शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
5
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
6
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
7
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
8
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
9
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
10
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
11
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
12
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
13
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
14
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
15
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
16
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
17
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
18
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
19
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
20
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?

प्रवास्यांना वाहतूक कोंडीने गाठलं खिंडीत, नियोजनाचा अभाव; एकाच वेळी चहूकडे रस्त्यांचे खोदकाम

By सूर्यकांत वाघमारे | Updated: February 26, 2024 19:28 IST

मागील काही दिवसांपासून महापालिकेमार्फत ठिकठिकाणी रस्त्यांच्या, पुलाच्या दुरुस्तीची कामे सुरु आहेत. त्यामुळे जागोजागी रस्ते खोदण्यात आले आहेत. या कामादरम्यान काही ठिकाणी वाहतूक वळवण्यात आली आहे.

नवी मुंबई : शहरात एकाच वेळी ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे सुरु असल्याने दोन प्रशासनात नियोजनाचा अभाव दिसून येत आहे. यामध्ये सर्वत्र वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असून हवेत धूलिकणांचीही मोठी भर पडत आहे. दरम्यान या कोंडीतून लवकर सुटका होईल का याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे. 

मागील काही दिवसांपासून महापालिकेमार्फत ठिकठिकाणी रस्त्यांच्या, पुलाच्या दुरुस्तीची कामे सुरु आहेत. त्यामुळे जागोजागी रस्ते खोदण्यात आले आहेत. या कामादरम्यान काही ठिकाणी वाहतूक वळवण्यात आली आहे, तर काही ठिकाणी रहदारीसाठी अर्धा रस्ता बंद करण्यात आला आहे. परंतु पर्यायी मार्गांवर देखील खोदकामे झालेली असल्याने नेमकं जायचं तरी कुठून असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. त्यामध्ये सीबीडीकरांना वाहतूक कोंडीने चांगलेच खिंडीत गाठले आहे. 

सायन पनवेल मार्गावरील उरणफाटा येथील पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरु असून त्यासाठी वाहतूक पोलिसांनी अनुमती दिली आहे. त्यामुळे पर्यायी बेलापूर येथून पामबीच मार्गे वाहने वळवली जात आहेत. मात्र त्याचवेळी आग्रोळी जंक्शन, सीबीडी स्थानक याठिकाणी देखील रस्त्यांचे काम सुरु असल्याने रहदारीला रस्ता अपुरा पडत आहे. यामुळे खिंडीतल्या कोंडीतून सुटका करून घेण्यासाठी बेलापूर मार्गे वाहन वळवल्यास तिथल्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. 

अशीच परिस्थिती तुर्भे, वाशी सेक्टर ९ याठिकाणी देखील निर्माण होत आहे. वाशी सेक्टर ९ येथे पादचारी पुलाचे काम सुरु असल्याने त्यासाठी निम्मा रस्ता खोदलेला आहे. तर तुर्भे स्थानकासमोर नवा पूल उभारला जात असल्याने युद्ध पातळीवर खोदकाम सुरु असून त्यासाठी दोन्ही मार्गावरील केवळ एक लेनचा रस्ता वाहतुकीसाठी खुला आहे. यामुळे अवजड वाहने एमआयडीसी मार्गे निश्चित ठिकाणी वळवण्यात आली आहेत. तर हलक्या वाहनांसाठी मार्ग खुला असल्याने सकाळ, सांध्याकाळ त्याठिकाणी वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. या प्रमुख कामांशिवाय शहरात इतरही ठिकाणी एकाच वेळी रस्त्यांवर छोटी मोठी खोदकामी सुरु आहेत. प्रशासनाने काढलेल्या या कामांना एकाच वेळी वाहतूक पोलिसांनी देखील हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे सर्वत्र वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत आहे. त्यातच खोदकामांची धूळ हवेत पसरत असल्याने दुचाकीस्वारांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे.