शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
2
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
3
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
4
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
5
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
6
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
7
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
8
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
9
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
12
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
13
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
14
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
15
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
16
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
17
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
18
४ बहि‍णींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा नवा कारनामा; मेहुण्याला संपवून घरामागे पुरलं, सहा महिन्यांनी...
19
Navratri 2025: नवरात्रीत का खेळला जातो भोंडला? हातगा प्रकार वेगळा असतो का? वाचा 
20
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!

उरणकरांना पावसाने झोडपले

By admin | Updated: June 29, 2017 02:59 IST

बुधवारी पहाटेपासूनच पडलेल्या मुसळधार पावसाने उरणकरांना चांगलेच झोडपून काढले आहे. तालुक्यातील पुनाडे, वशेणी, केळवणे, करंजा, केगाव,

लोकमत न्यूज नेटवर्कउरण : बुधवारी पहाटेपासूनच पडलेल्या मुसळधार पावसाने उरणकरांना चांगलेच झोडपून काढले आहे. तालुक्यातील पुनाडे, वशेणी, केळवणे, करंजा, केगाव, भेंडवळ आदी गावांतील अनेक रहिवाशांच्या घरात पावसाचे पाणी घुसल्याने त्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. तर चिरनेर गावातील नाले ओसंडून वाहू लागल्याने रस्तेही जलमय झालेत. यामुळे चिरनेर गावात पूर स्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी दमदार पावसामुळे आणि समुद्राच्या पाण्यामुळे खारबंदिस्ती फुटून सुमारे अडीच हजार एकर शेती क्षेत्रात समुद्राचे पाणी शिरून नापीक झाल्याच्या घटनाही निदर्शनास आल्या आहेत. पूरग्रस्त आणि नुकसानग्रस्तांची पाहणी महसूल विभागाकडून करण्यात येत असून, शासकीय यंत्रणा आर्थिक नुकसानीचे पंचनामे करण्यात गुंतली असल्याची माहिती उरण तहसीलदार कल्पना गोडे यांनी दिली.मंगळवारी मध्यरात्रीपासून उरण परिसरात मुसळधार पाऊस बरसण्यास सुरुवात झाली होती. मोठ्या प्रमाणात बरसणाऱ्या पावसाला समुद्राच्या भरतीची साथ मिळाली. यामुळे नदी, नाले, गटारे तुडुंब भरल्याने उरण परिसरात अनेक गावांत पावसाचे पाणी शिरले. तालुक्यातील पुनाडे, वशेणी, करंजा, केगाव, भेंडखळ आदी गावांतील अनेक रहिवाशांच्या घरात पावसाचे पाणी घुसले. घरात शिरलेल्या पावसाच्या पाण्यामुळे नागरिकांची चांगलीच त्रेधातिरपीट उडालीच. त्याशिवाय घरातील जीवनाश्यक आणि मौलिक सामान पावसाच्या पाण्याने भिजून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानही झाल्याच्या अनेक रहिवाशांच्या तक्रारी आहेत.तर केळवणे, पुनाडे आणि वशेणी गावांतील खारबंदिस्ती बंधारे फुटून समुद्राचे पाणी शेतीत घुसल्याची तक्रार आ. प्रशांत ठाकूर यांनी केली आहे. समुद्राचे पाणी शिरून सुमारे अडीच हजार एकर शेत जमिनीत समुद्राचे पाणी शिरले असून, जमीन नापीक झाली आहे. यामुळे शेकडो शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले असल्याची माहिती तहसील कार्यालयातून दिली.