शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
3
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
4
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
5
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
6
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
7
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
8
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
9
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
10
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
11
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
12
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
13
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
14
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

आदिवासी विद्यार्थ्यांचा संताप

By admin | Updated: August 21, 2015 23:47 IST

एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या कार्यकक्षेतील आदिवासी वसतिगृहात राहणाऱ्या तब्बल २५० ते ३०० विद्यार्थ्यांनी योग्य सोयी-सुविधा

पेण : एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या कार्यकक्षेतील आदिवासी वसतिगृहात राहणाऱ्या तब्बल २५० ते ३०० विद्यार्थ्यांनी योग्य सोयी-सुविधा मिळत नसल्याने आक्रमक पवित्रा घेतला. सरकारच्या नियमांप्रमाणे सोयी-सुविधा मिळाव्यात यासाठी गेले वर्षभर आदिवासी मंत्री, आयुक्त, सहआयुक्त ते आदिवासी प्रकल्प अधिकारी यांच्याकडे सतत पाठपुरावा करुनदेखील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधांपासून सतत वंचित राहावे लागले आहे.चालू शैक्षणिक वर्षात वसतिगृहाच्या सोयी-सुविधा, प्रवेश प्रक्रिया, स्कॉलरशीप याबाबत प्रकल्प कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी वर्गाला वारंवार अर्ज विनवण्या करुनदेखील समस्या जैसे थे राहिल्याने संतप्त झालेल्या ३०० आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी शुक्रवारी सकाळी कार्यालयीन वेळेपासून पेणच्या आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे कामकाज बंद पाडले. इतकेच नव्हे तर स्वत:ला सर्व विद्यार्थ्यांनी प्रकल्प कार्यालयात कोंडून घेतले आहे. पोलीस डीवायएसपी दिलीप शंकरवार व पेणचे आमदार धैर्यशील पाटील यांनी समजूत घातल्यावरही बंदिस्त विद्यार्थ्यांनी कार्यालयाबाहेर पडण्यास नकार दर्शविला व मागण्या घेईपर्यंत आंदोलनाचा इशारा विद्यार्थी प्रतिनिधी विकास नाडेकर यांनी दिला आहे. महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास विभागांतर्गत मिळणाऱ्या शैक्षणिक सुविधा, आरोग्यसेवा, अन्न, पिण्याचे पाणी, मुलींची सुरक्षितता, शैक्षणिक साहित्य, शिष्यवृत्ती, राहण्यायोग्य इमारत, संगणक पुरवठा या शैक्षणिक सोयी-सुविधा व मूलभूत गरजा यांची तरतूद असतानाही सुविधा देण्यात अधिकारी चालढकल करीत असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.आदिवासी कल्याण योजनांच्या ठेकेदारांवर मेहरबान असणारे प्रकल्प अधिकारी मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे आम्ही शिकायचे की या समस्यांच्या पूर्ततेसाठी यांचे उंबरठे झिजवायचे, असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून विचारण्यात येत आहे. एवढे करूनही प्रकल्प अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने त्यांनी सांगितले. प्रकल्प अधिकारी रंजना दाभाडे यांनी हेतुपुरस्सर विद्यार्थ्यांना आमदारांच्या रायगड समितीची भेट घेऊ दिली नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. त्यामुळे १३ वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी प्रकल्प कार्यालयात येवून मागण्या मान्य होईपर्यंत कामकाज बंद पाडले. सरकारकडून शैक्षणिक सुविधा, आरोग्यसेवा, अन्न, पिण्याचे पाणी, मुलींची सुरक्षितता, शैक्षणिक साहित्य, शिष्यवृत्ती, राहण्यायोग्य इमारत, संगणक पुरवठा या शैक्षणिक सोयी-सुविधा व मूलभूत गरजा पुरवण्यात दिरंगाई होत असल्याचे विद्यार्थी सांगतात.