शहरं
Join us  
Trending Stories
1
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
2
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
3
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
4
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
5
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
6
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
7
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
8
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
9
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
10
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
11
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
12
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
13
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
14
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
15
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
16
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
17
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
18
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
19
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
20
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले

दोन वेळा उद्घाटन करूनही भाजी मार्केट बंदच; २१ कोटी खर्च व्यर्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 00:02 IST

मार्केट सुरू करण्याचे व्यापाऱ्यांसह प्रशासनासमोर आव्हान; देखभाल दुरुस्तीची कामे करण्याची मागणी

- नामदेव मोरे नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने जवळपास २५ कोटी रुपये खर्च करून २८५ गाळ्यांचे विस्तारित भाजी मार्केट उभारले आहे. दोन वेळा अधिकृत व तीन वेळा अनधिकृतपणे उद्घाटन होऊनही अद्याप मार्केट पूर्ण क्षमतेने सुरू होऊ शकले नाही. मार्केट सुरू करण्याचे आव्हान व्यापाऱ्यांसह प्रशासनासमोरही उभे राहिले आहे.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना झाल्यानंतर मुंबईमधील मार्केट टप्प्याटप्प्याने नवी मुंबईमध्ये स्थलांतरित केली. १९९६ मध्ये भाजी मार्केट स्थलांतरित केले. व्यापाºयांसाठी ९३६ गाळे उपलब्ध करून देण्यात आले; परंतु अनेकांना गाळे उपलब्ध होऊ शकले नाहीत. बिगरगाळाधारक व्यापारी लिलावगृह व इतर ठिकाणी व्यापार करत होते. व्यापारासाठी होणारी गैरसोय दूर करण्यासाठी एपीएमसीने २००३ मध्ये २८५ गाळ्यांचे विस्तारित मार्केट बांधण्याचा निर्णय घेतला.

२१ कोटी रुपये खर्च करून २००५ मध्ये मार्केटचे बांधकाम पूर्ण केले. २००८ मध्ये गाळ्यांचे वितरण केले. व्यापाºयांनी तत्काळ व्यापार सुरू केला; परंतु जुन्या व नवीन मार्केटला जोडणारा रस्ता नसल्याने व्यापार थांबवावा लागला. यानंतर रोडचे काम करण्यात आले. फेब्रुवारी २०११ मध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मार्केटचे उद्घाटन करण्यात आले. यानंतरही काही महिन्यांत पुन्हा मार्केट बंद पडले. मार्केट सुरू करण्यासाठीचे सर्व प्रयत्न निष्फळ झाल्यानंतर व्यापाºयांनी मार्केटच्या वापरामध्ये बदल करण्याची मागणी शासनाकडे केली. बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी पाठपुरावा करून शासनाकडून वापर बदल करण्यास परवानगी मिळविली.

गाळे बंदिस्त करून विधानसभा निवडणुकीच्या अगोदर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुन्हा मार्केटचे उद्घाटन करण्यात आले.विस्तारित भाजी मार्केटचे बांधकाम पूर्ण होऊन ११ वर्षे झाली आहेत. या कालावधीमध्ये दोन वेळा अधिकृतपणे व तीन वेळा व्यापाºयांनी स्वत:च मार्केटचे उद्घाटन केले; परंतु उद्घाटनानंतर काही दिवसांमध्ये पुन्हा येथील व्यवहार बंद पडत आहेत.

कृषी उत्पन्न व्यापारी वेल्फेअर असोसिएशनने वारंवार पाठपुरावा करून मार्केट सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत; परंतु काही विघ्नसंतोषी नागरिक तक्रारी करून मार्केट सुरू होण्यास अडथळे निर्माण करत आहेत. मार्केटमधील अनेक कामे अपूर्ण आहेत. मीटर बॉक्स उघडे असल्यामुळे विजेचा धक्का लागून अपघात होण्याची शक्यता आहे. मार्केटमध्ये तळमजल्यावर नऊ व पहिल्या मजल्यावर नऊ सार्वजनिक प्रसाधनगृह सुरू केली आहेत; परंतु त्याची योग्य पद्धतीने देखभाल होत नाही. मलनि:सारणचा व पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठीचे पाइप तुटले आहेत. देखभाल दुरुस्तीची कामे वेळेत केली जावी, अशी मागणी व्यापाºयांनी केली आहे.

विस्तारित भाजी मार्केट बांधण्यासाठी व ते प्रत्यक्षात सुरू करण्यासाठी आम्ही सर्वांनी खूप प्रयत्न केले आहेत. बाजार समितीचे अधिकारी, आमदार मंदा म्हात्रे या सर्वांनी आम्हाला खूप सहकार्य केले. मार्केट पूर्ण क्षमतेने सुरू व्हावे एवढीच अपेक्षा असून त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.- रामदास चासकर, सचिव, कृषी उत्पन्न व्यापारी वेल्फेअर असोसिएशनमार्केटमध्ये भाजीपाल्याचा व्यापार चालत नसल्यामुळे आम्ही स्थानिक आमदारांच्या मदतीने शासनाकडे पाठपुरावा करून वापरामध्ये बदल करून घेतला आहे. मार्केट सुरू करण्यासाठी येणाºया अडचणी प्रशासनाने सोडवाव्या, यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे.- राहुल पवार, कायदेविषयी सल्लागार, व्यापारी वेल्फेअर असोसिएशन

विस्तारित भाजी मार्केटमधील समस्या सोडविण्यात याव्यात. प्रसाधनगृहाची देखभाल केली जावी, उघड्या विद्युत मीटरबॉक्समुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. मार्केटमध्ये अनेक समस्या असून प्रशासनाने त्या सोडवाव्यात, एवढीच अपेक्षा.- उत्तम काळे, अध्यक्ष, कृषी उत्पन्न वेल्फेअर असोसिएशन

विस्तारित भाजी मार्केटमधील समस्या सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केले आहेत. देखभाल दुरुस्तीची कामे करण्यासाठी निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. लवकरच सर्व समस्या सोडविण्यात येतील.- अनिल चव्हाण, सचिव, एपीएमसी

खर्च व्यर्थ जाऊ नये

विस्तारित भाजी मार्केट सुरू होऊ नये यासाठी काही विघ्नसंतोषी मंडळी अडथळे आणत आहेत, हे अडथळे दूर करण्यासाठी प्रशासनाने मदत करावी. प्रशासनाने २१ कोटी रुपये खर्च केले आहेत. उर्वरित कामे करण्यासाठी तीन ते चार कोटी रुपये खर्च झाले आहेत. जवळपास २५ कोटी रुपये खर्च करून बांधलेले मार्केट बंद राहू नये, यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मत व्यापाºयांनी व्यक्त केले आहे.

टॅग्स :MarketबाजारNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिकाNavi Mumbaiनवी मुंबई