शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

निर्मळ यात्रेसाठी वसई होते आहे सज्ज

By admin | Updated: November 12, 2014 22:52 IST

ऐतिहासिक निर्मळ यात्र 18 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. या यात्रेला मुंबई ठाण्यासहीत शेजारच्या गुजरात राज्यातुनही भाविक येत असतात.

दीपक मोहिते ल्ल वसई
ऐतिहासिक  निर्मळ यात्र 18 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. या यात्रेला मुंबई ठाण्यासहीत शेजारच्या गुजरात राज्यातुनही भाविक येत असतात. यात्रेच्या निमित्ताने दरवर्षी निर्मळ समाधीस्थळ (मंदिर) परिसरात रोषणाई केली जाते.
मंदिरासमोरील रस्त्याच्या दुतर्फा भागात विविध वस्तूंची दुकाने थाटण्यात येत असतात. लहान मुलांसाठी विविध खेळण्यांची दुकाने तसेच आकाश पाळणो लावण्यात येत आहेत. तसेच महिलांसाठी शुंगाराची साधने, मिठाई, भांडी, कपडे इ. दुकाने लक्ष वेधून घेत आहेत. या निर्मळ यात्रेत महाराष्ट्र व गुजरात भागातील शेकडो व्यापारी आपले स्टॉल उभारतात. यात्र काळात दररोज लाखो रूपयांची उलाढाल होत असते. सायंकाळी 4 वाजता सुरू होणारी ही यात्र रात्री उशीरार्पयत सुरू असते. गिरीज-नाळा रस्त्यावरील वाहतुक अन्य मार्गावरून वळवण्यात येत असते. या यात्रेदरम्यान महसुल व पोलीस यंत्रणा चोख बंदोबस्त ठेवत असतात. नागरीकरणासमवेत अनेक भागातील यात्र कमी होत जात आहेत परंतु निर्मळ यात्र उत्साहात भरते.
 
निर्मळ गावातील वातावरण निसर्गरम्य तर आहेच. शिवाय येथे विस्तीर्ण तलाव आणि मंदिर आहे. या तलावाची निर्मिती परशुरामाने केल्याची नोंद पद्म पुराणात आहे. निर्मळ येथे आठवे जगत्गुरू o्री शंकराचार्य विद्याशंकर भारती यांची समाधी आहे. इसवी सन 1387 मध्ये त्यांनी समाधी घेतली. या समाधी मंदिराच्या पश्चिमेस सुळेश्वराचे मंदिर तर समाधीच्या उजव्या बाजुला निर्मळेश्वराची पिंडी आहे. मंदिराच्या सभोवताली अनेक देवा-देवींच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. वसई विजयानंतर चिमाजी आप्पांनी मंदिराचा जिर्णोद्धार केला. त्यानंतर 1988 मध्ये भाऊसाहेब वर्तक यांनी पुन्हा मंदिराचा जिर्णोद्धार करून विस्तिर्ण मंदिर बांधले तर अंदाजे 3क्क् वर्षापुर्वी निर्मळ यात्रेला सुरूवात झाल्याची माहिती मंदिर विश्वस्तांनी दिली.