शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

उरणमध्ये ९० घरे धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 02:26 IST

उरण शहरात ९० घरे, चाळी आणि इमारती धोकादायक ठरविण्यात आल्या आहेत. घरमालकांना नोटिसा बजाविल्यानंतरही अशा धोकादायक घरांत ४३ कुटुंब वास्तव्य करीत असल्याचे खळबळजनक वास्तव समोर आले आहे.

उरण : उरण शहरात ९० घरे, चाळी आणि इमारती धोकादायक ठरविण्यात आल्या आहेत. घरमालकांना नोटिसा बजाविल्यानंतरही अशा धोकादायक घरांत ४३ कुटुंब वास्तव्य करीत असल्याचे खळबळजनक वास्तव समोर आले आहे.मुंबई घाटकोपर येथे घडलेल्या दुर्घटनेनंतर धोकादायक इमारतींचा विषय ऐरणीवर आला आहे. उरण नगरपरिषदेच्या हद्दीत बाजारपेठ, मोरा, भवरा, बोरी, कुंभारवाडा आदी ठिकाणी ९० घरे धोकादायक असल्याचे सर्वेक्षणानंतर आढळून आले आहे. उनपने केलेल्या सर्व्हेनंतर धोकादायक ठरविण्यात आलेल्या ९० घरांमध्ये कौलारू घरे ८३, एक मजली वाडे अथवा बैठ्या चाळी ४, तर ३ इमारतींचा समावेश असल्याची माहिती उनपचे नगर अभियंता अनुपकुमार कांबळे यांनी दिली. १९६० सालापूर्वी असलेली धोकादायक घरे, वाडे, चाळी, इमारतींना उरण नगरपरिषदेने अनेकदा नोटिसाही बजावल्या आहेत. अतिवृष्टी अथवा खराब हवामानामुळे घरे, इमारती कोसळण्याची भीती असल्याने उनपने शक्यताही व्यक्त केली आहे. मात्र, उनपच्या नोटिशींनंतर धोकादायक घरात सध्या ४३ कुटुंबे वास्तव करीत असल्याची माहिती उनपचे नगर अभियंता अनुपकुमार कांबळे यांनी दिली.बहुतांश धोकादायक घरांमध्ये एक मजली कौलारू घरे अथवा चाळी, वाडेच आहेत. धोकादायक घरांमध्ये वास्तव्य करीत असलेले बहुतांश कुटुंबे अनेक वर्षांपासून भाडोत्री म्हणूनच राहत आहेत. काही पगडी पद्धतीने, तर काही नाममात्र ५० ते ५०० रुपये मासिक भाडे देऊन अनेक वर्षांपासून राहात आहेत. अनेक घरांचे मालक हयात नाहीत. त्यामुळे तर मालकांच्या पश्चात असलेल्या घरमालकांच्या वारसांना भाड्यांनी दिलेल्या घरांची दुरुस्ती करण्यात स्वारस्य नाही. घरे, इमारतींच्या दुरुस्तीची भाडोत्र्यांची इच्छा असली तरी त्यासाठी घरमालक परवानगी देण्यास तयार नाहीत. तर केवळ मालमत्तेच्या हव्यासापोटी आर्थिक सुबत्ता असतानाही अनेक भाडोत्री कुटुंबे जीव मुठीत घेऊन धोकादायक घरांमध्ये वास्तव्य करून आहेत. तर खरोखरच भाड्याने घर घेण्याची अथवा नवीन घर घेण्याची ऐपत नसल्यानेच काही गरीब गरजू कुटुंबे नाइलाजास्तव धोकादायक घरात जीव मुठीत घेऊन राहात आहेत. घरमालक आणि भाडोत्री यांच्यातील मालकी हक्काबाबत एकमत होत नसल्याने वादाचे प्रकार घडू लागले आहेत. त्यामुळे घरांच्या जागा जमिनीबाबत एकमत होत नसल्याने वादाचे प्रकार घडू लागले आहेत. यामुळे घरांच्या जागा जमिनीबाबत घरमालक आणि भाडोत्री यांच्यातील वादाचे अनेक खटले निवाड्यासाठी न्यायालयात दाखल झालेले आहेत.वादात अडकलेली अशी अनेक घरे, चाळी, इमारतींचा वापर बंद करून मालकांनी त्यांना टाळे ठोकणेच पसंत केले असल्याचीही अनेक उदाहरणे असल्याची माहितीही उनपचे नगर अभियंता अनुपकुमार कांबळे यांनी दिली. मात्र, दुर्दैवाने एखादी अप्रिय घटना घडल्यास नोटिसा बजावूनही धोकादायक घरांमध्ये राहणाºया ४३ कुटुंबीयांबाबत उनप नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.