शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

प्रवास्यांना वाहतूक कोंडीने गाठलं खिंडीत, नियोजनाचा अभाव; एकाच वेळी चहूकडे रस्त्यांचे खोदकाम

By सूर्यकांत वाघमारे | Updated: February 26, 2024 19:28 IST

मागील काही दिवसांपासून महापालिकेमार्फत ठिकठिकाणी रस्त्यांच्या, पुलाच्या दुरुस्तीची कामे सुरु आहेत. त्यामुळे जागोजागी रस्ते खोदण्यात आले आहेत. या कामादरम्यान काही ठिकाणी वाहतूक वळवण्यात आली आहे.

नवी मुंबई : शहरात एकाच वेळी ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे सुरु असल्याने दोन प्रशासनात नियोजनाचा अभाव दिसून येत आहे. यामध्ये सर्वत्र वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असून हवेत धूलिकणांचीही मोठी भर पडत आहे. दरम्यान या कोंडीतून लवकर सुटका होईल का याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे. 

मागील काही दिवसांपासून महापालिकेमार्फत ठिकठिकाणी रस्त्यांच्या, पुलाच्या दुरुस्तीची कामे सुरु आहेत. त्यामुळे जागोजागी रस्ते खोदण्यात आले आहेत. या कामादरम्यान काही ठिकाणी वाहतूक वळवण्यात आली आहे, तर काही ठिकाणी रहदारीसाठी अर्धा रस्ता बंद करण्यात आला आहे. परंतु पर्यायी मार्गांवर देखील खोदकामे झालेली असल्याने नेमकं जायचं तरी कुठून असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. त्यामध्ये सीबीडीकरांना वाहतूक कोंडीने चांगलेच खिंडीत गाठले आहे. 

सायन पनवेल मार्गावरील उरणफाटा येथील पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरु असून त्यासाठी वाहतूक पोलिसांनी अनुमती दिली आहे. त्यामुळे पर्यायी बेलापूर येथून पामबीच मार्गे वाहने वळवली जात आहेत. मात्र त्याचवेळी आग्रोळी जंक्शन, सीबीडी स्थानक याठिकाणी देखील रस्त्यांचे काम सुरु असल्याने रहदारीला रस्ता अपुरा पडत आहे. यामुळे खिंडीतल्या कोंडीतून सुटका करून घेण्यासाठी बेलापूर मार्गे वाहन वळवल्यास तिथल्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. 

अशीच परिस्थिती तुर्भे, वाशी सेक्टर ९ याठिकाणी देखील निर्माण होत आहे. वाशी सेक्टर ९ येथे पादचारी पुलाचे काम सुरु असल्याने त्यासाठी निम्मा रस्ता खोदलेला आहे. तर तुर्भे स्थानकासमोर नवा पूल उभारला जात असल्याने युद्ध पातळीवर खोदकाम सुरु असून त्यासाठी दोन्ही मार्गावरील केवळ एक लेनचा रस्ता वाहतुकीसाठी खुला आहे. यामुळे अवजड वाहने एमआयडीसी मार्गे निश्चित ठिकाणी वळवण्यात आली आहेत. तर हलक्या वाहनांसाठी मार्ग खुला असल्याने सकाळ, सांध्याकाळ त्याठिकाणी वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. या प्रमुख कामांशिवाय शहरात इतरही ठिकाणी एकाच वेळी रस्त्यांवर छोटी मोठी खोदकामी सुरु आहेत. प्रशासनाने काढलेल्या या कामांना एकाच वेळी वाहतूक पोलिसांनी देखील हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे सर्वत्र वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत आहे. त्यातच खोदकामांची धूळ हवेत पसरत असल्याने दुचाकीस्वारांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे.