शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
3
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
4
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
5
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
6
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
7
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
8
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
9
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
10
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
11
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
12
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
13
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
14
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
15
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
16
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
17
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
18
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
19
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
20
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”

टीटीसी क्षेत्रातील उद्योगांना घरघर

By admin | Updated: October 23, 2016 03:31 IST

आशिया खंडातील सर्वात मोठा औद्योगीक पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईतील टीटीसी क्षेत्रातील उद्योगांना घरघर लागली आहे. मागील बारा वर्षात या क्षेत्रातील

- कमलाकर कांबळे,  नवी मुंबई आशिया खंडातील सर्वात मोठा औद्योगीक पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईतील टीटीसी क्षेत्रातील उद्योगांना घरघर लागली आहे. मागील बारा वर्षात या क्षेत्रातील कंपन्यांनी मोठ्याप्रमाणात स्थलांतर केले आहे. यात टाळेबंदी जाहिर करून आपला गाशा गुंडाळणाऱ्या उद्योजकांचे प्रमाणही लक्षणीय आहे. जाचक औद्योगीक धोरण, पायाभूत सुविधांचा अभाव आणि महापालिकेकडून कर वसुलीसाठी केली जाणारी सक्तीची कारवाई आदीचा फटका या क्षेत्रातील उद्योगांना बसल्याचा उद्योजकांचा आरोप आहे.पंचवीस किलोमीटरच्या क्षेत्रफळावर विस्तारलेल्या टीटीसी औद्योगीक क्षेत्रात सध्या लहान मोठो ३५00 हजार युनिटस कार्यरत आहेत. त्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सुमारे तीन लाख माणसे काम करीत आहेत. या क्षेत्रात एमआयडीसीने सुमारे पाच हजार व्यवसायिक युनिटसाठी जागा देण्याचे प्रस्तावित केले होते. त्यापैकी सुमारे चार हजार उद्योग प्रत्यक्ष कार्यान्वित झाले होते. असे असले तरी महाराष्ट्र शासनाचे जाचक औद्योगीक धोरण, प्राथमिक सुविधा पुरविण्याबाबत महापालिकेची उदासीनता आणि कुशल मनुष्यबळाचा अभाव यामुळे अनेक कंपन्या बंद पडल्या आहेत. तर काहींनी अन्य राज्यांत स्थलांतरीत केले आहे. विशेषत: मागील बारा वर्षात या प्रक्रियेने अधिक वेग घेतल्याचे दिसून आले आहे. दोन वर्षापूर्वीर् महापे औद्योगीक क्षेत्रातील तीस एकर जागेवर उभरलेल्या पाच बड्या कंपन्यांनी येथील आपले व्यवहार बंद करून गुजरातमध्ये स्थलांतरीत केले आहे. गुजरातचे औद्योगीक धोरण उद्योग वाढील पोषक ठरले आहे. येथील तयार इन्फ्रास्ट्रक्चर आणि कर आकारणीतील पारदर्शकता तरूण उद्योजकांना भूरळ घालीत आहे. त्यामुळे अनेक उद्योजक आपले येथील उद्योग बंद करून गुजरातची वाट धरताना दिसत आहेत. त्यामुळे इतर छोट्या उद्योजकांत व त्याअुषंगाने कामगार वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.पूर्वी या औद्योगिक वसाहतीला रस्ते, पाणी, वीज व इतर प्राथमिक सुविधा एमआयडीसीकडून पुरविल्या जात होत्या. परंतु २00५ पासून या सुविधा महापालिकेडे वर्ग करण्यात आल्या. तेव्हापासून आतापर्यंत विविध करापोटी महापालिकेने येथील उद्योजगांकडून कोट्यवधी रूपयांचा कर वसूल केला आहे. त्याबदल्यात देण्यात येणाऱ्या सुविधा नगण्य असल्याचा उद्योजकांचा आरोप आहे. येथील रस्ते, दिवाबत्ती, पाणी पुरवठा, सांडपाणी वाहून नेणारी गटारे आदींची दुरवस्था झाली आहे. यावर्षी तर या परिसरातील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. याचा फटका या क्षेत्रातील उद्योगांना बसला आहे. यातच महापालिकेने पुन्हा थकीत कर वसुलीसाठी कठोर पावले उचलली आहे. करवसुलीच्या अनेकांना सक्तीच्या नोटीसा बजावल्या आहेत. त्यामुळे उद्योजकांत महापालिकेविषयी नाराजीचे सूर आहेत. एकूणच सध्या निर्माण झालेली परिस्थिती येथील उद्योग वाढीला मारक ठरत असल्याने अनेकांनी स्थलांतराचा मार्ग पत्कारल्याचे बोलले जात आहे. याचा परिणाम म्हणून गेल्या सहा महिन्यात या क्षेत्रातील लहान मोठे जवळपास पंधरा उद्योग बंद करण्यात आले आहेत.सुविधा द्या, मगच करभरणाकर वसुलीसाठी महापालिकेने कठोर पावले उचलली आहेत. मागील काही वर्षात कराचा भरणा न करणाऱ्या उद्योजकांवर मोठ्याप्रमाणात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे उद्योजकांत असंतोष निर्माण झाला आहे. मुळात कर आकारण्याचा महापालिकेला कोणताही अधिकार नाही. असे असतानाही आम्ही कर भरायला तयार आहोत. त्याबदल्यात आम्हाला दर्जेदार पायाभूत सुविधा मिळायला हव्यात, अशी येथील उद्योजकांची मागणी आहे.