शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

ग्रीन होपच्या वतीने नवी मुंबईत वृक्षारोपण

By कमलाकर कांबळे | Updated: June 5, 2024 20:28 IST

पर्यावरण दिनानिमित्त संदीप नाईक यांचे अभियान

नवी मुंबई : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नवी मुंबईत विविध सामाजिक संस्था आणि पर्यावरणप्रेमींच्या माध्यमातून वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनामध्ये मागील १९ वर्षांपासून काम करणाऱ्या ग्रीन होप या संस्थेच्या वतीने भारतीय जनता पार्टीचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात ठिकठिकाणी वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी जागृती फेरीदेखील काढण्यात आली.

त्यानंतर ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत रबाळे, नेरूळ आणि सीवूडस परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या अभियानात पर्यावरणप्रेमी नागरिक, लोकप्रतिनिधी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मानवी चुकांमुळे निर्सगाचा कोप होऊ लागला आहे. उष्णतेची लाट, पूर, दुष्काळ अशी संकटे ओढवली आहेत. ही चूक सुधारण्यासाठी अधिकाधिक प्रमाणात झाडे लावून त्यांचे संवर्धन करणे आवश्यक असल्याचे मत गणेश नाईक यांनी यावेळी व्यक्त केले. त्याचप्रमाणे जल, वायू आणि ध्वनी प्रदूषण करणाऱ्या घटकांचा वापर करणार नाही, असा संकल्प करण्याचा सल्लादेखील त्यांनी उपस्थितांना दिला.

नवी मुंबईतील हिरवळ वाढली पाहिजे

जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी आपल्या संबोधनामध्ये ग्रीन होपच्या आजवरच्या वाटचालीचा आढावा घेत वृक्षारोपण, पर्यावरण जनजागृती, खारफुटींची लागवड, मागेल त्याला झाड, असे अनेक उपक्रम राबविल्याची माहिती दिली. नवी मुंबईची लोकसंख्या वाढत असताना, नवी मुंबईतील हिरवळ आणि झाडांची संख्यादेखील वाढली पाहिजे. त्यासाठी प्रत्येक व्यक्तीने, संस्थेने झाडे लावावीत आणि जगवावीत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई