शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
2
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
3
'पाच महिन्यात पाच युद्ध थांबवली आता...'; ट्रम्प यांनी पुन्हा घेतले भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय
4
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
5
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
6
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
7
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
8
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
9
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
10
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
11
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
12
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
13
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
14
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
15
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
16
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
17
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
18
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
19
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
20
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत

दुकाने बंद असल्याने ट्रॅव्हल्स बुकिंग घेणारे संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2020 01:22 IST

पनवेल परिसरात, अहमदनगर, गोवा, लातूर, पुणे, कोकण, विदर्भ, घाटमाथ्यावरील मोठ्या प्रमाणात कामानिमित्त नागरिकांचे वास्तव्य आहे. पनवेल येथून गावी जाण्यासाठी एसटी बसेसबरोबर खासगी ट्रॅव्हल्सने मोठ्या प्रमाणात उपयोग करतात.

कळंबोली : मुंबई-उपनगरातून गावी जाण्यासाठी राज्य परिवहन महामंडळच्या एसटी बसेसबरोबर खासगी बसेसनाही नागरिकांकडून प्रधान्य दिले जाते. वर्षभर प्रवास करण्यासाठी खासगी बसेसचा आधार घेतला जातो. कोरोनामुळे पाच महिन्यांपासून पनवेल, कळंबोली, कामोठे, खारघर येथील १५० ट्रॅव्हल्स बुकिंग आॅफिस बंद आहेत. त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. अनलॉक टप्पा ४ मध्ये खासगी ट्रॅव्हल्स सुरू करण्यास परवानगी मिळेल, याकडे लक्ष लागले आहे.पनवेल परिसरात, अहमदनगर, गोवा, लातूर, पुणे, कोकण, विदर्भ, घाटमाथ्यावरील मोठ्या प्रमाणात कामानिमित्त नागरिकांचे वास्तव्य आहे. पनवेल येथून गावी जाण्यासाठी एसटी बसेसबरोबर खासगी ट्रॅव्हल्सने मोठ्या प्रमाणात उपयोग करतात. पनवेल, कळंबोली, कामोठे, खारघर या ठिकाणी राज्यातील, तसेच परराज्यातील नागरिक वास्तव्य करतात. पनवेल परिसरात १५०च्या जवळपास बुकिंग करणारे आॅफिस आहेत. कोरोनामुळे गेल्या पाच महिन्यांपासून खासगी बसेस बंद असल्याने ट्रॅव्हल्स बुकिंग आॅफिस बंद झाली आहेत. बसेस चालविण्यास शासनाकडून परवानगी मिळाली नाही. त्यामुळे ट्रॅव्हल्स मालक, ड्रायव्हर, क्लीनरसह बुकिंग करणारेही संकटात सापडले आहेत. भाड्यामुळे आॅफिस बंद करण्याची वेळ आली असल्याचे ओम नम:शिवाय ट्रॅव्हल्स आॅफिसचे मालक बालाजी गुरमे यांनी सांगितले. एक सीट बुकिंग केल्यास ३० ते ५० रुपये मिळतात. दिवसभरात १५ ते २० सीटची बुकिंग होते. त्यातून आॅफिस खर्च, कामगार यांचा पगार दिला जात असल्याचे गुरमे म्हणाले. सुट्टीच्या काळात जास्त बुकिंग केली जाते. त्यावरच उदरनिर्वाह चालतो. शासनाची खासगी लक्झरी बसेसला परवानगी मिळावी, अशी अपेक्षा आहे.कोरोना लॉकडाऊनमुळे आॅफिस बंद आहेत . पाच महिन्याचे गाळे भाडे थकले आहेत. तेही देणे कठिण झाले आहे. सप्टेंबर महिन्यात ट्रॅव्हल्स सुरू झाले तर दिलासा मिळेल.- विनोद पवार,नॅशनल ट्रॅव्हल्स, पनवेलआमचा उदरनिर्वाह ट्रॅव्हल्स बुकींवर आहे. गेली १२ वर्षांपासून हे काम करतोय. पहिल्यांदा कोरोनामुळे आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. शासनाने महामंडळ बसेस सुरू केल्या आहेत, तसे ट्रॅव्हल्स सुरू करण्यास परवानगी द्यावी.- प्रकाश रानमारे,अनिकेत ट्रॅव्हल्स सिबीडी बेलापूरकोरोनाच्या काळात मालकाने अर्धे भाडे माफ केले आहे. पाच महिन्यांचे अर्धे तरी भाडे द्यावेच लागणार आहे. यामुळे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. लवकर ट्रॅव्हल्स चालू करण्यास परवानगी दिली, तर आमचाही व्यवसाय सुरू होईल.आॅफिस बंद असल्यामुळे पैशांची चणचण भासत आहे. कुटुंब सांभाळणे कठीण झाले आहे. शासनाने याकडे लक्ष द्यावे, हीच माफक मागणी आहे .- हर्षल भोसले,श्री गणेश ट्रॅव्हल्स,कामोठे

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई