शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

वाशीतील पदपथ फेरीवाल्यांच्या विळख्यात; पादचाऱ्यांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 01:11 IST

कारवाईकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप

नवी मुंबई : अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी, फेरीवाल्यांकडून पदपथ तसेच रस्ते बळकावले जात असल्याने अनेक समस्या निर्माण होत आहेत. अशाच प्रकारातून वाशी परिसरातील नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत असतानाही कारवाई होत नसल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.वाशी परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. तीन वर्षांपूर्वी तत्कालीन पालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांनी सरसकट अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करून परिसर स्वच्छ केला होता. मात्र, त्यांच्या बदलीनंतर पुन्हा मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांनी रस्ते व पदपथ बळकावल्याचे दिसून येत आहे. याचा परिणाम पादचाऱ्यांसह वाहन चालकांना सहन करावा लागत आहे. वाशी सेक्टर ९ परिसरात अशाच प्रकारातून सतत वाहतूककोंडी होत असते, तर प्रत्येक रविवारी तिथल्या रस्त्यांवर बाजार भरू लागला आहे. फेरीवाल्यांवर वेळीच कारवाई न केल्यास भविष्यात पदपथांपाठोपाठ रस्तेदेखील फेरीवाल्यांच्या घश्यात जाण्याची भीती वर्तविली जात आहे. व्यावसायिक गाळ्यांच्या बाहेरही हेच चित्र पाहायला मिळत आहे. त्यांच्याकडून मार्जिनल स्पेसवर साहित्य मांडले जात असल्याने पादचाºयांची गैरसोय होत आहे. विभाग कार्यालयाच्या परिसरात हे दृश्य नजरेस पडत असल्याने पालिकेच्या अतिक्रमण विरोधी कारवाईच्या क्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.