शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

नेरळमध्ये अनधिकृत बांधकाम

By admin | Updated: October 28, 2015 23:25 IST

नेरळ ग्रामपंचायत हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. त्यात मोठ्या प्रमाणात अतिक्र मण करून बांधकामे होत असतात

कर्जत : नेरळ ग्रामपंचायत हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. त्यात मोठ्या प्रमाणात अतिक्र मण करून बांधकामे होत असतात. असेच एक बांधकाम नेरळ ग्रामपंचायतीच्या एका निवृत्त कर्मचाऱ्याच्या जागेवर झाले आहे. या जागेवर मोठी इमारत उभी राहिली असून हे अनधिकृत बांधकाम ग्रामपंचायतीने सहा महिन्यांपूर्वी थांबविले होते. मात्र सुटी बघून या जागेवर बांधकामे सुरूच असल्याने अखेर नेरळ ग्रामपंचायतीने सर्व इमारत तोडण्याची नोटीस बजावली आहे.ग्रामपंचायतीचे निवृत्त सफाई कर्मचारी हरिश्चंद्र जाधव यांचे नेरळ सम्राटनगर भागात राहते घर होते. ते आपल्या बहिणीकडे रहायला गेल्यानंतर त्याचा गैरफायदा घेवून ही जमीन शेजारी असलेल्या व्यक्तीने एका बिल्डरला विकसित करण्यासाठी दिली. नेरळ ग्रामपंचायतीच्या दफ्तरी आजही त्यातील २०० चौरस फूट जमीन हरिश्चंद्र जाधव यांचे नावे आहे. मात्र जमिनीची विक्र ी होऊन तेथे इमारत बांधण्याचे काम सुरु होताच हरिश्चंद्र जाधव यांनी नेरळ ग्रामपंचायत गाठून आपल्या जमिनीची कागदपत्रे सादर करीत अतिक्र मण झाले असल्याची तक्रार केली. त्यानंतर विद्यमान सरपंच राजश्री कोकाटे यांनी आपल्या निवृत्त ग्रामपंचायत कर्मचारी असलेल्या हरिश्चंद्र जाधव यांच्या पडीक घराचा विषय मासिक सभेत उपस्थित केला. त्यावेळी सर्व सदस्यांनी ग्रामपंचायतीच्या निवृत्त कर्मचारी असलेल्या जाधव यांना न्याय मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त केला. आता तर त्या जागेवर कार्यालय थाटले असून कोणतीही परवानगी न घेता तेथे वीज पुरवठा घेतला आहे. महावितरण कंपनीने कोणत्या आधारावर त्या अनधिकृत ठरविलेल्या बांधकामास वीज जोडणी दिली आहे, याची चौकशी नेरळ ग्रामपंचायतीने सुरु केली आहे. त्यामुळे नेरळ ग्रामपंचायतीने २३ आॅक्टोबरला संबंधित बिल्डरला नोटीस पाठवून ग्रामपंचायतीच्या ठरावाचा आणि अटी शर्थीचा भंग केल्याची नोटीस बजावली. मात्र बिल्डरने याकडे दुर्लक्ष केल्याने संतापलेल्या नेरळ ग्रामपंचायतीने हे अनधिकृत बांधकाम तोडून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सरपंच राजश्री राजेश कोकाटे आणि उपसरपंच केतन पोतदार यांनी हे अतिक्र मण पाहण्यासाठी त्या भागाला भेट दिली. त्यावेळी त्यांच्यासोबत नेरळ ग्रामपंचायतीचे अतिक्र मण विरोधी पथक होते. सरपंच कोकाटे यांनी अनधिकृत बांधकाम तोडण्याची कार्यवाही सुरु करण्याचे आदेश यावेळी दिले. (वार्ताहर)