शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

प्रवास्यांना वाहतूक कोंडीने गाठलं खिंडीत, नियोजनाचा अभाव; एकाच वेळी चहूकडे रस्त्यांचे खोदकाम

By सूर्यकांत वाघमारे | Updated: February 26, 2024 19:28 IST

मागील काही दिवसांपासून महापालिकेमार्फत ठिकठिकाणी रस्त्यांच्या, पुलाच्या दुरुस्तीची कामे सुरु आहेत. त्यामुळे जागोजागी रस्ते खोदण्यात आले आहेत. या कामादरम्यान काही ठिकाणी वाहतूक वळवण्यात आली आहे.

नवी मुंबई : शहरात एकाच वेळी ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे सुरु असल्याने दोन प्रशासनात नियोजनाचा अभाव दिसून येत आहे. यामध्ये सर्वत्र वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असून हवेत धूलिकणांचीही मोठी भर पडत आहे. दरम्यान या कोंडीतून लवकर सुटका होईल का याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे. 

मागील काही दिवसांपासून महापालिकेमार्फत ठिकठिकाणी रस्त्यांच्या, पुलाच्या दुरुस्तीची कामे सुरु आहेत. त्यामुळे जागोजागी रस्ते खोदण्यात आले आहेत. या कामादरम्यान काही ठिकाणी वाहतूक वळवण्यात आली आहे, तर काही ठिकाणी रहदारीसाठी अर्धा रस्ता बंद करण्यात आला आहे. परंतु पर्यायी मार्गांवर देखील खोदकामे झालेली असल्याने नेमकं जायचं तरी कुठून असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. त्यामध्ये सीबीडीकरांना वाहतूक कोंडीने चांगलेच खिंडीत गाठले आहे. 

सायन पनवेल मार्गावरील उरणफाटा येथील पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरु असून त्यासाठी वाहतूक पोलिसांनी अनुमती दिली आहे. त्यामुळे पर्यायी बेलापूर येथून पामबीच मार्गे वाहने वळवली जात आहेत. मात्र त्याचवेळी आग्रोळी जंक्शन, सीबीडी स्थानक याठिकाणी देखील रस्त्यांचे काम सुरु असल्याने रहदारीला रस्ता अपुरा पडत आहे. यामुळे खिंडीतल्या कोंडीतून सुटका करून घेण्यासाठी बेलापूर मार्गे वाहन वळवल्यास तिथल्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. 

अशीच परिस्थिती तुर्भे, वाशी सेक्टर ९ याठिकाणी देखील निर्माण होत आहे. वाशी सेक्टर ९ येथे पादचारी पुलाचे काम सुरु असल्याने त्यासाठी निम्मा रस्ता खोदलेला आहे. तर तुर्भे स्थानकासमोर नवा पूल उभारला जात असल्याने युद्ध पातळीवर खोदकाम सुरु असून त्यासाठी दोन्ही मार्गावरील केवळ एक लेनचा रस्ता वाहतुकीसाठी खुला आहे. यामुळे अवजड वाहने एमआयडीसी मार्गे निश्चित ठिकाणी वळवण्यात आली आहेत. तर हलक्या वाहनांसाठी मार्ग खुला असल्याने सकाळ, सांध्याकाळ त्याठिकाणी वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. या प्रमुख कामांशिवाय शहरात इतरही ठिकाणी एकाच वेळी रस्त्यांवर छोटी मोठी खोदकामी सुरु आहेत. प्रशासनाने काढलेल्या या कामांना एकाच वेळी वाहतूक पोलिसांनी देखील हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे सर्वत्र वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत आहे. त्यातच खोदकामांची धूळ हवेत पसरत असल्याने दुचाकीस्वारांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे.