शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

निवडणुकीच्या कामकाजासाठी वाहनांची शोधाशोध सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 02:11 IST

ठाणे, भिवंडी आणि कल्याण या तिन्ही लोकसभा मतदारसंघांत निवडणूक कार्यालये सुरू झाली आहेत

सुरेश लोखंडे ठाणे : जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीचे काम जोमात सुरू आहे. त्यासाठी विविध भरारी पथके तैनात आहेत. निवडणुकीच्या या कार्यालयीन कामकाजासाठी सुमारे २५० वाहनांची आवश्यकता आहे. मात्र, अद्यापपर्यंत केवळ १७१ वाहनांचा पुरवठा तिन्ही लोकसभा मतदारसंघांच्या कार्यालयीन कामकाजासाठी झाला आहे. उर्वरित वाहनांसाठी शोधाशोध सुरू आहे.

ठाणे, भिवंडी आणि कल्याण या तिन्ही लोकसभा मतदारसंघांत निवडणूक कार्यालये सुरू झाली आहेत. त्यासाठी जिल्हा पातळीवरील कार्यालयांचे अधिकारी, कर्मचारी आणि साहित्य वाहतूक आदींसाठी लागण्याऱ्या अत्यावश्यक वाहनांची जुळवाजुळव केली जात आहे. सद्य:स्थितीला विविध कामांसाठी आयएएस अधिकारीही जिल्ह्यात दाखल झाले आहेत. त्यांच्यासाठी या वाहनांची आवश्यकता आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील १८ विधानसभा कार्यक्षेत्रांतील कार्यालयांसाठी १७१ वाहनांचा पुरवठा जिल्हा वाहनव्यवस्था पथकाकडून झाला आहे. याशिवाय, आणखी १५० वाहनांची आवश्यकता असून तशी मागणी संबंधित कार्यालयांकडून केली जात आहे.जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या निवडणूक कार्यालयीन अधिकाऱ्यांना वाहनांची उपलब्धता सध्या प्राधान्याने करून देणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने आता जिल्ह्यातील तीन प्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयांवर या वाहनांच्या उपलब्धतेची जबाबदारी सोपवली आहे. त्यांच्याकडून जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या वाहनांचा शोध घेतला जात आहे. प्राप्त होणाºया वाहनांची योग्य ती तांत्रिक तपासणी केली जात आहे. त्यानंतर, संबंधित वाहनांचा मागणीनुसार पुरवठा करण्याचे काम सध्या सुरू आहे. यासाठी ठाणे, वाशी आणि कल्याण येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयांंकडून वाहनांचा शोध सुरू आहे. त्यामुळे आवश्यकतेनुसार वाहने लवकरच उपलब्ध होतील, असे जिल्हा वाहनव्यवस्थापन कक्षाकडून सांगितले जात आहे.साडेसहा हजार वाहनांची जुळवाजुळवजिल्ह्यातील १८ विधानसभा क्षेत्रांतील कार्यालयांसह ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तिन्ही लोकसभा कार्यालयीन कामकाजासाठी सुमारे २५० वाहने उपलब्ध होत आहेत. याशिवाय, जिल्ह्यातील सहा हजार ४८८ मतदानकेंद्रांसह आता नव्याने वाढणाºया साहाय्यकारी मतदानकेंद्रांवरील सुमारे ४७ हजार अधिकारी, कर्मचाºयांना मतदानाच्या आदल्या दिवसापासून वाहने उपलब्ध करून द्यावी लागणार आहेत. यासाठी सुमारे सहा हजार ७६३ वाहनांची आवश्यकता भासणार आहे. भिवंडीत मतदानकेंद्रांसाठी सुमारे दोन हजार २०० वाहनांसह कल्याण मतदारसंघासाठी दोन हजार ६३ आणि ठाण्यात मतदानाच्या दिवसाकरिता दोन हजार ५०० वाहनांची जुळवाजुळव सुरू आहे.

टॅग्स :Electionनिवडणूकlok sabhaलोकसभा