शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
2
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
3
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
4
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
5
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
6
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
7
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
8
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
9
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
10
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
11
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
12
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
13
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
14
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
15
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
16
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य
17
"मोदीजी, ४० पैशावाल्यांना सांगा की असला चिल्लरपणा बंद करा"; शरद पवार गटाचे टीकास्त्र
18
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
19
ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
20
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण

दोन पोलीस स्टेशनमध्ये विभागला घणसोली नोड

By admin | Updated: July 16, 2016 02:10 IST

सतत घडणाऱ्या घरफोड्या, सोनसाखळी चोरी तसेच हाणामारीच्या घटनांमुळे घणसोलीकरांना सुरक्षेचा प्रश्न सतावत आहे, तर यापूर्वी घडलेल्या जबरी दरोड्याच्या घटनांमुळे

सूर्यकांत वाघमारे,  नवी मुंबईसतत घडणाऱ्या घरफोड्या, सोनसाखळी चोरी तसेच हाणामारीच्या घटनांमुळे घणसोलीकरांना सुरक्षेचा प्रश्न सतावत आहे, तर यापूर्वी घडलेल्या जबरी दरोड्याच्या घटनांमुळे अनेक सोसायट्यांमध्ये भीतीपोटी ठिकठिकाणी लोखंडी ग्रीलचे दरवाजे बसवण्यात आले आहेत. परंतु एकच विभाग दोन पोलीस ठाण्यात विभागला गेल्यामुळे उद्भवणारा हद्दीचा वाद टाळण्यासाठी स्वतंत्र पोलीस ठाण्याची मागणी रहिवाशांकडून होत आहे.सतत घडणाऱ्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे घणसोली कॉलनी परिसराला गालबोट लागत आहे. घरफोडी, सोनसाखळी चोरी, वाहनचोरी तसेच हाणामारीच्या घटनांमुळे रहिवाशांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. तर चौकीलगतच अनेक गुन्हे घडत असल्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. मोकळ्या भूखंडावर अनधिकृत झोपड्यांमध्ये गुन्हेगारांना आसरा मिळत आहे. तर विभागाचा विकास खुंटला आहे. एकच विभाग दोन पोलीस ठाण्याच्या हद्दीत विभागला गेल्यामुळेही रहिवाशांना अनेक समस्या भेडसावत आहेत. कॉलनीचा निम्मा भाग कोपरखैरणे पोलीस ठाण्याच्या हद्दीत तर निम्मा रबाळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे. त्याकरिता दोन्ही पोलीस ठाण्याअंतर्गत एक-एक पोलीस चौकी असली तरी, त्याठिकाणच्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कार्यपध्दतीवर रहिवाशांची नाराजी आहे. चौकीलगतच वाहनचोरी, कारटेप चोरी, सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्यास त्याची तक्रार घेण्याचे पोलीस टाळत असल्याचाही रहिवाशांचा आरोप आहे.यापूर्वी सिम्प्लेक्समधील सोसायटीत एका टोळीने सशस्त्र जबरी दरोडा टाकला होता. अशा घटनांमुळे परिसरातील रहिवाशांमध्ये गुन्हेगारांची दहशत निर्माण झालेली आहे. पर्यायी अनेक सोसायट्यांमध्ये जागोजागी लोखंडी ग्रीलचे दरवाजे बसवण्यात आले आहेत. विभागात सुरु असलेली बांधकामे देखील गुन्हेगारी घटनांना कारणीभूत ठरत आहेत. काही वर्षांपूर्वी तत्कालीन नगरसेवक संजय पाटील यांच्यावर देखील प्राणघातक हल्ला झालेला आहे. लोकवस्तीपासून लांब असलेल्या या मार्गावर सुविधांचा अभाव असल्यामुळे अंधारात दुचाकीस्वारांना अडवून लुटणे, फेरफटका मारण्यासाठी आलेल्या महिलांचे मंगळसूत्र चोरणे असे गुन्हे त्याठिकाणी घडत आहेत.घणसोली कॉलनीकरिता स्वतंत्र पोलीस ठाण्याची आवश्यकता आहे. सध्या घणसोली कॉलनीचा विभाग दोन पोलीस ठाण्यात विभागला गेला आहे. त्यामुळे एखाद्या कार्यक्रमाच्या परवानगीसाठी अथवा घडलेल्या गुन्ह्याची तक्रार करायची असल्यास नागरिकांची गैरसोय होत आहे. यावरून नागरिक व पोलीस यांच्यात वादाचे प्रकारही घडत आहेत. शिवाय अनेकदा हद्दीचा वाद उद्भवल्यास रहिवाशांना इकडून तिकडे पळावे लागत आहे.- प्रशांत पाटीलनगरसेवक, प्रभाग ३२आरक्षित भूखंडाचा अद्याप विकास झालेला नसल्याने त्यावर अतिक्रमण झाल्याचे पहायला मिळत आहे. काही आडोशाची ठिकाणे गुन्हेगारांचे अड्डे बनले आहेत. त्याठिकाणी मद्यपान, नशा करुन आपसात हाणामारीचे प्रकार देखील घडत आहेत, तर याच गुन्हेगारांना अनधिकृत झोपड्यांमध्ये लपण्यासाठी जागा मिळत आहे. त्यामुळे सिडको प्रशासनाने मोकळ्या भूखंडावरील अतिक्रमणे हटवून जागेला कुंपण घालणे गरजेचे आहे.- श्याम सराफ, घरोंदाघरफोडी, सोनसाखळी चोरी अशा घटनांमुळे महिलांना घराबाहेर निघण्याची देखील भीती वाटत आहे. रेल्वेस्थानकासमोरील मोकळ्या जागेवर गुन्हेगारांनी कब्जा मिळवला आहे. रात्रीच्या वेळी त्याठिकाणी झाडीमध्ये गुन्हेगारांच्या पार्ट्या रंगत असून हे भयाण दृश्य लगतच्या इमारतीमधील घरांमधून पहायला मिळत आहे. हेच गर्दुल्ले परिसरात गुन्हे करत असल्याची शक्यता आहे. यामुळे रात्रीच्यावेळी महिलांना रस्त्याने पायी जाताना मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे.-निर्मला पांडे, सेक्टर ५सेक्टर ६ च्या परिसरात घडणाऱ्या चोरी, घरफोडीच्या घटनांमुळे रहिवाशांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे. परिसरातल्या मोकळ्या मैदानांसह रेल्वे पटरीलगत आडोशाच्या जागेत गुन्हेगारांचे अड्डे झालेले आहेत. काही महिन्यांपूर्वीच एका रिक्षाचालकाचा मृतदेह देखील त्या ठिकाणी आढळलेला आहे. रस्त्यावर पथदिवे नसल्यामुळे रात्रीच्या वेळी गैरसोय होत असून गुन्हेगारांची नजर चुकवत घरापर्यंत पोहचावे लागत आहे.- विकास शिरसाट, सेक्टर ६