवश्यकता असून तशी मागणी संबंधित कार्यालयांकडून केली जात आहे.जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या निवडणूक कार्यालयीन अधिकाऱ्यांना वाहनांची उपलब्धता सध्या प्राधान्याने करून देणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने आता जिल्ह्यातील तीन प्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयांवर या वाहनांच्या उपलब्धतेची जबाबदारी सोपवली आहे. त्यांच्याकडून जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या वाहनांचा शोध घेतला जात आहे. प्राप्त होणाºया वाहनांची योग्य ती तांत्रिक तपासणी केली जात आहे. त्यानंतर, संबंधित वाहनांचा मागणीनुसार पुरवठा करण्याचे काम सध्या सुरू आहे. यासाठी ठाणे, वाशी आणि कल्याण येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयांंकडून वाहनांचा शोध सुरू आहे. त्यामुळे आवश्यकतेनुसार वाहने लवकरच उपलब्ध होतील, असे जिल्हा वाहनव्यवस्थापन कक्षाकडून सांगितले जात आहे.साडेसहा हजार वाहनांची जुळवाजुळवजिल्ह्यातील १८ विधानसभा क्षेत्रांतील कार्यालयांसह ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तिन्ही लोकसभा कार्यालयीन कामकाजासाठी सुमारे २५० वाहने उपलब्ध होत आहेत. याशिवाय, जिल्ह्यातील सहा हजार ४८८ मतदानकेंद्रांसह आता नव्याने वाढणाºया साहाय्यकारी मतदानकेंद्रांवरील सुमारे ४७ हजार अधिकारी, कर्मचाºयांना मतदानाच्या आदल्या दिवसापासून वाहने उपलब्ध करून द्यावी लागणार आहेत. यासाठी सुमारे सहा हजार ७६३ वाहनांची आवश्यकता भासणार आहे. भिवंडीत मतदानकेंद्रांसाठी सुमारे दोन हजार २०० वाहनांसह कल्याण मतदारसंघासाठी दोन हजार ६३ आणि ठाण्यात मतदानाच्या दिवसाकरिता दोन हजार ५०० वाहनांची जुळवाजुळव सुरू आहे.

टॅग्स :Electionनिवडणूकlok sabhaलोकसभा