शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी पाड्यावर वीज पोहोचणार; महावितरणकडून काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 01:03 IST

देश स्वतंत्र होऊन सात दशकांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरही पनवेल परिसरातील आदिवासी पाड्यांमध्ये वीज पोहोचली नव्हती. महानगरपालिकेचा भाग असलेल्या वाघºयाची वाडी व सागाची वाडीमधील विजेच्या समस्येविषयी स्थानिक नगरसेवकांनी पालिका सभागृहात लक्ष वेधले.

- वैभव गायकरपनवेल : देश स्वतंत्र होऊन सात दशकांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरही पनवेल परिसरातील आदिवासी पाड्यांमध्ये वीज पोहोचली नव्हती. महानगरपालिकेचा भाग असलेल्या वाघºयाची वाडी व सागाची वाडीमधील विजेच्या समस्येविषयी स्थानिक नगरसेवकांनी पालिका सभागृहात लक्ष वेधले. यानंतर ‘लोकमत’ने या विषयावर आवाज उठविल्यानंतर या विषयाची राज्यभर चर्चा झाली होती. यानंतर पंडित दीनदयाळ ग्रामीण विद्युत योजनेअंतर्गत आदिवासी पाड्यापर्यंत वीज पोहोचविण्याचे काम सुरू झाले असून, लवकरच गावात वीजपुरवठा सुरू केला जाणार आहे.पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग-९ मध्ये वाघºयाची वाडी, सागाची वाडीचा समावेश आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व मेट्रो प्रकल्पांच्या जवळच्या डोंगरावर असलेल्या या पाड्यांपर्यंत वीज, रस्ते व प्राथमिक सुविधाही नाहीत. महानगरपालिकेमध्ये या पाड्यांचा समावेश झाल्यानंतर स्थानिक नगरसेवक महादेव मधे यांनी नोव्हेंबर २०१७ मध्ये महापालिका सभागृहात या विषयावर लक्ष वेधले. ‘आमच्या गावात वीज कधी पोहोचणार?’, असा प्रश्न उपस्थित केला होता. यानंतर ‘लोकमत’ने डोंगरावरील दोन्ही आदिवासी पाड्यांमध्ये जाऊन तेथील वास्तव स्थिती समोर आणली होती. खुद्द भाजपा नगरसेवकाच्या घरामध्येही अंधार असून, त्यांची आई अंधारात स्वयंपाक करत असल्याचे वास्तव बातमीच्या माध्यमातून मांडले होते. वाघºयाची वाडी हा भाग पनवेल तालुक्यातील टेंभोडे परिसरात आहे. या ठिकाणच्या मार्गापासून सुमारे दोन ते तीन किलोमीटरच्या उंचीवर डोंगरमाथ्यावर ही वाडी वसली आहे. सागाची वाडी व वाघºयाची वाडी, अशा अनुक्र मे या दोन वाड्या या डोंगरमाथ्यावर आहेत. पनवेलचा विकास झपाट्याने होत असताना या वाड्यावर मूलभूत समस्यांची वानवा आहे. दोन्ही वाड्यांत वीज, पाणी पोहोचलेले नाही. डोळ्यांदेखत परिसराचा झालेला कायापालट आणि एकीकडे प्राथमिक सुविधांचाही अभाव हा विरोधाभास पाहावयास मिळत होता.आदिवासी पाड्यावर वीज पोहोचविण्यासाठी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनीही शासनाकडे पाठपुरावा सुरू केला होता. जिल्हा नियोजन फंडाच्या निधी अभावामुळे या ठिकाणी वीज पोहोचण्यास उशीर झाला होता. त्यानंतर दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण विद्युत योजनेअंतर्गत निधी उपलब्ध झाल्यानंतर कामाला गती मिळाली. आदिवासी वाड्यांना सुमारे १०० केव्हीएचा वीजपुरवठा मिळणार आहे. या ठिकाणी वीज पोहोचविण्यासाठी महावितरणच्या माध्यमातून सुमारे ८५ ते १०० पोल उभारण्यात येत आहेत. डोंगररांगामुळे महावितरणला हे पोल उंचावर नेण्यास अडचणी निर्माण होत आहेत, याकरिता सुमारे ७५ लाखांच्या आसपास खर्च करण्यात येणार आहे.आदिवासींची दिवाळी प्रकाशमयपाड्यांवर वीज येणार असल्यामुळे नागरिकांमध्येही आनंदाचे वातावरण आहे. आतापर्यंतचे सर्व सण, दिवाळीही अंधारातच साजरी करावी लागत होती; परंतु या वर्षीच्या दिवाळीच्या अगोदरच गावात वीजपुरवठा करण्यासाठी खांब रोवण्याचे काम सुरू आहे. प्रशासनानेही युद्धपातळीवर काम सुरू केले असून, गावात वीज आली की ग्रामस्थांसाठी खºया अर्थाने दिवाळी असणार आहे.‘लोकमत’च्या पाठपुराव्याला यशवाघºयाची व सागाची वाडी या आदिवासी वस्तीमधील विजेच्या समस्येवर ‘लोकमत’ने गतवर्षी आवाज उठविला होता. डोंगरावरील पाड्यावर जाऊन तेथील वास्तव स्थिती समोर आणली होती. या वृत्ताची राज्यभर चर्चा झाली होती. यानंतर प्रशासनानेही वीजपुरवठा योजनेसाठी पाठपुरावा केला व प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली आहे.वाघºयाच्या वाडीवर वीजपुरवठा करण्याच्या कामाला सुरु वात केली आहे. उंचीवर, डोंगरावर पोल उभारण्यास अडचणी निर्माण होत आहेत, तरीदेखील १० ते १५ दिवसांत हे काम पूर्ण केले जाणार आहे.- माणिक राठोड, अधिकारी, महावितरण पनवेलएवढ्या वर्षांनंतर पाड्यात वीज येणार आहे, ही खूप आनंदाची गोष्ट आहे. यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनीदेखील वेळोवेळी पाठपुरावा केला असून, त्यांच्या पाठपुराव्यानंतर हे शक्य झाले आहे.- महादेव मधे, नगरसेवक, वाघºयाची वाडी

टॅग्स :panvelपनवेल