शहरं
Join us  
Trending Stories
1
संरक्षण करारानंतर सौदी अरेबियाची पाकिस्तानला आणखी एक मोठी भेट; ३० लाख लोकांना रोजगार मिळणार
2
‘कोस्टल’वर थेट १४० चा हायस्पीड: ...तर मग गुन्हाच होईल दाखल; वाहतूक पोलिसांकडून दिवसाला ५०० ई-चालानची कारवाई
3
भारतीय नौदलाची ताकद वाढणार! आज अँड्रोथ युद्धनौका मिळणार, जाणून काय आहे खास?
4
Mumbai Accident: दादरमध्ये अपघात, 'बेस्ट बस'ला टेम्पो ट्रॅव्हलरची धडक; एक ठार, चार जखमी
5
'या' माशांना वाचवण्यासाठी बांगलादेशनं उतरवलं सैन्य दल; बंगालच्या खाडीत पाठवल्या १७ युद्धनौका
6
Indian shot dead: "मित्रा, तू बरा आहेस ना?" मदतीसाठी आलेल्या भारतीय व्यक्तीचीच गोळी घालून हत्या
7
VIRAL : 'सर डोकं दुखतंय...', कर्मचारी आजारी तरीही मॅनेजर सुट्टी देईना! संतापलेल्या तरुणानं काय केलं बघाच  
8
FD करुन तुम्ही कधीही श्रीमंत होणार नाही? CA ने दिला इशारा, म्हणाले खऱ्या कमाईसाठी गुंतवणूक धोरण बदला
9
Video - अरे बापरे! ऑर्डर केला iPhone 16; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत अजब भानगड
10
Tata Capital IPO: प्रतीक्षा संपली! तुमच्या खिशात आहेत का १४,९९६ रुपये? तर बनू शकता टाटांच्या कंपनीचे प्रॉफिट पार्टनर
11
इवलीशी मुंबई झाली महाकाय ! त्या त्या भागानुसार प्रति स्क्वेअर फुटाचा दर काय... पहाल तर...
12
"प्यार मे सौदेबाजी...", अरबाज खान दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर मलायका अरोराची क्रिप्टिक पोस्ट
13
सोनम वांगचुक यांच्या अटकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, पत्नीने दाखल केली याचिका
14
Kantara Chapter 1: साऊथने पुन्हा एकदा करून दाखवलं! फक्त ४ दिवसांत 'कांतारा'ने कमावले ३०० कोटी
15
पतीच्या मृत्यूनंतर पुन्हा जोडीदाराची इच्छा पडली महागात; मॅट्रिमोनियल साइटवरून शिक्षिकेला कोट्यवधींचा गंडा!
16
Post Office Scheme: दर महिन्याला होईल ₹६१,००० ची कमाई; जबरदस्त आहे ही सरकारी स्कीम, कोट्यधीशही बनवेल
17
Jaipur Hospital Fire: जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
18
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, Nifty २४,९१० च्या वर; सरकारी बँकांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी
19
Jaipur Hospital Fire: '२० मिनिटांपूर्वी आगीची माहिती दिली, पण डॉक्टर पळून गेले'; SMS रुग्णालयातील प्रत्यक्षदर्शींचा धक्कादायक दावा
20
Video:...तर भारताच्या 'या' खेळाडूला मारायचंय; पाकिस्तानी स्पिनर अबरार अहमदचं विधान चर्चेत

आदिवासींना मिळाल्या वनजमिनी

By admin | Updated: January 9, 2016 02:20 IST

गेल्या अनेक वर्षांपासून जे आदिवासी बांधव वनजमिनी कसत होते, त्या जमिनीचा सातबारा आता त्यांच्या नावावर करण्यात आला आहे.

पनवेल : गेल्या अनेक वर्षांपासून जे आदिवासी बांधव वनजमिनी कसत होते, त्या जमिनीचा सातबारा आता त्यांच्या नावावर करण्यात आला आहे. पनवेल तालुक्यातील ५८० जणांना ३६ भूखंडांची सनद गुरुवारी पनवेल तहसील कार्यालयात वाटण्यात आली. त्यामुळे आता ही जमीन आदिवासींच्या मालकीची झाली आहे. त्यावरील अतिक्र मणाचा शिक्का पुसण्यात आला आहे.पनवेल तालुक्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी वाड्या आणि पाडे आहेत. अतिशय दुर्गम भागात राहून वनवासी कसाबसा उदरनिर्वाह करतात. कित्येकांनी हक्काची जागा नसल्याने ते वन जमीन कसत आहेत. त्या जमिनीत मशागत करून भाज्या पिकवल्या जात आहेत. काहींनी याच जमिनीवर राहण्याकरिता निवारा बांधला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या जमिनी हे कुटुंब कसत असतानाही वनविभागाकडून या जमिनी वर्ग करण्यात आल्या नव्हत्या. जमिनीच्या रेकॉर्डवर अतिक्र मणाचा शिक्का पडला असल्याने आदिवासींना शासकीय योजनेत भाग घेता येत नव्हता. त्याचबरोबर त्यांना लाभही मिळत नसल्याने हे कुटुंब उपेक्षित होते. या वनजमिनी आदिवासींच्या नावावर कराव्यात अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती. तहसीलदार दीपक आकडे यांच्या नेतृत्वाखाली कल्याण कदम, तलाठी संदीप भंडारे, विशाल भोईर यांनी विशेष परिश्रम घेतले. गेल्या सहा महिन्यापासून पुरावे जमा करण्याचे काम सुरू होते. हे प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविण्यात आले. त्या प्रस्तावाला जिल्हाधिकारी शीतल उगले यांनी हिरवा कंदील दिला. त्याचबरोबर सर्व कागदपत्रे तसेच तांत्रिक बाबींची पूर्तता करून गुरुवारी आदिवासींना तहसीलदार दीपक आकडे यांच्या हस्ते सनद वाटप करण्यात आली. यावेळी निवासी नायब तहसीलदार बी.टी. गोसावी, कल्याण कदम, उमेश पाटील यांच्यासह अधिकारी, कर्मचारी आणि लाभार्थी उपस्थित होते. त्यामुळे आता या जमिनीवर आदिवासींचा कायद्याने हक्क लागू झाला आहे. त्यांना वन आणि इतर विभागाकडून त्रास होणार नाही. (वार्ताहर)