शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

वाशीतील पदपथ फेरीवाल्यांच्या विळख्यात; पादचाऱ्यांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 01:11 IST

कारवाईकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप

नवी मुंबई : अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी, फेरीवाल्यांकडून पदपथ तसेच रस्ते बळकावले जात असल्याने अनेक समस्या निर्माण होत आहेत. अशाच प्रकारातून वाशी परिसरातील नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत असतानाही कारवाई होत नसल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.वाशी परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. तीन वर्षांपूर्वी तत्कालीन पालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांनी सरसकट अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करून परिसर स्वच्छ केला होता. मात्र, त्यांच्या बदलीनंतर पुन्हा मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांनी रस्ते व पदपथ बळकावल्याचे दिसून येत आहे. याचा परिणाम पादचाऱ्यांसह वाहन चालकांना सहन करावा लागत आहे. वाशी सेक्टर ९ परिसरात अशाच प्रकारातून सतत वाहतूककोंडी होत असते, तर प्रत्येक रविवारी तिथल्या रस्त्यांवर बाजार भरू लागला आहे. फेरीवाल्यांवर वेळीच कारवाई न केल्यास भविष्यात पदपथांपाठोपाठ रस्तेदेखील फेरीवाल्यांच्या घश्यात जाण्याची भीती वर्तविली जात आहे. व्यावसायिक गाळ्यांच्या बाहेरही हेच चित्र पाहायला मिळत आहे. त्यांच्याकडून मार्जिनल स्पेसवर साहित्य मांडले जात असल्याने पादचाºयांची गैरसोय होत आहे. विभाग कार्यालयाच्या परिसरात हे दृश्य नजरेस पडत असल्याने पालिकेच्या अतिक्रमण विरोधी कारवाईच्या क्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.