शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

आमदार गणेश नाईकांच्या नेतृत्वात ऐरोली क्षेत्रात निघाली 'तिरंगा बाईक रॅली'

By कमलाकर कांबळे | Updated: August 13, 2023 16:06 IST

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी दिनानिमित्त भाजपाचे आयोजन

नवी मुंबई: भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी दिनानिमित्त हर घर तिरंगा अभियानांतर्गत ऐरोली विधानसभा क्षेत्रात नवी मुंबई भाजपच्या वतीने तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली. ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली आणि भाजपाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या या रॅलीत युवक- युवतींचा सहभाग लक्षणीय होता. दिघा येथून निघालेल्या या रॅलीचा वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात समारोप करण्यात आला.

दिघा येथील तलावाजवळून आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते सकाळी या तिरंगा बाईक रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. तत्पूर्वी दिघा  चौकातील छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिल्पांना आमदार नाईक यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

हजारो नागरिक या बाईक रॅलीमध्ये  सहभागी झाले होते. खास करून युवकांचा उत्साह पाहण्यासारखा होता. महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी सर्वच घटक भारत माता की जय अशा  घोषणा देत होते. देशभक्तीपर गीतांनी माहोल भारलेला होता. सर्वांच्या हातात, बाईकवर, वाहनांवर तिरंगा ध्वज डौलाने फडकत होता.  दिघा येथून सुरू झालेली ही बाईक रॅली ऐरोली विधानसभा क्षेत्रातील विविध भागातून मार्गस्थ होताना ठीक ठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले.  वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये तिरंगा बाईक रॅलीची सांगता झाली.

आमदार गणेश नाईक,  माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावर पुष्पवृष्टी केली.  दरम्यान, गेल्या वर्षी देशाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला. यावर्षी या महोत्सवाचा सांगता समारंभ सर्वत्र साजरा केला जात आहे.  प्रत्येकाच्या मनात देशाबद्दल अभिमान आहेच. हा अभिमान वृद्धिंगत होऊन  कष्टाने मिळवलेले स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याची जाणीव प्रत्येकाच्या मनात असायला हवी, असे आवाहन आमदार नाईक यांनी यावेळी केले.