शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

दोन मुख्य बोगस ठेकेदारांना अटक

By admin | Updated: November 17, 2016 05:07 IST

दाभाड ग्रामपंचायतमधील राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी ठाणे ग्रामीण आर्थिक गुन्हे शाखेने दोन मुख्य ठेकेदारांना ठाणे कोर्टातून अटक केली आहे.

भिवंडी : दाभाड ग्रामपंचायतमधील राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी ठाणे ग्रामीण आर्थिक गुन्हे शाखेने दोन मुख्य ठेकेदारांना ठाणे कोर्टातून अटक केली आहे. त्यामुळे तालुक्यातील पेयजल योजनेतील मोठा भ्रष्टाचार चव्हाट्यावर येण्याची चिन्हे आहेत. या कोट्यवधी रूपयांच्या योजनेकरीता ई-टेंडरव्दारे निविदा न मागविता जिल्हा परिषदेचे शाखा अभियंता, उप अभियंता व ठेकेदार यांनी संगनमताने वर्क आॅर्डरव्दारे ही योजना दाभाड ग्रामपंचायत राबविली. त्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिध्द झाले. तसेच माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीव्दारे ठेकेदाराचे प्रमाणपत्र बोगस असल्याचा आरोप लापखुर्दमधील समाजसेवक राजाराम पाटील यांनी केला आणि जिल्हा परिषदेकडे लेखी पत्राव्दारे फौजदारी कारवाईची मागणी केली. त्यानुसार जिल्हा परिषदेचे सहाय्यक अभियंता उत्तम आंधळे यांनी पडघा पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल केला. मात्र पडघा पोलीस ठाण्याच्या निष्क्रियतेमुळे हा तपास ग्रामीण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग झाला. तपासांती दाभाड ग्रामपंचायतीतील पाणी पुरवठा समितीचे अध्यक्ष किशोर विठ्ठल पाटील व सचीव मनीषा रमेश पाटील यांना पोलिसांनी अटक केली. मात्र तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरिक्षक घाग यांनी मुख्य ठेकेदारांना पकडण्यासाठी विशेष मेहनत घेतली नाही, असा आरोप तक्रारदार करीत होते. दरम्यानच्या चार महिन्यात आरोपींनी उच्च न्यायालयांत व सर्वोच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनसाठी अर्ज केला. मात्र त्या न्यायालयांनी तो फेटाळून लावत त्यांना स्थानिक न्यायालयासमोर हजर रहाण्यास सांगितले. अखेर गुन्ह्यातील आरोपी तथा बोगस ठेकेदार नीलेश दुंदाराम पाटील व राहुल रघुनाथ पाटील हे ठाण्याच्या मुख्य न्यायाधीशांसमोर हजर झाले. ठाणे न्यायालयाच्या प्रशासनाने पोलीसांना लेखी पत्राने कळविल्यानंतर ग्रामीण आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक महेश शेटे यांनी दोन्ही आरोपींचा ताबा घेतला. दोघांनाही भिवंडी न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. एकंदरीत गुन्ह्याचे स्वरूप पाहाता गुन्हेगारांची पोलीस कोठडी वाढवून मिळविण्यासाठी पोलीस प्रयत्न करणार असल्याचे शेटे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)