शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

निर्मळ यात्रेसाठी वसई होते आहे सज्ज

By admin | Updated: November 12, 2014 22:52 IST

ऐतिहासिक निर्मळ यात्र 18 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. या यात्रेला मुंबई ठाण्यासहीत शेजारच्या गुजरात राज्यातुनही भाविक येत असतात.

दीपक मोहिते ल्ल वसई
ऐतिहासिक  निर्मळ यात्र 18 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. या यात्रेला मुंबई ठाण्यासहीत शेजारच्या गुजरात राज्यातुनही भाविक येत असतात. यात्रेच्या निमित्ताने दरवर्षी निर्मळ समाधीस्थळ (मंदिर) परिसरात रोषणाई केली जाते.
मंदिरासमोरील रस्त्याच्या दुतर्फा भागात विविध वस्तूंची दुकाने थाटण्यात येत असतात. लहान मुलांसाठी विविध खेळण्यांची दुकाने तसेच आकाश पाळणो लावण्यात येत आहेत. तसेच महिलांसाठी शुंगाराची साधने, मिठाई, भांडी, कपडे इ. दुकाने लक्ष वेधून घेत आहेत. या निर्मळ यात्रेत महाराष्ट्र व गुजरात भागातील शेकडो व्यापारी आपले स्टॉल उभारतात. यात्र काळात दररोज लाखो रूपयांची उलाढाल होत असते. सायंकाळी 4 वाजता सुरू होणारी ही यात्र रात्री उशीरार्पयत सुरू असते. गिरीज-नाळा रस्त्यावरील वाहतुक अन्य मार्गावरून वळवण्यात येत असते. या यात्रेदरम्यान महसुल व पोलीस यंत्रणा चोख बंदोबस्त ठेवत असतात. नागरीकरणासमवेत अनेक भागातील यात्र कमी होत जात आहेत परंतु निर्मळ यात्र उत्साहात भरते.
 
निर्मळ गावातील वातावरण निसर्गरम्य तर आहेच. शिवाय येथे विस्तीर्ण तलाव आणि मंदिर आहे. या तलावाची निर्मिती परशुरामाने केल्याची नोंद पद्म पुराणात आहे. निर्मळ येथे आठवे जगत्गुरू o्री शंकराचार्य विद्याशंकर भारती यांची समाधी आहे. इसवी सन 1387 मध्ये त्यांनी समाधी घेतली. या समाधी मंदिराच्या पश्चिमेस सुळेश्वराचे मंदिर तर समाधीच्या उजव्या बाजुला निर्मळेश्वराची पिंडी आहे. मंदिराच्या सभोवताली अनेक देवा-देवींच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. वसई विजयानंतर चिमाजी आप्पांनी मंदिराचा जिर्णोद्धार केला. त्यानंतर 1988 मध्ये भाऊसाहेब वर्तक यांनी पुन्हा मंदिराचा जिर्णोद्धार करून विस्तिर्ण मंदिर बांधले तर अंदाजे 3क्क् वर्षापुर्वी निर्मळ यात्रेला सुरूवात झाल्याची माहिती मंदिर विश्वस्तांनी दिली.