शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

कोपरखैरणे खाडी परिसरात अनधिकृत झोपड्यांचे पेव; महापालिकेसह वनविभागाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 23:49 IST

कारवाईनंतरही परिस्थिती जैसे थे

नवी मुंबई : कोपरखैरणे गावालगतच्या खाडीकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात नागरी वसाहत निर्माण झाली आहे. या ठिकाणी बेकायदा झोपड्यांचे पेव फुटले आहे, त्यामुळे खाडीलगतच्या रस्त्यावरही मोठ्याप्रमाणात अतिक्रमण झाले आहे. परिणामी, येथून मार्गक्रमण करताना वाहनधारक विशेषत: स्कूल बस आणि रुग्णवाहिकेला अडथळ्याची शर्यत पार करावी लागत आहे.

नवी मुंबईत बेकायदा बांधकामांचा प्रश्न कळीचा मुद्दा बनला आहे. विविध राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांनी केवळ व्होट बँक म्हणून बेकायदा झोपड्या आणि बांधकामांना अप्रत्यक्षरीत्या पाठबळ दिल्याचे वारंवार स्पष्ट झाले आहे. याचा परिणाम म्हणून शहरातील प्रत्येक गावालगतच्या खाडीकिनाºयावर भराव टाकून नागरी वसाहती उभारण्यात आल्याचे चित्र पाहावयास मिळते. गोठीवली, घणसोलीसह कोपरखैरणे, वाशीगाव या गावांच्या खाडीकिनाºयांवर मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे उभारली गेली आहेत. विशेष म्हणजे, या बांधकामांना महापालिकेकडून रीतसर नळजोडण्या आणि महावितरणकडून विद्युतपुरवठाहीदेण्यात आला आहे. कोपरखैरणे गावाच्या खाडीकिनाºयावर सध्या बेकायदा झोपड्यांचे पेव फुटले आहे, तसेच अनेक ठिकाणी चाळी उभारल्या आहेत. ही बेकायदा घरे कष्टकरी तसेच मजुरांच्या कुटुंबांना भाडेतत्त्वावर देण्यात आली आहेत. यात परप्रांतीय नागरिकांचा सहभाग मोठा असल्याचे दिसून आले आहे. रिक्षाचालक, पानाचे ठेले चालविणारे फेरीवाले आदीचीही येथे मोठी वसाहत आहे. मागील काही महिन्यांत ही बेकायदा वसाहत खाडीत विस्तारीत होताना दिसत आहे. त्यामुळे शेजारच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रहदारी वाढली आहे. या झोपड्यातील लहान लहान मुले चक्क रस्त्यावर खेळत असल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. रस्त्याच्या एका बाजूला रिक्षा, छोटे टेम्पो आणि हातगाड्यांच्या रांगा लागल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे.

खाडीकिनारी क्षेत्र वनविभागाच्या अखात्यारित येते. त्यामुळे वनविभागाच्या माध्यमातून या भागात ठिकठिकाणी फलकही लावण्यात आले आहेत. त्यानंतरही बिनदिक्कतपणे येथे अतिक्रमणे उभी राहिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मध्यंतरीच्या काळात येथील बेकायदा झोपड्यावर महापालिका आणि वनविभागाने अनेकदा कारवाई केली. मात्र, त्यानंतर काही दिवसांतच या वसाहती पुन्हा उभ्या ठाकल्या. पुढील काही महिन्यांत नवी मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका आहेत. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी उभारलेल्या बेकायदा झोपड्यांना संरक्षण देण्याची भूमिका त्या त्या विभागातील स्थानिक पुढाºयांची असल्याचे दिसून येते.मध्यंतरीच्या काळात कोपरखैरणे खाडीतील झोपड्यांना भीषण आग लागली होती. रस्त्यांवरील वाहनांचे अतिक्रमण दाटीवाटीने अगदी खाडीच्या आतील भागात उभ्या रहिलेल्या झोपड्या यामुळे अग्निशमन पथकाला आग विझविताना कसरत करावी लागली होती. या पार्श्वभूमीवर संभाव्य दुर्घटना टाळण्याच्या दृष्टीने महापालिका आणि वनविभागाने आतापासूनच कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका