शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
3
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
6
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
7
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
8
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
9
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
10
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
11
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
12
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
13
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
14
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
15
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
16
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
17
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
19
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
20
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!

अघोषित पाणीकपात

By admin | Updated: December 8, 2015 01:01 IST

मोरबे धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने नवी मुंबईकरांवर अघोषित पाणीकपात करण्याची पाळी प्रशासनावर आली आहे. याचा परिणाम म्हणून शहरवासीयांची एकच तारांबळ उडत आहे

नवी मुंबई : मोरबे धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने नवी मुंबईकरांवर अघोषित पाणीकपात करण्याची पाळी प्रशासनावर आली आहे. याचा परिणाम म्हणून शहरवासीयांची एकच तारांबळ उडत आहे. अनेक ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. कोपरखैरणे विभागात तर पाण्याच्या टँकरलाही वेटिंग असल्याचे दिसून आले आहे. यावर्षी पाऊस कमी पडल्याने राज्यात भीषण दुष्काळ पसरला आहे. बड्या शहरांसमोर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांची पातळी खालावल्याने मुंबईसह राज्यातील बहुतांशी शहरांत पाणीकपात लागू करण्यात आली आहे. नवी मुंबईत मात्र आतापर्यंत कोणत्याही प्रकारची पाणीकपात करण्यात आलेली नाही. मोरबे धरणात सध्या अत्यंत कमी पाणीसाठा आहे. धरणात साधारण पुढील तीन ते चार महिने पुरेल इतकेच पाणी शिल्लक आहे. असे असतानाही पाण्याची उधळपट्टी सुरूच आहे. परंतु पुढील पावसाळ्यापर्यंतचे नियोजन म्हणून पाणीकपात करणे अपरिहार्य झाले आहे. त्याचाच एक भाग म्हणून गेल्या काही दिवसांपासून छुप्या पद्धतीने पाणीकपात करण्यात आली आहे. याचा परिणाम म्हणून अनेक भागात कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात आहे. तर काही विभागात पाणीपुरवठ्याचे तास कमी करण्यात आले आहे.विशेष म्हणजे यासंदर्भात कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न दिल्याने या अघोषित पाणीकपातीमुळे रहिवाशांची तारांबळ उडत आहे.कोपरखैरणे विभागात शुक्रवारपासून अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे, तर काही सेक्टर्समध्ये दोन दिवसांपासून पाणीच आलेले नाही. त्यामुळे रहिवाशांना टँकरद्वारे पाणी घ्यावे लागत आहे. सोमवारी पाण्याच्या टँकरसाठीही रहिवाशांना ताटकळत बसावे लागले. दरम्यान, विभागस्तरावर पाणीवाटपाचे नियोजन करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. पुढील दोन-तीन दिवसांत पाणीकपातीचे धोरण निश्चित केले जाईल, अशी माहिती महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अरविंद शिंदे यांनी दिली. (प्रतिनिधी)