शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

बेशिस्त चालकांचे परवाने निलंबित

By admin | Updated: July 5, 2016 02:51 IST

वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या चालकांविरोधात वाहतूक पोलीस व आरटीओतर्फे कारवाईचा फास आवळण्यात आला आहे. त्यांच्यातर्फे संयुक्तरीत्या करण्यात आलेल्या ६७७ कारवायांपैकी

- सूर्यकांत वाघमारे , नवी मुंबई वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या चालकांविरोधात वाहतूक पोलीस व आरटीओतर्फे कारवाईचा फास आवळण्यात आला आहे. त्यांच्यातर्फे संयुक्तरीत्या करण्यात आलेल्या ६७७ कारवायांपैकी ४१९ बेशिस्त चालकांचे वाहनचालक परवाने निलंबित करण्यात आले आहेत, तर २५८ प्रकरणांची अद्याप सुनावणी बाकी आहे.पावसाळ्यात होणारे अपघात टाळण्यासाठी शासन निर्देशानुसार बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न आरटीओ व वाहतूक पोलीस यांच्याकडून संयुक्तरीत्या होत आहे. त्याकरिता गेली तीन महिन्यांपासून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा धडाका सुरू आहे. सिग्नल तोडणे, सीट बेल्टचा वापर न करणे, हेल्मेट न वापरणे, मद्यपान करून वाहन चालवणे, वेगमर्यादा ओलांडणे, वाहन चालवताना फोनचा वापर करणे अशा अनेक शीर्षकाखाली या कारवाया होत आहेत. अनेकदा चालकाच्या बेशिस्तपणामुळे गंभीर अपघात घडत असतात. त्यामध्ये निष्पाप प्रवासी किंवा पादचाऱ्यांना प्राण गमवावे लागतात. यामुळे राज्यातले अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. त्याकरिता बेशिस्त चालकांविरोधात तीव्र कारवाई करून त्यांच्याकडून वाहतुकीच्या नियमांचे धडे गिरवून घेतले जात आहेत. वाहतूक पोलिसांतर्फे यापूर्वी देखील अनेकदा मोहीम राबवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांविरोधात कारवाया केलेल्या आहेत. सद्यस्थितीला तरुणांमध्ये दुचाकीवर धूम ठोकण्याचे प्रमाण अधिक असून अनेक अपघातांमध्ये अशा तरुणांचा बळी गेलेला आहे. यामुळे महाविद्यालयीन तरुणांना शिस्त लावण्याकरिता देखील वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम राबवली होती. यानंतरही शहरात वाहनचालकांचा बेशिस्तपणा दिसून येत आहे. अशांविरोधात पुन्हा एकदा कारवाईची मोहीम उभारून ठिकठिकाणी पथकांच्या माध्यमातून बेशिस्त चालकांचा शोध घेतला जात आहे. यानुसार मागील तीन महिन्यात ८७७ जणांविरोधात कारवाई करण्यात आलेली आहे. त्यापैकी ४१९ जणांचे वाहनचालक परवाने ९० दिवसांकरिता निलंबित केल्याचे आरटीओ अधिकारी संजय डोळे यांनी सांगितले. तर २५८ प्रकरणे प्रलंबित असल्याचेही त्यांनी सांगितले.अनेकदा अवैध प्रवासी वाहतूक केल्यामुळे किंवा मालवाहू वाहनातून क्षमतेपेक्षा जादा मालाची वाहतूक केल्यामुळे देखील अपघात होत असतात. अशांवर देखील आरटीओने कारवाईचा दणका लावला आहे. त्यानुसार अद्यापपर्यंत झालेल्या कारवायांमध्ये दंड स्वरूपात ३९ लाख ५२ हजार रुपये आरटीओकडे जमा झाले आहेत.