शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

तुर्भेच्या नवयुवक मंडळाला चपराक

By admin | Updated: September 15, 2015 23:32 IST

तुर्भेच्या नवयुवक गणेशोत्सव मंडळाला उच्च न्यायालयाने चांगलीच चपराक दिली आहे. परवानगीपूर्वीच रस्त्यावर मंडप उभारल्याने मंडळाविरोधात याचिका दाखल झाली होती.

नवी मुंबई : तुर्भेच्या नवयुवक गणेशोत्सव मंडळाला उच्च न्यायालयाने चांगलीच चपराक दिली आहे. परवानगीपूर्वीच रस्त्यावर मंडप उभारल्याने मंडळाविरोधात याचिका दाखल झाली होती. त्यावर निर्णय देत न्यायालयाने मंडळाला एक लाख रुपयांचा दंड सुनावला असून तो मुख्यमंत्री निधीत जमा करण्याचे आदेश दिले आहेत.रस्त्यावर उभारल्या जाणाऱ्या मंडपांमुळे वाहतूक कोंडी होवून नागरिकांना त्रास होत असतो. यावर तोडगा काढण्यासाठी यंदा प्रथमच नवी मुंबई पोलीस व पालिकेने ठोस पाऊल उचलत रस्त्यावर दहीहंडी तसेच गणेशोत्सव साजरा न करण्याच्या सूचना मंडळांना केल्या आहेत. त्यानुसार ७२ गणेशोत्सव मंडळांनी रस्ते मोकळे सोडून मैदाने गाठली आहेत. तर ३८ मंडळांनी पूर्ण रस्ता न व्यापता अवघ्या २५ टक्के भागातच मंडप उभारणी केली आहे. या मंडळांना परवानगीची प्रक्रिया सोपी करण्याच्या उद्देशाने प्रशासनाने एक खिडकी संकल्पना देखील राबवली होती. त्यानंतरही तुर्भेच्या नवयुवक मंडळाने नियम धाब्यावर बसवत परवानगीपूर्वीच रस्त्यावर मंडप उभारला होता. ठाणे - बेलापूर या रहदारीच्या मुख्य मार्गावरच हा मंडप असल्याने त्याठिकाणी वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. पालिकेनेही पाहणीदरम्यान या मंडळाला परवानगीपूर्वी मंडप न उभारण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र पालिकेच्या अधिकाऱ्यांनाही त्यांनी दाद दिली नव्हती. अखेर सामाजिक कार्यकर्ते संजय कोळेकर यांनी मंडळाविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायाधीश अभय ओक व न्यायाधीश विजय अचलीया यांच्या खंडपीठाने आज निकाल दिला. परवानगीपूर्वीच रस्त्यावर मंडप उभारल्याप्रकरणी त्यांनी मंडळाला १ लाख रुपयांचा दंड सुनावला असून तो मुख्यमंत्री निधीत जमा करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच गणेशोत्सवादरम्यान ध्वनिप्रदूषणासह इतर कोणत्याही नियमांचे उल्लंघन होणार नाही असे प्रतिज्ञापत्रही मंडळाकडून बुधवारी लिहून घेतले जाणार आहे. न्यायालयाच्या या निर्णयाने प्रशासन आपल्याच खिशात असल्याचा आव आणत नियम धाब्यावर बसवणाऱ्या मंडळांना चपराक बसली आहे. याबाबत नवयुवक मंडळाचे अध्यक्ष अशोक जोगदंड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. (प्रतिनिधी)मंडळाचे प्रतिनिधी तोंडघशी-गणेशोत्सवात होणाऱ्या खर्चाची चौकशी न्यायाधीशांनी मंडळाच्या प्रतिनिधीकडे केली होती. यावेळी श्रीमंतीचा आव आणत मंडळाच्या प्रतिनिधीने ८ ते ९ लाख रुपये खर्च होत असून दररोज ४०० ते ५०० भाविक भेट देत असल्याचेही सांगितले. -मात्र दंड स्वरूपात मुख्यमंत्री निधीसाठी किती रक्कम देणार याची विचारणा होताच मंडळाने हात आखडता घेत अवघ्या २५ हजार रुपयांची तयारी दाखवली. -यावेळी नियमांची पायमल्ली करणाऱ्या या मंडळावर ताशेरे ओढत खंडपीठाने त्यांना १ लाख रुपयांचा दंड सुनावला. तसेच गणेशोत्सव काळात कोणत्याही नियमांचे उल्लंघन झाल्यास वेगळा दंड आकारला जाईल असाही इशारा दिला आहे.