शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
4
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
5
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
6
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
7
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
8
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
9
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
10
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
11
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
12
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
13
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
14
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
15
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
16
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
17
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
18
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
19
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
20
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?

अघोषित पाणीकपात

By admin | Updated: December 8, 2015 01:01 IST

मोरबे धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने नवी मुंबईकरांवर अघोषित पाणीकपात करण्याची पाळी प्रशासनावर आली आहे. याचा परिणाम म्हणून शहरवासीयांची एकच तारांबळ उडत आहे

नवी मुंबई : मोरबे धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने नवी मुंबईकरांवर अघोषित पाणीकपात करण्याची पाळी प्रशासनावर आली आहे. याचा परिणाम म्हणून शहरवासीयांची एकच तारांबळ उडत आहे. अनेक ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. कोपरखैरणे विभागात तर पाण्याच्या टँकरलाही वेटिंग असल्याचे दिसून आले आहे. यावर्षी पाऊस कमी पडल्याने राज्यात भीषण दुष्काळ पसरला आहे. बड्या शहरांसमोर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांची पातळी खालावल्याने मुंबईसह राज्यातील बहुतांशी शहरांत पाणीकपात लागू करण्यात आली आहे. नवी मुंबईत मात्र आतापर्यंत कोणत्याही प्रकारची पाणीकपात करण्यात आलेली नाही. मोरबे धरणात सध्या अत्यंत कमी पाणीसाठा आहे. धरणात साधारण पुढील तीन ते चार महिने पुरेल इतकेच पाणी शिल्लक आहे. असे असतानाही पाण्याची उधळपट्टी सुरूच आहे. परंतु पुढील पावसाळ्यापर्यंतचे नियोजन म्हणून पाणीकपात करणे अपरिहार्य झाले आहे. त्याचाच एक भाग म्हणून गेल्या काही दिवसांपासून छुप्या पद्धतीने पाणीकपात करण्यात आली आहे. याचा परिणाम म्हणून अनेक भागात कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात आहे. तर काही विभागात पाणीपुरवठ्याचे तास कमी करण्यात आले आहे.विशेष म्हणजे यासंदर्भात कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न दिल्याने या अघोषित पाणीकपातीमुळे रहिवाशांची तारांबळ उडत आहे.कोपरखैरणे विभागात शुक्रवारपासून अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे, तर काही सेक्टर्समध्ये दोन दिवसांपासून पाणीच आलेले नाही. त्यामुळे रहिवाशांना टँकरद्वारे पाणी घ्यावे लागत आहे. सोमवारी पाण्याच्या टँकरसाठीही रहिवाशांना ताटकळत बसावे लागले. दरम्यान, विभागस्तरावर पाणीवाटपाचे नियोजन करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. पुढील दोन-तीन दिवसांत पाणीकपातीचे धोरण निश्चित केले जाईल, अशी माहिती महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अरविंद शिंदे यांनी दिली. (प्रतिनिधी)