शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
4
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
8
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
9
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
10
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
11
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
12
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
13
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
15
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
16
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
17
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
18
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
19
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
20
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा

वाशी न्यायालय नवीन इमारतीत

By admin | Updated: May 11, 2017 02:19 IST

सीबीडी सेक्टर १५ येथे वाशी न्यायालयासाठी उभारण्यात आलेल्या आलिशान इमारतीचे बुधवारी उद्घाटन झाले. उच्च न्यायालयाचे

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : ऐरोलीसह शहरातील ११ धारण तलावांचे (होल्डिंग पाँड) अस्तित्व धोक्यात आले आहे. मँग्रोजमुळे तलावांची साफसफाई करता येत नाही. यामुळे भविष्यात पूरसदृश स्थिती निर्माण झाली किंवा मोठी भरती आल्यास खाडीचे पाणी शहरात घुसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. न्यायालयाची परवानगी मिळवून साफसफाईची कामे करण्याची मागणी नागरिकांसह लोकप्रतिनिधींनी केली आहे. नवी मुंबई शहर खाडीकिनारी वसले आहे. समुद्राला भरती आली की खाडीचे पाणी शहरात घुसण्याची शक्यता असते. भविष्यात शहराला पुराचा धोका पोहचू नये यासाठी सिडकोने बेलापूर ते ऐरोलीदरम्यान तब्बल ११ धारण तलाव तयार केले आहेत. २०० हेक्टर क्षेत्रफळावर हे तलाव तयार केले आहेत. परंतु मागील काही वर्षामध्ये या तलावामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. तलावामध्ये खारफुटी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ऐरोलीमध्ये तब्बल ३० हेक्टर क्षेत्रफळावर दोन धारण तलाव आहेत. पण त्याची साफसफाई झाली नसल्यामुळे त्यामध्ये खारफुटी वाढली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी अशोक पाटील, नगरसेविका संगीता पाटील यांनी वारंवार होल्डिंग पाँडची सफाई करण्याची मागणी केली आहे. परंतु हा प्रश्न उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असल्याने प्रशासनाकडून साफसफाई करता येत नाही. यामुळे तलावांचे अस्तित्वच धोक्यात येवू लागले आहे. शक्य तितक्या लवकर गाळ काढण्याचे काम सुरू केले नाही तर भविष्यात धारण तलावांचे अस्तित्व नष्ट होणार असून भविष्यात त्याचा गंभीर परिणाम शहराच्या सुरक्षेवर होणार आहे. यामुळे महापालिका प्रशासनाने साफसफाई करणे किती आवश्यक आहे ते न्यायालयाच्या निदर्शनास आणून द्यावे व हा प्रश्न सोडवावा, अशी मागणी करण्यात येत आहे. ऐरोलीप्रमाणे इतर ठिकाणच्या होल्डिंग पाँडची स्थितीही बिकट झाली आहे. वाशी व कोपरखैरणेच्या मध्यभागी असलेल्या होल्डींग पाँडचीही दुरावस्था झाली आहे. शिक्षण मंडळाचे मा