शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
4
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
5
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
6
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
7
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
8
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
9
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
10
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
11
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
12
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
13
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
14
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
15
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
16
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
17
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
18
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
19
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
20
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

दोन वेळा उद्घाटन करूनही भाजी मार्केट बंदच; २१ कोटी खर्च व्यर्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 00:02 IST

मार्केट सुरू करण्याचे व्यापाऱ्यांसह प्रशासनासमोर आव्हान; देखभाल दुरुस्तीची कामे करण्याची मागणी

- नामदेव मोरे नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने जवळपास २५ कोटी रुपये खर्च करून २८५ गाळ्यांचे विस्तारित भाजी मार्केट उभारले आहे. दोन वेळा अधिकृत व तीन वेळा अनधिकृतपणे उद्घाटन होऊनही अद्याप मार्केट पूर्ण क्षमतेने सुरू होऊ शकले नाही. मार्केट सुरू करण्याचे आव्हान व्यापाऱ्यांसह प्रशासनासमोरही उभे राहिले आहे.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना झाल्यानंतर मुंबईमधील मार्केट टप्प्याटप्प्याने नवी मुंबईमध्ये स्थलांतरित केली. १९९६ मध्ये भाजी मार्केट स्थलांतरित केले. व्यापाºयांसाठी ९३६ गाळे उपलब्ध करून देण्यात आले; परंतु अनेकांना गाळे उपलब्ध होऊ शकले नाहीत. बिगरगाळाधारक व्यापारी लिलावगृह व इतर ठिकाणी व्यापार करत होते. व्यापारासाठी होणारी गैरसोय दूर करण्यासाठी एपीएमसीने २००३ मध्ये २८५ गाळ्यांचे विस्तारित मार्केट बांधण्याचा निर्णय घेतला.

२१ कोटी रुपये खर्च करून २००५ मध्ये मार्केटचे बांधकाम पूर्ण केले. २००८ मध्ये गाळ्यांचे वितरण केले. व्यापाºयांनी तत्काळ व्यापार सुरू केला; परंतु जुन्या व नवीन मार्केटला जोडणारा रस्ता नसल्याने व्यापार थांबवावा लागला. यानंतर रोडचे काम करण्यात आले. फेब्रुवारी २०११ मध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मार्केटचे उद्घाटन करण्यात आले. यानंतरही काही महिन्यांत पुन्हा मार्केट बंद पडले. मार्केट सुरू करण्यासाठीचे सर्व प्रयत्न निष्फळ झाल्यानंतर व्यापाºयांनी मार्केटच्या वापरामध्ये बदल करण्याची मागणी शासनाकडे केली. बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी पाठपुरावा करून शासनाकडून वापर बदल करण्यास परवानगी मिळविली.

गाळे बंदिस्त करून विधानसभा निवडणुकीच्या अगोदर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुन्हा मार्केटचे उद्घाटन करण्यात आले.विस्तारित भाजी मार्केटचे बांधकाम पूर्ण होऊन ११ वर्षे झाली आहेत. या कालावधीमध्ये दोन वेळा अधिकृतपणे व तीन वेळा व्यापाºयांनी स्वत:च मार्केटचे उद्घाटन केले; परंतु उद्घाटनानंतर काही दिवसांमध्ये पुन्हा येथील व्यवहार बंद पडत आहेत.

कृषी उत्पन्न व्यापारी वेल्फेअर असोसिएशनने वारंवार पाठपुरावा करून मार्केट सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत; परंतु काही विघ्नसंतोषी नागरिक तक्रारी करून मार्केट सुरू होण्यास अडथळे निर्माण करत आहेत. मार्केटमधील अनेक कामे अपूर्ण आहेत. मीटर बॉक्स उघडे असल्यामुळे विजेचा धक्का लागून अपघात होण्याची शक्यता आहे. मार्केटमध्ये तळमजल्यावर नऊ व पहिल्या मजल्यावर नऊ सार्वजनिक प्रसाधनगृह सुरू केली आहेत; परंतु त्याची योग्य पद्धतीने देखभाल होत नाही. मलनि:सारणचा व पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठीचे पाइप तुटले आहेत. देखभाल दुरुस्तीची कामे वेळेत केली जावी, अशी मागणी व्यापाºयांनी केली आहे.

विस्तारित भाजी मार्केट बांधण्यासाठी व ते प्रत्यक्षात सुरू करण्यासाठी आम्ही सर्वांनी खूप प्रयत्न केले आहेत. बाजार समितीचे अधिकारी, आमदार मंदा म्हात्रे या सर्वांनी आम्हाला खूप सहकार्य केले. मार्केट पूर्ण क्षमतेने सुरू व्हावे एवढीच अपेक्षा असून त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.- रामदास चासकर, सचिव, कृषी उत्पन्न व्यापारी वेल्फेअर असोसिएशनमार्केटमध्ये भाजीपाल्याचा व्यापार चालत नसल्यामुळे आम्ही स्थानिक आमदारांच्या मदतीने शासनाकडे पाठपुरावा करून वापरामध्ये बदल करून घेतला आहे. मार्केट सुरू करण्यासाठी येणाºया अडचणी प्रशासनाने सोडवाव्या, यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे.- राहुल पवार, कायदेविषयी सल्लागार, व्यापारी वेल्फेअर असोसिएशन

विस्तारित भाजी मार्केटमधील समस्या सोडविण्यात याव्यात. प्रसाधनगृहाची देखभाल केली जावी, उघड्या विद्युत मीटरबॉक्समुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. मार्केटमध्ये अनेक समस्या असून प्रशासनाने त्या सोडवाव्यात, एवढीच अपेक्षा.- उत्तम काळे, अध्यक्ष, कृषी उत्पन्न वेल्फेअर असोसिएशन

विस्तारित भाजी मार्केटमधील समस्या सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केले आहेत. देखभाल दुरुस्तीची कामे करण्यासाठी निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. लवकरच सर्व समस्या सोडविण्यात येतील.- अनिल चव्हाण, सचिव, एपीएमसी

खर्च व्यर्थ जाऊ नये

विस्तारित भाजी मार्केट सुरू होऊ नये यासाठी काही विघ्नसंतोषी मंडळी अडथळे आणत आहेत, हे अडथळे दूर करण्यासाठी प्रशासनाने मदत करावी. प्रशासनाने २१ कोटी रुपये खर्च केले आहेत. उर्वरित कामे करण्यासाठी तीन ते चार कोटी रुपये खर्च झाले आहेत. जवळपास २५ कोटी रुपये खर्च करून बांधलेले मार्केट बंद राहू नये, यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मत व्यापाºयांनी व्यक्त केले आहे.

टॅग्स :MarketबाजारNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिकाNavi Mumbaiनवी मुंबई