शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
3
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
4
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
5
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
6
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
7
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
8
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
9
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
10
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
11
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
12
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
13
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
14
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
15
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
16
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
17
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
18
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
19
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
20
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

वृक्ष प्राधिकरणाचे महासभेत वाभाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 02:51 IST

शासन निर्णयानुसार वृक्षलागवडीसाठी महापालिकेकडून वनविभागाला निधी देण्यास लोकप्रतिनिधींनी विरोध दर्शवला आहे. वन विभागात अनेक घोटाळे असल्याने त्यांच्यामार्फत वृक्षलागवड करण्याऐवजी पालिकेनेच हे काम करावे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

नवी मुंबई : शासन निर्णयानुसार वृक्षलागवडीसाठी महापालिकेकडून वनविभागाला निधी देण्यास लोकप्रतिनिधींनी विरोध दर्शवला आहे. वन विभागात अनेक घोटाळे असल्याने त्यांच्यामार्फत वृक्षलागवड करण्याऐवजी पालिकेनेच हे काम करावे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. तर अनेक ठिकाणी वृक्षतोड होत असतानाही वृक्ष प्राधिकरण त्याकडे डोळेझाक करत असल्याचाही संताप लोकप्रतिनिधींनी सभागृहात व्यक्त केला.आगामी पावसाळ्यात महापालिकेकडून एक लाख एक हजार वृक्षांची लागवड केली जाणार आहे. राज्य शासनाकडून राबवल्या जात असलेल्या वृक्षलागवड अभियानाच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानुसार इलठाणपाडा, रबाळे व महापे येथे २५ हजार, सायन-पनवेल मार्गालगत सहा हजार, तर मोरबे धरणाभोवती ७० हजार झाडे लावली जाणार आहेत, त्याकरिता एकूण ११ कोटी ७५ लाख ७४ हजार ५०० रुपये खर्चाची अपेक्षा आहे. या खर्च मंजुरीचा प्रस्ताव शुक्रवारी महासभेत आला असता, वृक्ष प्राधिकरण विभागाच्या लोकप्रतिनिधींनी वाभाडे काढले. आजवर लावलेल्या वृक्षांचे संवर्धन होत नसून, बेकायदा सुरू असलेल्या जुन्या वृक्षतोडीकडेही वृक्ष प्राधिकरणाचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा संताप माजी महापौर सुधाकर सोनवणे यांनी व्यक्त केला. त्यामुळे आजवर किती झाडे लावली, त्यापैकी किती झाडे जिवंत आहेत, याची आकडेवारीही त्यांनी सभागृहात मागितली.अनेक ठिकाणी जुनी झाडे तोडून त्या ठिकाणी नवी झाडे लावली जात असल्याचाही संशय त्यांनी व्यक्त केला. महापौर बंगला परिसरातही मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झालेली असल्याचे ते म्हणाले. तर पालिकेकडे स्वत:ची जागाच शिल्लक नसल्याने नेमकी वृक्षलागवड कुठे होते, याच्याही चौकशीची त्यांनी मागणी केली. नगरसेवक गणेश भगत यांनी एनआरआय कॉम्पलेक्सच्या मागील बाजूस लावलेली झाडे पाण्याअभावी जळून गेल्याचीही बाब उघडकीस आणून दिली. या वेळी नगरसेवक देविदास हांडेपाटील यांनी वृक्षलागवडीसाठी वन विभागाला पैसे का द्यायचे, असा प्रश्न उपस्थित केला. वन विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर येत असल्याने त्यांनी निधी देण्यास विरोध दर्शवला. पालिकेची स्वत:ची यंत्रणा असल्याने ही वृक्षलागवड पालिकेनेच करण्याचीही मागणी त्यांनी केली. या वेळी स्थायी समिती सभापती शुभांगी पाटील, नगरसेवक प्रशांत पाटील, रामदास पवळे यांनीही वृक्ष प्राधिकरणाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. सभागृहनेते रवींद्र इथापे यांनी ‘फिफा’च्या वेळी शहरात मार्गालगत, चौकांमध्ये लावलेली झाडे, लॉन यांची दयनीय अवस्था असल्याचे सांगितले. तसेच यापूर्वी गवळी देव परिसरात वृक्षलागवडीवर केलेल्या खर्चाचा हिशोब मागितला. त्यानुसार महापौर जयवंत सुतार यांनी वृक्षलागवडीच्या कामाचे पालिकेने निरीक्षण करण्याच्या सूचना देत, मोरबे धरणालगत वृक्षलागवड वगळून प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी दिली.