शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

दुकाने बंद असल्याने ट्रॅव्हल्स बुकिंग घेणारे संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2020 01:22 IST

पनवेल परिसरात, अहमदनगर, गोवा, लातूर, पुणे, कोकण, विदर्भ, घाटमाथ्यावरील मोठ्या प्रमाणात कामानिमित्त नागरिकांचे वास्तव्य आहे. पनवेल येथून गावी जाण्यासाठी एसटी बसेसबरोबर खासगी ट्रॅव्हल्सने मोठ्या प्रमाणात उपयोग करतात.

कळंबोली : मुंबई-उपनगरातून गावी जाण्यासाठी राज्य परिवहन महामंडळच्या एसटी बसेसबरोबर खासगी बसेसनाही नागरिकांकडून प्रधान्य दिले जाते. वर्षभर प्रवास करण्यासाठी खासगी बसेसचा आधार घेतला जातो. कोरोनामुळे पाच महिन्यांपासून पनवेल, कळंबोली, कामोठे, खारघर येथील १५० ट्रॅव्हल्स बुकिंग आॅफिस बंद आहेत. त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. अनलॉक टप्पा ४ मध्ये खासगी ट्रॅव्हल्स सुरू करण्यास परवानगी मिळेल, याकडे लक्ष लागले आहे.पनवेल परिसरात, अहमदनगर, गोवा, लातूर, पुणे, कोकण, विदर्भ, घाटमाथ्यावरील मोठ्या प्रमाणात कामानिमित्त नागरिकांचे वास्तव्य आहे. पनवेल येथून गावी जाण्यासाठी एसटी बसेसबरोबर खासगी ट्रॅव्हल्सने मोठ्या प्रमाणात उपयोग करतात. पनवेल, कळंबोली, कामोठे, खारघर या ठिकाणी राज्यातील, तसेच परराज्यातील नागरिक वास्तव्य करतात. पनवेल परिसरात १५०च्या जवळपास बुकिंग करणारे आॅफिस आहेत. कोरोनामुळे गेल्या पाच महिन्यांपासून खासगी बसेस बंद असल्याने ट्रॅव्हल्स बुकिंग आॅफिस बंद झाली आहेत. बसेस चालविण्यास शासनाकडून परवानगी मिळाली नाही. त्यामुळे ट्रॅव्हल्स मालक, ड्रायव्हर, क्लीनरसह बुकिंग करणारेही संकटात सापडले आहेत. भाड्यामुळे आॅफिस बंद करण्याची वेळ आली असल्याचे ओम नम:शिवाय ट्रॅव्हल्स आॅफिसचे मालक बालाजी गुरमे यांनी सांगितले. एक सीट बुकिंग केल्यास ३० ते ५० रुपये मिळतात. दिवसभरात १५ ते २० सीटची बुकिंग होते. त्यातून आॅफिस खर्च, कामगार यांचा पगार दिला जात असल्याचे गुरमे म्हणाले. सुट्टीच्या काळात जास्त बुकिंग केली जाते. त्यावरच उदरनिर्वाह चालतो. शासनाची खासगी लक्झरी बसेसला परवानगी मिळावी, अशी अपेक्षा आहे.कोरोना लॉकडाऊनमुळे आॅफिस बंद आहेत . पाच महिन्याचे गाळे भाडे थकले आहेत. तेही देणे कठिण झाले आहे. सप्टेंबर महिन्यात ट्रॅव्हल्स सुरू झाले तर दिलासा मिळेल.- विनोद पवार,नॅशनल ट्रॅव्हल्स, पनवेलआमचा उदरनिर्वाह ट्रॅव्हल्स बुकींवर आहे. गेली १२ वर्षांपासून हे काम करतोय. पहिल्यांदा कोरोनामुळे आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. शासनाने महामंडळ बसेस सुरू केल्या आहेत, तसे ट्रॅव्हल्स सुरू करण्यास परवानगी द्यावी.- प्रकाश रानमारे,अनिकेत ट्रॅव्हल्स सिबीडी बेलापूरकोरोनाच्या काळात मालकाने अर्धे भाडे माफ केले आहे. पाच महिन्यांचे अर्धे तरी भाडे द्यावेच लागणार आहे. यामुळे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. लवकर ट्रॅव्हल्स चालू करण्यास परवानगी दिली, तर आमचाही व्यवसाय सुरू होईल.आॅफिस बंद असल्यामुळे पैशांची चणचण भासत आहे. कुटुंब सांभाळणे कठीण झाले आहे. शासनाने याकडे लक्ष द्यावे, हीच माफक मागणी आहे .- हर्षल भोसले,श्री गणेश ट्रॅव्हल्स,कामोठे

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई