शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

घणसोलीतील स्मशानभूमीला वाहनांचा गराडा; महापालिकेचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 23:55 IST

पार्किंगचा अभाव : अंत्यविधीसाठी ग्रामस्थांची होतेय कसरत

अनंत पाटील नवी मुंबई : महापालिकेच्या घणसोली विभाग कार्यालयासमोर असलेल्या स्मशानभूमीला वाहनांचा गराडा पडलेला असतो. परिसरात वाहनांच्या पार्किंगसाठी सुविधा नसल्याने वाहनधारक स्मशानाच्या प्रवेशद्वारावरच वाहने उभी करतात. विशेष म्हणजे तिन्ही मार्गांवर वाहने पार्क केली जात असल्याने अंत्यविधीच्या कामात अडथळा निर्माण होत आहे. अनेकदा मृतदेह खांद्यावर घेऊन ताटकळत उभे राहावे लागते. या प्रकारामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला असून स्मशानभूमीच्या परिसरातील बेकायदा पार्किंगला आळा घालण्याची मागणी केली आहे.

सुमारे एक लाख लोकसंख्या असलेल्या घणसोली गावात महापालिका विभाग कार्यालयाला लागूनच जुनी स्मशानभूमी आहे. महिन्याला पंधरा ते वीस मृतदेहांवर या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातात. तसेच विभाग कार्यालयात विविध कामांनिमित्त दररोज शेकडो लोक येत असतात. त्यामुळे या ठिकाणी नागरिकांची नेहमीच वर्दळ असते. या कार्यालयाच्या समोरच महापालिकेचा पाण्याचा जलकुंभ आहे. दळणवळणाची सोय म्हणून या परिसरातील तिन्ही मार्गांवर नो पार्किंग क्षेत्राचे फलक लावण्यात आले आहेत. मात्र या फलकांकडे दुर्लक्ष करीत सर्रासपणे चार चाकी व दुचाकी वाहने उभी केली जातात. अनेकदा रस्त्याच्या मधोमध वाहने उभी केली जातात. त्यामुळे या परिसरात नेहमीच वाहतूककोंडीची समस्या भेडसावते.

वाहनतळ नसल्याने स्मशानभूमीला नेहमी वाहनांचा विळखा पडल्याचे दृश्य पाहावयास मिळते. अनेकदा ही वाहने स्मशानभूमीतसुद्धा पार्क केल्याचे दिसून येते. त्यामुळे अंत्यविधी करताना ग्रामस्थांची कसरत होत आहे. स्मशानात उभ्या केलेल्या अस्ताव्यस्त वाहनांचा अडथळा पार करून मृतदेह नेताना ग्रामस्थांना संताप अनावर होत आहे. वाहनांच्या पार्किंगला एकही वाहनतळ उपलब्ध नसल्याने या ठिकाणी येणारी दुचाकी, चार चाकी वाहने रस्त्यांच्या दुतर्फा उभी केली जातात. त्यामुळे या भागात नेहमीच वाहतूककोंडी होते. नवी मुंबई वाहतूक पोलीस शाखेने अशा नो पार्किंगमधील वाहनचालकांवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. महापालिकेच्या विभाग अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता पार्किंगची सुविधा नसल्यामुळेच याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई