शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

टीटीसी क्षेत्रातील उद्योगांना घरघर

By admin | Updated: October 23, 2016 03:31 IST

आशिया खंडातील सर्वात मोठा औद्योगीक पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईतील टीटीसी क्षेत्रातील उद्योगांना घरघर लागली आहे. मागील बारा वर्षात या क्षेत्रातील

- कमलाकर कांबळे,  नवी मुंबई आशिया खंडातील सर्वात मोठा औद्योगीक पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईतील टीटीसी क्षेत्रातील उद्योगांना घरघर लागली आहे. मागील बारा वर्षात या क्षेत्रातील कंपन्यांनी मोठ्याप्रमाणात स्थलांतर केले आहे. यात टाळेबंदी जाहिर करून आपला गाशा गुंडाळणाऱ्या उद्योजकांचे प्रमाणही लक्षणीय आहे. जाचक औद्योगीक धोरण, पायाभूत सुविधांचा अभाव आणि महापालिकेकडून कर वसुलीसाठी केली जाणारी सक्तीची कारवाई आदीचा फटका या क्षेत्रातील उद्योगांना बसल्याचा उद्योजकांचा आरोप आहे.पंचवीस किलोमीटरच्या क्षेत्रफळावर विस्तारलेल्या टीटीसी औद्योगीक क्षेत्रात सध्या लहान मोठो ३५00 हजार युनिटस कार्यरत आहेत. त्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सुमारे तीन लाख माणसे काम करीत आहेत. या क्षेत्रात एमआयडीसीने सुमारे पाच हजार व्यवसायिक युनिटसाठी जागा देण्याचे प्रस्तावित केले होते. त्यापैकी सुमारे चार हजार उद्योग प्रत्यक्ष कार्यान्वित झाले होते. असे असले तरी महाराष्ट्र शासनाचे जाचक औद्योगीक धोरण, प्राथमिक सुविधा पुरविण्याबाबत महापालिकेची उदासीनता आणि कुशल मनुष्यबळाचा अभाव यामुळे अनेक कंपन्या बंद पडल्या आहेत. तर काहींनी अन्य राज्यांत स्थलांतरीत केले आहे. विशेषत: मागील बारा वर्षात या प्रक्रियेने अधिक वेग घेतल्याचे दिसून आले आहे. दोन वर्षापूर्वीर् महापे औद्योगीक क्षेत्रातील तीस एकर जागेवर उभरलेल्या पाच बड्या कंपन्यांनी येथील आपले व्यवहार बंद करून गुजरातमध्ये स्थलांतरीत केले आहे. गुजरातचे औद्योगीक धोरण उद्योग वाढील पोषक ठरले आहे. येथील तयार इन्फ्रास्ट्रक्चर आणि कर आकारणीतील पारदर्शकता तरूण उद्योजकांना भूरळ घालीत आहे. त्यामुळे अनेक उद्योजक आपले येथील उद्योग बंद करून गुजरातची वाट धरताना दिसत आहेत. त्यामुळे इतर छोट्या उद्योजकांत व त्याअुषंगाने कामगार वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.पूर्वी या औद्योगिक वसाहतीला रस्ते, पाणी, वीज व इतर प्राथमिक सुविधा एमआयडीसीकडून पुरविल्या जात होत्या. परंतु २00५ पासून या सुविधा महापालिकेडे वर्ग करण्यात आल्या. तेव्हापासून आतापर्यंत विविध करापोटी महापालिकेने येथील उद्योजगांकडून कोट्यवधी रूपयांचा कर वसूल केला आहे. त्याबदल्यात देण्यात येणाऱ्या सुविधा नगण्य असल्याचा उद्योजकांचा आरोप आहे. येथील रस्ते, दिवाबत्ती, पाणी पुरवठा, सांडपाणी वाहून नेणारी गटारे आदींची दुरवस्था झाली आहे. यावर्षी तर या परिसरातील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. याचा फटका या क्षेत्रातील उद्योगांना बसला आहे. यातच महापालिकेने पुन्हा थकीत कर वसुलीसाठी कठोर पावले उचलली आहे. करवसुलीच्या अनेकांना सक्तीच्या नोटीसा बजावल्या आहेत. त्यामुळे उद्योजकांत महापालिकेविषयी नाराजीचे सूर आहेत. एकूणच सध्या निर्माण झालेली परिस्थिती येथील उद्योग वाढीला मारक ठरत असल्याने अनेकांनी स्थलांतराचा मार्ग पत्कारल्याचे बोलले जात आहे. याचा परिणाम म्हणून गेल्या सहा महिन्यात या क्षेत्रातील लहान मोठे जवळपास पंधरा उद्योग बंद करण्यात आले आहेत.सुविधा द्या, मगच करभरणाकर वसुलीसाठी महापालिकेने कठोर पावले उचलली आहेत. मागील काही वर्षात कराचा भरणा न करणाऱ्या उद्योजकांवर मोठ्याप्रमाणात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे उद्योजकांत असंतोष निर्माण झाला आहे. मुळात कर आकारण्याचा महापालिकेला कोणताही अधिकार नाही. असे असतानाही आम्ही कर भरायला तयार आहोत. त्याबदल्यात आम्हाला दर्जेदार पायाभूत सुविधा मिळायला हव्यात, अशी येथील उद्योजकांची मागणी आहे.