शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
3
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
4
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
5
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
6
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
7
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
8
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
9
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
10
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
11
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
12
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
13
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
14
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
15
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
16
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
17
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
18
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
19
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
20
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं

पर्यावरणाचे रक्षण आणि शिक्षण क्षेत्रासाठी वंदे भारत पदयात्रा, तरुणाचा 16000 किमी पायी प्रवास

By वैभव गायकर | Updated: November 7, 2023 18:20 IST

Navi Mumbai News: उत्तर प्रदेश मधील सुलतानपूर येथील रहिवासी असलेल्या आशुतोष पांडे या तरुणाने पर्यावरणाचे रक्षण आणि शिक्षण क्षेत्राच्या सुधारणेसाठी सुमारे 16000 किमीच्या पायी प्रवासाला सुरुवात केली आहे.

- वैभव गायकरपनवेल - उत्तर प्रदेश मधील सुलतानपूर येथील रहिवासी असलेल्या आशुतोष पांडे या तरुणाने पर्यावरणाचे रक्षण आणि शिक्षण क्षेत्राच्या सुधारणेसाठी सुमारे 16000 किमीच्या पायी प्रवासाला सुरुवात केली आहे. 21 राज्यातुन जाणारी हि पदयात्रा 4 डिसेंबर रोजी युपीच्या हनुमान गढी येथुन सुरुवात झाली आहे.

उत्तर प्रदेश,बिहार, झारखण्ड, छत्तीसगढ़, उड़ीसा, अन्द्र प्रदेश, तेलंगाना, तमिलनाडु, केरला, कर्नाटका, गोवा आदी राज्यातुन 9400 किमी  पायी प्रवास केल्यांनतर आशुतोष पांडे महाराष्ट्रात दाखल झाला आहे.दि.7 रोजी आशुतोष नवी मुंबईत दाखल झाला.या प्रवासा दरम्यान सेव्ह द इन्व्हरमेन्ट हे जनजागृतीपर फलक सोबत घेऊन पर्यावरणाचे रक्षणाचा संदेश आशुतोषने दिला आहे.या प्रवासादरम्यान आजवर 50 हजार विद्यार्थ्यांनामध्ये जवळपास 2300 झाडांचे वृक्षारोपण केले आहे.या प्रवासादरम्यान आशुतोषने विविध राज्यातील जिल्हाधिकारी,राज्यपाल,मुख्यमंत्री,मेट्रोमहोदय,सामाजिक संघटना आदींसह हजारो नागरिकांच्या भेटी घेतल्या आहेत.हि पदयात्रा पुढे गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान, दिल्ली, हरियाणा, पंजाब, कश्मीर, लद्दाख,हिमाचल प्रदेश, उत्तराखंड नतंर  2025 मे मध्ये अयोध्येत पूर्णत्वास येणार असुन यावेळेला एक लाख वृक्षा रोपणाचा संकल्प पूर्ण झालेला असेल अशी माहिती आशुतोष पांडे यांनी दिली.

या प्रवासादरम्यान मला भारतीय संस्कृतीचे विविध अंग जवळून पहावयास मिळत आहेत.रस्त्यातून जाताना नागरिक देखील कुतूहलाने विचारपूस करत असल्याचे आशुतोष ने सांगितले.

कोविडमुळे माझ्या जवळच्या मित्रांना मला गमवावे लागले.त्यावेळेला निर्माण झालेल्या ऑक्सिजनचा तुटवडा हा भयानक होता.यावेळी मी पर्यावरण रक्षणाबाबत जागरूक झालो आणि नागरिकांना याचे महत्व सांगु लागलो.पर्यावरण आणि शिक्षण क्षेत्रात सुधारणा झाल्यास भारताची प्रगती अधिक वेगाने होईल.- आशुतोष पांडे (16000 किमी पदयात्री )

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई