शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

नवी मुंबईतील दोघांची निवडणुकीत बाजी; मिरजसह जुन्नरमध्ये विजय, चौघांना अपयश

By नामदेव मोरे | Updated: December 2, 2024 06:38 IST

पराभव झालले शशिकांत  शिंदे २०२६ पर्यंत विधान परिषदेवर असल्यामुळे त्यांना अजून दोन वर्षे आमदार म्हणून काम करता येणार असून, विजयी झालेल्यांमध्ये सुरेश खाडे हे मंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये आहेत.

नामदेव मोरे

नवी मुंबई : कर्मभूमी नवी मुंबई असलेल्या सहा उमेदवारांनी राज्याच्या विविध भागांत विधानसभेची निवडणूक लढविली होती. यापैकी सुरेश खाडे आणि शरद सोनावणे या दोघांना यश आले असून, चारजणांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. पराभव झालले शशिकांत  शिंदे २०२६ पर्यंत विधान परिषदेवर असल्यामुळे त्यांना अजून दोन वर्षे आमदार म्हणून काम करता येणार असून, विजयी झालेल्यांमध्ये सुरेश खाडे हे मंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये आहेत.

राज्याच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यामधून अनेक नागरिक नोकरी व्यवसायासाठी नवी मुंबईमध्ये स्थायिक झाले आहेत. यापैकी अनेक जण येथील राजकीय व सामाजिक क्षेत्रामध्येही कार्यकरत असून, आपल्या जन्मभूमीमध्येही राजकीय क्षेत्रामध्ये काम करत आहेत. जन्मभूमीमधील ग्रामपंचायतींपासून ते लोकसभेपर्यंत विविध निवडणुकीमध्ये नवी मुंबईमधील चाकरमान्यांची भूमिका महत्त्वाची असते.

या वर्षीच्या निवडणुकीमध्ये येथील सहाजण राज्याच्या विविध भागांतून निवडणूक लढवत होते. यापैकी सांगली जिल्ह्यातील मिरजमधून सुरेश खाडे यांनी ४५ हजार १९५ मतांनी विजय मिळविला आहे. त्यांनी यापूर्वीच्या सरकारमध्ये मंत्री म्हणूनही काम पाहिले आहे. यावेळेस त्यांची मंत्रिपदावर वर्णी लागणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

चुरशीची लढत

जुन्नर मतदारसंघामध्ये अपक्ष निवडणूक लढविणारे शरद सोनावणे यांनीही विजय मिळविला आहे. अत्यंत चुरशीच्या लढतीमध्ये राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या उमेदवारांचा पराभव केला आहे. सोनावणे हे बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमधील व्यापारी आहेत. बाजार समितीमध्ये माथाडी कामगारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शशिकांत शिंदे यांना कोरेगाव मतदारसंघातून पराभवास सामोरे जावे लागले आहे. उदगीरमधून निवडणूक लढणारे सुधाकर भालेराव, राजापूरमधून अविनाश लाड, वाशीममधून संजू वाडे यांनाही अपयश आले आहे.

मंत्रिमंडळात स्थान मिळणार का?

ऐरोली मतदारसंघातील गणेश नाईक यांनी सहा वेळा निवडणूक जिंकली. तीन वेळेस मंत्रिपद मिळविले. मंदा म्हात्रे बेलापूरमधून सलग तीन वेळा जिंकल्या आहेत. तसेच नवी मुंबईतील दोन उमेदवार विजयी झाले. यात तीनजण भाजपचे असून, त्यांच्यापैकी मंत्रिपद कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.