शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

रिकाम्या भूखंडांना डबक्याचे स्वरूप, काही प्रमाणात गवतही वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 01:22 IST

महापालिका व सिडकोने योग्य ती दक्षता घ्यावी, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे.

अरुणकुमार मेहत्रेकळंबोली : पनवेल महापालिका क्षेत्रातील सिडको वसाहतीत अनेक भूखंड मोकळेच आहेत. सदर भूखंडांच्या विकासाकडे सिडकोने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे या भूखंडांवर गवताचे जंगल वाढले आहे. आता पावसाळ्यात या भूखंडांना डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. याचा त्रास आजूबाजूच्या सोसायट्यांना होऊ लागला आहे. याबाबत महापालिका व सिडकोने योग्य ती दक्षता घ्यावी, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे.कळंबोली, रोडपाली, कामोठे, खारघर, खांदा वसाहत या ठिकाणी महापालिका क्षेत्र असले, तरी मोकळे भूखंड अद्याप सिडकोच्या ताब्यात आहेत. या मोकळ्या भूखंडांवर मोठ्या प्रमाणात गवत वाढल्याने भूखंडांचे अस्तित्व संपले आहे, तसेच या जागेवर डेब्रिज व कचरा टाकला जात आहे. त्यामुळे उंदीर, घुशी व इतर सरपटणाऱ्या प्राण्यांचा येथे वावर वाढला आहे. या प्राण्यांचा उपद्रव शेजारच्या वसाहतींना होत आहे. सध्या पावसाचे दिवस आहेत. दोन दिवस कोसळलेल्या पावसामुळे या भूखंडांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. डासांचे प्रमाण वाढल्याने सायंकाळी जास्त उपद्रव करतात. कळंबोली सेक्टर येथील ११ भारत पेट्रोल पंपाजवळील भूखंडावरही पावसाचे पाणी साचले आहे. या जागेवर कचरा, झाडांच्या तुटलेल्या फांद्या टाकण्यात आल्या आहेत. पावसाच्या पाण्यामुळे या फांद्या कुजल्या आहेत. त्यामुळे त्यातून दुर्गंधी येत आहे. कामोठे सेक्टर ८ या ठिकाणीही पावसाचे पाणी साचल्याने बाजूला राहात असलेल्या रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत महापालिका व सिडकोने संबंधित जागा मालकाला सूचना कराव्यात, तसेच सिडकोने आपल्या मालकीच्या भूखंडांची निगा राखावी, अशी मागणी रहिवाशांकडून केली जात आहे.>साथीच्या रोगांची भीती : आगोदरच कोरोनाचे संकट आहे. यात पावसाळ्यात उद्भवणाºया साथीच्या रोगांनीही तोंड वर काढले आहे. मोकळ्या भूखंडांवर साचलेले पाणी, घनकचºयामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे मलेरिया, डेंग्यू व इतर साथीच्या रोगांची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने वेळीच उपाययोजना करण्याची गरज असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.