शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

हाहाकारानंतर पनवेलमध्ये परिस्थिती पूर्ववत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 02:15 IST

रविवारी पावसाचा जोर कमी : पुरामुळे गावांत साचला कचरा; आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती

वैभव गायकर

पनवेल : तीन दिवसांपासून पनवेल परिसरात पावसाने धुमाकूळ घातल्याने अनेक गावांत पूरस्थिती निर्माण झाली होती. रविवारी पावसाचा जोर कमी झाल्याने परिस्थिती पूर्वपदावर आली. पनवेल तालुक्यात गेल्या दोन दिवसांत ५१० मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद करण्यात आली. गाढी नदीचे पाणी परिसरात लोकवस्तीत शिरल्याने येथील रहिवाशांना पनवेलमधील जामा मशिदीत तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतर करण्यात आले होते.

पनवेल शहरात भारतनगर झोपडपट्टी, कोळीवाडा, कच्छी मोहल्ला, पटेल मोहल्ला, टपाल नाका, भुसार मोहल्ला, कुंभारवाडा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी शिरले होते. रविवारी सकाळी पावसाने उसंत घेतल्याने पाण्याचा निचरा झाला. पूरस्थितीमुळे शहरात कोठेही जीवितहानी झाली नसली, तरी लोकांच्या घरात पाणी शिरल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले. शहरातील पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी आमदार बाळाराम पाटील व पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी पटेल मोहल्ल्यामधील रहिवाशांची भेट घेतली. २६ जुलै, २००५ नंतर तब्बल १४ वर्षांनंतर शहरात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती.नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळासाठी मोठ्या प्रमाणात भराव करण्यात आले आहे. भरावामुळे पाण्याचा निचरा होण्यास वेळ लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अतिवृष्टीमुळे पाण्याचा निचरा होण्यास विलंब लागल्याने, किनारी भागातील रहिवाशांना शहरात आश्रय घ्यावा लागला. पुराचे पाणी ओसरल्यानंतर मात्र नदीपात्रातून आलेला कचऱ्याचा खच नदीकाठच्या परिसरात पाहावयास मिळाला. पनवेल शहरालगतच्या आदिवासी वाडीतही मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी शिरल्याने,े येथील अंकुश लक्ष्मण नाईक या ग्रामस्थाचे घर कोसळले, तर अनेकांच्या घरात पाणी गेल्याने मोठे नुकसान झाले.पनवेल महापालिकेच्या माध्यमातून आदिवासी वाडीतील रहिवाशांचे तालुका क्रीडा संकुलात स्थलांतर करण्यात आले. या ठिकाणी रहिवाशांच्या जेवणाची व्यवस्थादेखील करण्यात आली.शहरातील सर्व तलाव भरले आहेत. मात्र, पावसाचा जोर वाढल्यास पाणी लोकवस्तीत घुसण्याची शक्यता असल्याने महापालिकेने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी, सर्व विभागांतील अधिकाऱ्यांना आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. पूरस्थितीमुळे ज्या ठिकाणी आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, त्या ठिकाणी विशेष स्वच्छता मोहीम राबवून धुरीकरण व औषध फवारणी करण्याचे आदेश स्वच्छता निरीक्षकांना देण्यात आले आहेत.विमानतळ गाभा क्षेत्राबाहेर पूरसदृश्य स्थितीनवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ गाभा क्षेत्राबाहेरदेखील मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला. पारगाव, ओवळे, भंगारापाडा, दापोली आदी गावांत पाणी शिरले. पारगाव-रुद्रनगरमधील २५ ते ३० घरे पाण्याखाली गेली. सिडको, तसेच महसूल प्रशासनाचे या ठिकाणी पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचा आरोप माजी सरपंच महेंद्र पाटील यांनी केला आहे. या ठिकाणच्या रहिवाशांना शासनाने नुकसान भरपाई देण्याची मागणी पाटील यांनी केली. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईpanvel-acपनवेलRainपाऊस