शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

रिकाम्या भूखंडांना डबक्याचे स्वरूप, काही प्रमाणात गवतही वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 01:22 IST

महापालिका व सिडकोने योग्य ती दक्षता घ्यावी, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे.

अरुणकुमार मेहत्रेकळंबोली : पनवेल महापालिका क्षेत्रातील सिडको वसाहतीत अनेक भूखंड मोकळेच आहेत. सदर भूखंडांच्या विकासाकडे सिडकोने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे या भूखंडांवर गवताचे जंगल वाढले आहे. आता पावसाळ्यात या भूखंडांना डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. याचा त्रास आजूबाजूच्या सोसायट्यांना होऊ लागला आहे. याबाबत महापालिका व सिडकोने योग्य ती दक्षता घ्यावी, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे.कळंबोली, रोडपाली, कामोठे, खारघर, खांदा वसाहत या ठिकाणी महापालिका क्षेत्र असले, तरी मोकळे भूखंड अद्याप सिडकोच्या ताब्यात आहेत. या मोकळ्या भूखंडांवर मोठ्या प्रमाणात गवत वाढल्याने भूखंडांचे अस्तित्व संपले आहे, तसेच या जागेवर डेब्रिज व कचरा टाकला जात आहे. त्यामुळे उंदीर, घुशी व इतर सरपटणाऱ्या प्राण्यांचा येथे वावर वाढला आहे. या प्राण्यांचा उपद्रव शेजारच्या वसाहतींना होत आहे. सध्या पावसाचे दिवस आहेत. दोन दिवस कोसळलेल्या पावसामुळे या भूखंडांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. डासांचे प्रमाण वाढल्याने सायंकाळी जास्त उपद्रव करतात. कळंबोली सेक्टर येथील ११ भारत पेट्रोल पंपाजवळील भूखंडावरही पावसाचे पाणी साचले आहे. या जागेवर कचरा, झाडांच्या तुटलेल्या फांद्या टाकण्यात आल्या आहेत. पावसाच्या पाण्यामुळे या फांद्या कुजल्या आहेत. त्यामुळे त्यातून दुर्गंधी येत आहे. कामोठे सेक्टर ८ या ठिकाणीही पावसाचे पाणी साचल्याने बाजूला राहात असलेल्या रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत महापालिका व सिडकोने संबंधित जागा मालकाला सूचना कराव्यात, तसेच सिडकोने आपल्या मालकीच्या भूखंडांची निगा राखावी, अशी मागणी रहिवाशांकडून केली जात आहे.>साथीच्या रोगांची भीती : आगोदरच कोरोनाचे संकट आहे. यात पावसाळ्यात उद्भवणाºया साथीच्या रोगांनीही तोंड वर काढले आहे. मोकळ्या भूखंडांवर साचलेले पाणी, घनकचºयामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे मलेरिया, डेंग्यू व इतर साथीच्या रोगांची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने वेळीच उपाययोजना करण्याची गरज असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.