शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

हाहाकारानंतर पनवेलमध्ये परिस्थिती पूर्ववत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 02:15 IST

रविवारी पावसाचा जोर कमी : पुरामुळे गावांत साचला कचरा; आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती

वैभव गायकर

पनवेल : तीन दिवसांपासून पनवेल परिसरात पावसाने धुमाकूळ घातल्याने अनेक गावांत पूरस्थिती निर्माण झाली होती. रविवारी पावसाचा जोर कमी झाल्याने परिस्थिती पूर्वपदावर आली. पनवेल तालुक्यात गेल्या दोन दिवसांत ५१० मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद करण्यात आली. गाढी नदीचे पाणी परिसरात लोकवस्तीत शिरल्याने येथील रहिवाशांना पनवेलमधील जामा मशिदीत तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतर करण्यात आले होते.

पनवेल शहरात भारतनगर झोपडपट्टी, कोळीवाडा, कच्छी मोहल्ला, पटेल मोहल्ला, टपाल नाका, भुसार मोहल्ला, कुंभारवाडा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी शिरले होते. रविवारी सकाळी पावसाने उसंत घेतल्याने पाण्याचा निचरा झाला. पूरस्थितीमुळे शहरात कोठेही जीवितहानी झाली नसली, तरी लोकांच्या घरात पाणी शिरल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले. शहरातील पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी आमदार बाळाराम पाटील व पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी पटेल मोहल्ल्यामधील रहिवाशांची भेट घेतली. २६ जुलै, २००५ नंतर तब्बल १४ वर्षांनंतर शहरात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती.नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळासाठी मोठ्या प्रमाणात भराव करण्यात आले आहे. भरावामुळे पाण्याचा निचरा होण्यास वेळ लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अतिवृष्टीमुळे पाण्याचा निचरा होण्यास विलंब लागल्याने, किनारी भागातील रहिवाशांना शहरात आश्रय घ्यावा लागला. पुराचे पाणी ओसरल्यानंतर मात्र नदीपात्रातून आलेला कचऱ्याचा खच नदीकाठच्या परिसरात पाहावयास मिळाला. पनवेल शहरालगतच्या आदिवासी वाडीतही मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी शिरल्याने,े येथील अंकुश लक्ष्मण नाईक या ग्रामस्थाचे घर कोसळले, तर अनेकांच्या घरात पाणी गेल्याने मोठे नुकसान झाले.पनवेल महापालिकेच्या माध्यमातून आदिवासी वाडीतील रहिवाशांचे तालुका क्रीडा संकुलात स्थलांतर करण्यात आले. या ठिकाणी रहिवाशांच्या जेवणाची व्यवस्थादेखील करण्यात आली.शहरातील सर्व तलाव भरले आहेत. मात्र, पावसाचा जोर वाढल्यास पाणी लोकवस्तीत घुसण्याची शक्यता असल्याने महापालिकेने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी, सर्व विभागांतील अधिकाऱ्यांना आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. पूरस्थितीमुळे ज्या ठिकाणी आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, त्या ठिकाणी विशेष स्वच्छता मोहीम राबवून धुरीकरण व औषध फवारणी करण्याचे आदेश स्वच्छता निरीक्षकांना देण्यात आले आहेत.विमानतळ गाभा क्षेत्राबाहेर पूरसदृश्य स्थितीनवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ गाभा क्षेत्राबाहेरदेखील मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला. पारगाव, ओवळे, भंगारापाडा, दापोली आदी गावांत पाणी शिरले. पारगाव-रुद्रनगरमधील २५ ते ३० घरे पाण्याखाली गेली. सिडको, तसेच महसूल प्रशासनाचे या ठिकाणी पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचा आरोप माजी सरपंच महेंद्र पाटील यांनी केला आहे. या ठिकाणच्या रहिवाशांना शासनाने नुकसान भरपाई देण्याची मागणी पाटील यांनी केली. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईpanvel-acपनवेलRainपाऊस