शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

आदिवासी पाड्यावर वीज पोहोचणार; महावितरणकडून काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 01:03 IST

देश स्वतंत्र होऊन सात दशकांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरही पनवेल परिसरातील आदिवासी पाड्यांमध्ये वीज पोहोचली नव्हती. महानगरपालिकेचा भाग असलेल्या वाघºयाची वाडी व सागाची वाडीमधील विजेच्या समस्येविषयी स्थानिक नगरसेवकांनी पालिका सभागृहात लक्ष वेधले.

- वैभव गायकरपनवेल : देश स्वतंत्र होऊन सात दशकांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरही पनवेल परिसरातील आदिवासी पाड्यांमध्ये वीज पोहोचली नव्हती. महानगरपालिकेचा भाग असलेल्या वाघºयाची वाडी व सागाची वाडीमधील विजेच्या समस्येविषयी स्थानिक नगरसेवकांनी पालिका सभागृहात लक्ष वेधले. यानंतर ‘लोकमत’ने या विषयावर आवाज उठविल्यानंतर या विषयाची राज्यभर चर्चा झाली होती. यानंतर पंडित दीनदयाळ ग्रामीण विद्युत योजनेअंतर्गत आदिवासी पाड्यापर्यंत वीज पोहोचविण्याचे काम सुरू झाले असून, लवकरच गावात वीजपुरवठा सुरू केला जाणार आहे.पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग-९ मध्ये वाघºयाची वाडी, सागाची वाडीचा समावेश आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व मेट्रो प्रकल्पांच्या जवळच्या डोंगरावर असलेल्या या पाड्यांपर्यंत वीज, रस्ते व प्राथमिक सुविधाही नाहीत. महानगरपालिकेमध्ये या पाड्यांचा समावेश झाल्यानंतर स्थानिक नगरसेवक महादेव मधे यांनी नोव्हेंबर २०१७ मध्ये महापालिका सभागृहात या विषयावर लक्ष वेधले. ‘आमच्या गावात वीज कधी पोहोचणार?’, असा प्रश्न उपस्थित केला होता. यानंतर ‘लोकमत’ने डोंगरावरील दोन्ही आदिवासी पाड्यांमध्ये जाऊन तेथील वास्तव स्थिती समोर आणली होती. खुद्द भाजपा नगरसेवकाच्या घरामध्येही अंधार असून, त्यांची आई अंधारात स्वयंपाक करत असल्याचे वास्तव बातमीच्या माध्यमातून मांडले होते. वाघºयाची वाडी हा भाग पनवेल तालुक्यातील टेंभोडे परिसरात आहे. या ठिकाणच्या मार्गापासून सुमारे दोन ते तीन किलोमीटरच्या उंचीवर डोंगरमाथ्यावर ही वाडी वसली आहे. सागाची वाडी व वाघºयाची वाडी, अशा अनुक्र मे या दोन वाड्या या डोंगरमाथ्यावर आहेत. पनवेलचा विकास झपाट्याने होत असताना या वाड्यावर मूलभूत समस्यांची वानवा आहे. दोन्ही वाड्यांत वीज, पाणी पोहोचलेले नाही. डोळ्यांदेखत परिसराचा झालेला कायापालट आणि एकीकडे प्राथमिक सुविधांचाही अभाव हा विरोधाभास पाहावयास मिळत होता.आदिवासी पाड्यावर वीज पोहोचविण्यासाठी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनीही शासनाकडे पाठपुरावा सुरू केला होता. जिल्हा नियोजन फंडाच्या निधी अभावामुळे या ठिकाणी वीज पोहोचण्यास उशीर झाला होता. त्यानंतर दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण विद्युत योजनेअंतर्गत निधी उपलब्ध झाल्यानंतर कामाला गती मिळाली. आदिवासी वाड्यांना सुमारे १०० केव्हीएचा वीजपुरवठा मिळणार आहे. या ठिकाणी वीज पोहोचविण्यासाठी महावितरणच्या माध्यमातून सुमारे ८५ ते १०० पोल उभारण्यात येत आहेत. डोंगररांगामुळे महावितरणला हे पोल उंचावर नेण्यास अडचणी निर्माण होत आहेत, याकरिता सुमारे ७५ लाखांच्या आसपास खर्च करण्यात येणार आहे.आदिवासींची दिवाळी प्रकाशमयपाड्यांवर वीज येणार असल्यामुळे नागरिकांमध्येही आनंदाचे वातावरण आहे. आतापर्यंतचे सर्व सण, दिवाळीही अंधारातच साजरी करावी लागत होती; परंतु या वर्षीच्या दिवाळीच्या अगोदरच गावात वीजपुरवठा करण्यासाठी खांब रोवण्याचे काम सुरू आहे. प्रशासनानेही युद्धपातळीवर काम सुरू केले असून, गावात वीज आली की ग्रामस्थांसाठी खºया अर्थाने दिवाळी असणार आहे.‘लोकमत’च्या पाठपुराव्याला यशवाघºयाची व सागाची वाडी या आदिवासी वस्तीमधील विजेच्या समस्येवर ‘लोकमत’ने गतवर्षी आवाज उठविला होता. डोंगरावरील पाड्यावर जाऊन तेथील वास्तव स्थिती समोर आणली होती. या वृत्ताची राज्यभर चर्चा झाली होती. यानंतर प्रशासनानेही वीजपुरवठा योजनेसाठी पाठपुरावा केला व प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली आहे.वाघºयाच्या वाडीवर वीजपुरवठा करण्याच्या कामाला सुरु वात केली आहे. उंचीवर, डोंगरावर पोल उभारण्यास अडचणी निर्माण होत आहेत, तरीदेखील १० ते १५ दिवसांत हे काम पूर्ण केले जाणार आहे.- माणिक राठोड, अधिकारी, महावितरण पनवेलएवढ्या वर्षांनंतर पाड्यात वीज येणार आहे, ही खूप आनंदाची गोष्ट आहे. यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनीदेखील वेळोवेळी पाठपुरावा केला असून, त्यांच्या पाठपुराव्यानंतर हे शक्य झाले आहे.- महादेव मधे, नगरसेवक, वाघºयाची वाडी

टॅग्स :panvelपनवेल