शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

नवी मुंबईतील दोघांची निवडणुकीत बाजी; मिरजसह जुन्नरमध्ये विजय, चौघांना अपयश

By नामदेव मोरे | Updated: December 2, 2024 06:38 IST

पराभव झालले शशिकांत  शिंदे २०२६ पर्यंत विधान परिषदेवर असल्यामुळे त्यांना अजून दोन वर्षे आमदार म्हणून काम करता येणार असून, विजयी झालेल्यांमध्ये सुरेश खाडे हे मंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये आहेत.

नामदेव मोरे

नवी मुंबई : कर्मभूमी नवी मुंबई असलेल्या सहा उमेदवारांनी राज्याच्या विविध भागांत विधानसभेची निवडणूक लढविली होती. यापैकी सुरेश खाडे आणि शरद सोनावणे या दोघांना यश आले असून, चारजणांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. पराभव झालले शशिकांत  शिंदे २०२६ पर्यंत विधान परिषदेवर असल्यामुळे त्यांना अजून दोन वर्षे आमदार म्हणून काम करता येणार असून, विजयी झालेल्यांमध्ये सुरेश खाडे हे मंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये आहेत.

राज्याच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यामधून अनेक नागरिक नोकरी व्यवसायासाठी नवी मुंबईमध्ये स्थायिक झाले आहेत. यापैकी अनेक जण येथील राजकीय व सामाजिक क्षेत्रामध्येही कार्यकरत असून, आपल्या जन्मभूमीमध्येही राजकीय क्षेत्रामध्ये काम करत आहेत. जन्मभूमीमधील ग्रामपंचायतींपासून ते लोकसभेपर्यंत विविध निवडणुकीमध्ये नवी मुंबईमधील चाकरमान्यांची भूमिका महत्त्वाची असते.

या वर्षीच्या निवडणुकीमध्ये येथील सहाजण राज्याच्या विविध भागांतून निवडणूक लढवत होते. यापैकी सांगली जिल्ह्यातील मिरजमधून सुरेश खाडे यांनी ४५ हजार १९५ मतांनी विजय मिळविला आहे. त्यांनी यापूर्वीच्या सरकारमध्ये मंत्री म्हणूनही काम पाहिले आहे. यावेळेस त्यांची मंत्रिपदावर वर्णी लागणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

चुरशीची लढत

जुन्नर मतदारसंघामध्ये अपक्ष निवडणूक लढविणारे शरद सोनावणे यांनीही विजय मिळविला आहे. अत्यंत चुरशीच्या लढतीमध्ये राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या उमेदवारांचा पराभव केला आहे. सोनावणे हे बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमधील व्यापारी आहेत. बाजार समितीमध्ये माथाडी कामगारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शशिकांत शिंदे यांना कोरेगाव मतदारसंघातून पराभवास सामोरे जावे लागले आहे. उदगीरमधून निवडणूक लढणारे सुधाकर भालेराव, राजापूरमधून अविनाश लाड, वाशीममधून संजू वाडे यांनाही अपयश आले आहे.

मंत्रिमंडळात स्थान मिळणार का?

ऐरोली मतदारसंघातील गणेश नाईक यांनी सहा वेळा निवडणूक जिंकली. तीन वेळेस मंत्रिपद मिळविले. मंदा म्हात्रे बेलापूरमधून सलग तीन वेळा जिंकल्या आहेत. तसेच नवी मुंबईतील दोन उमेदवार विजयी झाले. यात तीनजण भाजपचे असून, त्यांच्यापैकी मंत्रिपद कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.